एक्स्प्लोर

संतोष देशमुख हत्या प्रकरण, पर्यावरण ते पशुसंवर्धन, मंत्री पंकजा मुंडेंचं व्हिजन काय? माझा व्हिजनमध्ये मांडली भूमिका

Pankaja Munde : एबीपी माझाच्या  'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन'  या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका मांडली आहे. .

Pankaja Munde :  संतोष देशमुख यांच्या हत्येची (Santosh Deshmukh murder case) घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि दृष्ट प्रवृत्तींनी केलेली होती असे मत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केले. या घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोण, या घटनेत देण्यात येणार न्याय हे महत्वाचं असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. कोणतीही चुकीची घटना टाळता येणं शक्य होतं. ती घटना घडू नये यासाठी तेथील प्रशासन स्ट्रॉंग असणं गरजेचं होतं असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. तिथे प्रशासनाचा धाक असालया पाहिजे होते. अशा मुलांना पाठिशी घालणाऱ्या यंत्रणा तिथं नसायला हव्या होत्या असंही त्या म्हणाल्या. एबीपी माझाच्या  'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन'  या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

100 दिवसात आम्हाला कार्यक्रम सुरु करायचे होते, ते आम्ही केलं

सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. माझ्याकडे दोन खाती आहेत. एक पर्यावरण आणि दुसरे पशुसंवर्धन. अधिवेशनाचा एकही दिवस असा नाही की पर्यावरणाच्या संदर्भात चर्चा होत नाही. हा एक महत्वाचा बदल असल्याचे मत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला 100 दिवसांचे कार्यक्रम दिले होते. हे कार्यक्रम आम्हाला सुरु करायचे होते, यामध्ये आम्हाला यश आल्याचे मुंडे म्हणाल्या. नवीन पॉलिसीमार्फत पर्यावरण विभाग कसा सक्षम होईल यावर आम्ही करत असल्याचे मुंडे म्हणाल्या. 

 ग्रामीण भागात उद्योजक व्हावेत, त्यासाठी वातावरण निर्मीती करण्याचा प्रयत्न 

दुधात होणाऱ्या भेसळीवर आम्ही काम करत आहोत. याबाबत कडक कायदे असावे याचा विचार आम्ही करत आहोत असे पंकजा मुंडे म्हणाल्या. पशुसंवर्धनबाबत माझे एक स्वप्न आहे. ग्रामीण भागात उद्योजक व्हावेत. ग्रामीण भागातील युवक जीन्स पॅन्ट घालून पोल्ट्री फार्म, वराह पालन एक उद्योजक म्हणून समोर यावा, त्यांच्यासाठी चांगली वातावरण निर्मिती व्हावी हा माझा उद्देश असल्याचे पंकजा मुंडे म्हणाले. प्रदुषण करणारे घटक दूर ठेवले पाहिजेत, व्यक्ती असोत किंवा घटक असोत असे मुंडे म्हणाल्या. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावं हीच माझी भूमिका

गोपीनाथ मुंडे असते तर मी राजकारणात राहिले नसते असं वक्तव्य पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. ते असते तर काय झालं असतं? अशी तुलना मी करणार नाही असेही पंकजा मुंडे म्हणाले. बीड जिल्ह्यात शांतता ठेवण्यासाठी मी प्रत्येक क्षणी तत्पर राहीली आहे. बीडमध्ये प्रशासनाचा धाक हवा होता. दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय देणं हीच माझी भूमिका असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

महायुती सरकारचा कारभार छान चाललाय

महायुती सरकारचा कारभार छान चालला आहे. नैसर्गिक युती आहे शिवसेनेबरोबर, अजित पवार यांचा दिर्घ प्रशासनाचा अनुभव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. सगळी टीम ऑल राऊंडर असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. महाराष्ट्राचा चेहरा कोण आहे हे मला पाहायचं आहे. ओबीसीची चेहरा कोण आहे हे मला पाहायचं नाही. कोणत्याही जातीचं काय स्टेटस आहे हे बघण्यापेक्षा सामन्य माणसांच्या जीवनाकडे लक्ष दिलं पाहिजे असे पंकजा मुंडे म्हणाल्या. पुढच्या काळात नदी पुनर्जीवनावर मला काम करायचं असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच ग्रामीण भागातील तरुणांना ग्रामीण भागात राहुनच उद्योग देण्याचा प्रयत्न असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Jalgaon Crime : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal Majha Vision : सावरकर ते औरंजेबाची कबर...हर्षवर्धन सपकाळांची स्फोटक मुलाखतDevendra Fadnavis Majha Vision Full : बेधडक उत्तरं, तुफान फटकबाजी! दवेंद्र फडणवीस भरभरुन बोलले..Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिल्यास...Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिला, तर...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Jalgaon Crime : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
Vijay Wadettiwar & Yogesh Kadam : महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
Imtiaz Jaleel Majha Vision : औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांकडून प्रश्नांची सरबत्ती
औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांकडून प्रश्नांची सरबत्ती
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Embed widget