एक्स्प्लोर

Shivsena : बंडखोरांना लागला भाजपचा लळा, पण युतीत शिवसेना 73 वरून 56 वर दुसरीकडे भाजप 42 वरून105 वर! 

शिवसेना 1995 मध्ये जिंकलेल्या सर्वाधिक 73 जागांवरून 2019 पर्यंत केवळ 56 जागांवर पोहोचली. त्यामुळेच युतीत 25 वर्ष आमची सडली हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य लक्षात येतं. 

Shivsena : शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीने खोलवर पोखरल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाता काल राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आपसूक कोसळले. अर्थातच, सरकार कोसळण्यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या बंडवीर एकनाथ शिंदे यांना त्यांच्या नजरेतील महाशक्तीने पडद्यामागून त्यांच्याच तोडीची रसद दिल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोर राजीनामा देण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. 

एकनाथ शिंदे यांनी बंडाचा पवित्रा घेतल्यापासून सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी केलेल्या आघाडीवर सातत्याने टीका केली आणि भाजपशी पुन्हा जुळवून घेण्यास सांगत होते. मात्र, भाजपचा सेना कणाकणाने संपवण्याचा धूर्त डाव लक्षात आल्याने अडीच वर्षांपूवीच काडीमोड घेतला होता. त्यानंतरही भाजपकडून सेनेवर झालेले प्रहार पाहता ते पुन्हा भाजपकडे वळतील याची सुतरामही शक्यता नव्हती आणि झालेही तसेच.   

शिवसेनेला धरून भाजपने राज्यात आला, पण संपली शिवसेनाच 

भाजप-शिवसेना युतीच्या सुरुवातीपासून आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास शिवसेनेची वाताहत होत चालल्याचे  स्पष्ट दिसून येत आहे. गेल्या 33 वर्षांत भाजपने शिवसेनेला हाताशी धरून राज्यात 42 जागांवरून थेट 2019 च्या निवडणुकीपर्यंत 106 जागांवर पोहोचला. दुसरीकडे शिवसेना 1995 मध्ये जिंकलेल्या सर्वाधिक 73 जागांवरून 2019 पर्यंत केवळ 56 जागांवर पोहोचली. त्यामुळेच युतीत 25 वर्ष आमची सडली हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य लक्षात येतं. 

33 वर्षांपूर्वीच भाजप शिवसेनेची युती 

तत्कालिन भाजप सरचिटणीस प्रमोद महाजन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकारातून शिवसेना आणि भाजप युती झाली होती. 33 वर्षांपूर्वी म्हणजेच 1989 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली. त्यापूर्वीही दोन्ही पक्षांमध्ये राजकीय मैत्री होती. 

1990 मध्ये शिवसेनेला 52, तर भाजपला 42 जागा

बाळासाहेबांच्या कार्यकाळामध्ये राज्याच्या राजकारणात शिवसेना नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला जास्त जागा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जास्त जागा अशा निर्णयाने युती अस्तित्वात आली होती. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने एकूण 288 जागांपैकी 183 जागा लढवल्या, तर भाजपने 104 जागांवर उमेदवार उभे केले. त्या निवडणुकीत शिवसेनेला 52 तर भाजपला 42 जागा मिळाल्या. शिवसेनेचे मनोहर जोशी विरोधी पक्षनेते झाले.

1995 मध्ये भाजप-शिवसेनेने पुन्हा निवडणूक लढवली. राममंदिर आंदोलनामुळे हिंदुत्वाची लाटेत शिवसेनेने 73 जागा जिंकल्या, तर भाजपला 65 जागा मिळाल्या. या जोरावर शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तर भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. मात्र, हाच फॉर्म्युला नंतर दोन्ही पक्षांतील वादाचे मूळ ठरला. शिवसेना आणि भाजपने 1999 च्या निवडणुकाही एकत्र लढल्या. शिवसेनेला 69 तर भाजपला 56 जागा मिळाल्या. तथापि, युतीला केवळ 125 जागा मिळाल्या, त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापन केले. 

2004 मध्येही शिवसेना आणि भाजपने एकत्र विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसेनेला 62 तर भाजपला 54 जागा मिळाल्या. जास्त जागा जिंकल्याने पुन्हा एकदा शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळाले. मात्र, नारायण राणे 2005 मध्ये डझनभर आमदारांसह काँग्रेसमध्ये गेल्याने भाजपने शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला. मात्र, शिवसेनेने फेटाळून लावला.

2009 मध्येही विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, भाजपने पहिल्यांदाच शिवसेनेला मागे टाकले. या काळात भाजपला 46 तर शिवसेनेला 45 जागा मिळाल्या. या दरम्यान भाजपला विरोधी पक्षनेतेपद मिळाले.

2014 मध्ये युती तुटली 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेपेक्षा जास्त जागांची मागणी केली. तथापि, एकमत न झाल्याने 25 वर्षे जुनी युती तुटली. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचीही आघाडी होऊ शकली नाही. भाजपले 122 जागा जिंकल्या, शिवसेनेला केवळ ६३ जागा जिंकता आल्या. याच काळात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मात्र, काही दिवस विरोधी पक्षात बसल्यानंतर शिवसेनेने सरकारमध्ये सहभागी होऊन 12 मंत्रीपदे मिळवली. इथूनच शिवसेना मोठ्या भावाकडून लहान भावाच्या भूमिकेत आली.

2019 मध्ये निवडणूक जिंकूनही शिवसेना-भाजप फुटले

2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा दोन्ही पक्षांना एकत्र येण्याची गरज भासू लागली. फेब्रुवारीमध्ये फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारमधील पद आणि जबाबदाऱ्या इतर गोष्टींबरोबरच समान वाटून घेतल्या जातील. मात्र, लोकसभेच्या निकालाने भाजपला पुन्हा एकदा शिवसेनेवर दबाव आणण्यात यश आले.

यावेळी विधानसभा निवडणुकीत भाजपने जास्त, तर शिवसेनेने कमी जागा लढवल्या. या काळात भाजपला 106 जागा मिळाल्या, तर शिवसेनेला 2014 च्या तुलनेत केवळ 56 जागा कमी मिळाल्या. यानंतर शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली, पण भाजपला ते मान्य नव्हते. त्यामुळे शिवसेना-भाजप युती तुटली. यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Congress Rally Against SIR: व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!

व्हिडीओ

Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Congress Rally Against SIR: व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Keral Local Body Election: डाव्यांच्या अभेद्य बालेकिल्ल्यात अन् शशी थरुरांच्या हक्काच्या मतदारसंघात भाजपच शिरकाव; केरळमध्ये पहिल्यांदाच महापौर होण्याची चिन्हे!
डाव्यांच्या अभेद्य बालेकिल्ल्यात अन् शशी थरुरांच्या हक्काच्या मतदारसंघात भाजपच शिरकाव; केरळमध्ये पहिल्यांदाच महापौर होण्याची चिन्हे!
Horoscope Today 15 December 2025 : आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
Dharur News : ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
Embed widget