एक्स्प्लोर

Sharad Pawar: मनुस्मृती आणि मनाचे श्लोक अभ्यासक्रमात घेण्याच्या चर्चा, शरद पवार म्हणाले, मुलांच्या डोक्यात काय घालायचं, पालकांनी विचार करावा

Maharashtra Politics: राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती, भग्वद्गीता आणि मनाचे श्लोक यांच्या समावेशाच्या प्रस्तावावरुन वाद. हा निर्णय सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या वादाचा ठरण्याची शक्यता आहे. शरद पवारांचं वक्तव्य.

मुंबई: राज्यातील शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि मनाचे श्लोक समाविष्ट करण्याचा विचार सुरु आहे, ही गोष्ट माझ्या कानावर आली. यावरुन राज्य सरकारची संविधानाच्या (Indian Constitution) बाबतीत काय मानसिकता आहे, हे लक्षात येते. त्यामुळे सामजिक संस्थांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. मुलांच्या डोक्यात नेमकं काय घालण्याचा प्रयत्न सुरु आहे, हे कळत नाही. याबाबत प्रागतिक विचाराचे जे कोणी लोक आहेत, त्यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.

राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात भग्वद्गीता, मनाचे श्लोक समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, 'एससीईआरटी'ने  राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. यावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुलांना आपल्या देशातील परंपरांची ओळख करुन देणं आणि त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी गीता आणि मनाचे श्लोक तर मानवी  मूल्ये आणि स्वभाववृत्ती यांची ओळख करुन देण्यासाठी मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा वापर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, हा निर्णय सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या वादाचा ठरण्याची शक्यता आहे.

शालेय अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीच्या समावेशाची चर्चा, फडणवीस म्हणाले...

विद्यार्थ्यांना शाळेत मनुस्मृतीमधील श्लोक शिकवण्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस पक्षाने टीकेची झोड उठवली होती. या मुद्द्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्याता आला. त्यांनी त्याला उत्तर देताना म्हटले की, मी असल्या फाल्तू गोष्टींना उत्तर देत नाही. काँग्रेसला हल्लीच्या काळात काहीच उद्योग उरलेले नाहीत. महाराष्ट्रात मनाचे श्लोक वर्षानुवर्षे बोलले जातात, ऐकले जातात. त्यांचा अभ्यासक्रमात समावेश होणार की नाही, याबाबत मला माहिती नाही. पण यावरुन विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 

एससीईआरटीचा अभ्यासक्रम नेमका कसा असणार?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एससीईआरटीने तिसरी ते बारावी इयत्तेच्या अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केला आहे. त्यानुसार, भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावावा, अशी शिफारस एससीईआरटीने केली आहे. तर तिसरी ते पाचवीपर्यंत 1 ते 25 मनाचे श्लोक, सहावी ते आठवीसाठी 26 ते 50 मनाचे श्लोक आणि नववी ते बारावीसाठी भगवद्गीतेतील बारावा अध्यायाच्या पाठांतरांची स्पर्धा आयोजित करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच काही मानवी मूल्यांची शिकवण देण्यासाठी मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्यात यावा, असा प्रस्ताव आहे.

आणखी वाचा

आता शाळेत शिकवली जाणार भगवद्गीता; अभ्यासक्रमात होणार समाविष्ट, आता मुलांना मनाचे श्लोक देखील होणार तोंडपाठ

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Samantha Ruth Prabhu: समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
लोकलच्या मोटरमनला लॉबीतच अडवले; प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे कर्मचारी संघटनांची सीसीटीव्हीतून पोल खोल
लोकलच्या मोटरमनला लॉबीतच अडवले; प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे कर्मचारी संघटनांची सीसीटीव्हीतून पोल खोल
SIP Calculator : 10000 रुपयांच्या दरमहा गुंतवणुकीनं 20 वर्षात किती रुपयांचा फंड तयार होईल? जाणून घ्या समीकरण
10000 रुपयांच्या दरमहा गुंतवणुकीनं 20 वर्षात किती रुपयांचा फंड तयार होईल? जाणून घ्या समीकरण
Parth Pawar: पुण्यातील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी कायदा काय सांगतो? 21 नाही 42 कोटी भरावे लागणार
पुण्यातील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी कायदा काय सांगतो? 21 नाही 42 कोटी भरावे लागणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Sangli : 2 वर्ष रखडलेली निवडणूक,सांगलीकर त्रस्त;पालिकेचं समीकरण बदलणार?
Manoj Jarange Vs Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचं आव्हान स्वीकारलं, जरांगे नार्को टेस्टसाठी तयार
Manoj Jarange Patil : 'दहा तारखेला हजर रहा!', मनोज जरांगे पाटलांना Mumbai Police चे समन्स
Gadchiroli Green Push: 'गडचिरोली लवकरच ग्रीन स्टील हब होईल', Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
Maharashtra Superfast News : 8 NOV 2025 : बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samantha Ruth Prabhu: समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
लोकलच्या मोटरमनला लॉबीतच अडवले; प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे कर्मचारी संघटनांची सीसीटीव्हीतून पोल खोल
लोकलच्या मोटरमनला लॉबीतच अडवले; प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे कर्मचारी संघटनांची सीसीटीव्हीतून पोल खोल
SIP Calculator : 10000 रुपयांच्या दरमहा गुंतवणुकीनं 20 वर्षात किती रुपयांचा फंड तयार होईल? जाणून घ्या समीकरण
10000 रुपयांच्या दरमहा गुंतवणुकीनं 20 वर्षात किती रुपयांचा फंड तयार होईल? जाणून घ्या समीकरण
Parth Pawar: पुण्यातील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी कायदा काय सांगतो? 21 नाही 42 कोटी भरावे लागणार
पुण्यातील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी कायदा काय सांगतो? 21 नाही 42 कोटी भरावे लागणार
मोठी बातमी! मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचं समन्स; मुंडेंसोबत वाद सुरू असतानाच चौकशीसाठी मुंबईत बोलावलं, प्रकरण काय?
मोठी बातमी! मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचं समन्स; मुंडेंसोबत वाद सुरू असतानाच चौकशीसाठी मुंबईत बोलावलं, प्रकरण काय?
हैदराबाद ते अमेरिकेत राज्यपाल! जोहरान ममदानींची जगभर चर्चा, पण गझला हाश्मींनी सुद्धा व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नर होत इतिहास रचला!
हैदराबाद ते अमेरिकेत राज्यपाल! जोहरान ममदानींची जगभर चर्चा, पण गझला हाश्मींनी सुद्धा व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नर होत इतिहास रचला!
आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, थेट मोदी-शाहांचं नाव घेतलं
आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार का? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, थेट मोदी-शाहांचं नाव घेतलं
MCA Election : ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत; शरद पवारांना फोन, जय शाहांची मदत हवी
ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत; शरद पवारांना फोन, जय शाहांची मदत हवी
Embed widget