Election Result 2022 LIVE: गोव्यात भाजप सरकारचा 14 मार्च रोजी शपथविधी? पाच राज्यातील जलद निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर
Election Result 2022 LIVE Updates: राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा. पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार जाहीर

Background
5 State Election Results 2022 LIVE: राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले आहे. अवघ्या काही तासांमध्येच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सकाळी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरू होणार आहे. मतमोजणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच आपल्याला कल समजणार आहेत.
देशामध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान झाले होते. त्याठिकाणी एकूण 403 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे तिथे कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. कारण दिल्ली गाठण्याचा मार्ग युपीमधून जातो असे म्हटले जाते. त्यामुळे राजकीयदृष्ट्या यूपी हे अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. त्यानंतर मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. तसेच गोव्यात 40 जागांसाठी एकाट टप्प्यात, उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यात आणि पंजाबमध्ये 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते.
उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत सात टप्प्यांत मतदान झालं आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीला तर मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला मतदान झालं.
पाच राज्यांतील सर्व 690 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांचे अचूक निकाल पाहण्यासाठी, भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) results.eci.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन करून निकाल पाहता येणार आहे. निवडणुकांचे निकालाचे लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
Pm Modi : 2022 चे निकाल 2024 चं भवितव्य ठरवणार : पंतप्रधान मोदी
Pm Modi : 2017 च्या निकालांनी 2019 चं भवितव्य ठरवलं असं विश्लेशकांचं मत होतं. त्यामुळे 2022 चे निकाल 2024 चं भवितव्य ठरवणार आहेत, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला.
Pm Modi : गरीबांचा विकास हाच आमचा ध्यास : पंतप्रधान मोदी
Pm Modi : गरीबांचा विकास हाच आमचा ध्यास आहे. भाजप सरकार गरीबांसाठी काम करत आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.



















