टोमॅटोचा लाल चिखल! प्रतिकिलोला मिळतोय फक्त एक ते दोन रुपयांचा दर, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका
सध्या टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकरी (Farmers) चिंतेत आहेत. कारण टोमॅटोच्या दरात (Tomato Prices ) मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

Tomato Prices : सध्या टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकरी (Farmers) चिंतेत आहेत. कारण टोमॅटोच्या दरात (Tomato Prices ) मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या शेतकऱ्याच्या टोमॅटोला बाजारात प्रतिकिलोसाठी एक ते दोन रुपयांचा दर मिळत आहे. एवढा कमी भाव मिळाल्याने शेतकरी निराश झाला आहे. हरियाणासह महाराष्ट्रातील शेतकतरी चिंतेत आहेत.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण
हरियाणातील कर्नालमध्ये व्यापारी टोमॅटोला 2 रुपये भाव देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. टोमॅटो पिकवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचा एक लाख रुपयांच्या पुढे खर्च झाला आहे. सध्या टोमॅटो दोन रुपये किलोने विकला जात आहे. कमी दरी मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही.
एक क्रेट 50 रुपयांना विकला जातोय
बाजारातील एका शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटोचे पीक बाजारात आणले होते. संपूर्ण हंगामात टोमॅटोची अवस्था अत्यंत वाईट होती. टोमॅटो दोन रुपये किलोनेही विकला जात नाही. टोमॅटोचे भाव वाढले की प्रकरण संसदेत जाते, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र यावेळी टोमॅटोची अवस्था अशी आहे की तो दोन रुपये किलोने विकला जात आहे. अनेक शेतकरी आपल्या शेतातील टोमॅटोचे पीक वाया घालवत आहेत. पुढच्या पिकासाठीही पैसे नाहीत, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. यावेळी मजुरांची मजुरीही पिकातून निघत नाही. मजुरांची रोजंदारीही 250 रुपये असल्याचे ते सांगतात. मात्र त्यांचा एक क्रेट 50 रुपयांना विकला जात आहे. बाजारात टोमॅटोच्या या अवस्थेने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
राज्यातील अनेक भागात भाजीपाल्याचे दर कोसळले
राज्यातील अनेक भागात भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत. उन्हाळा आला असताना विविध भाज्यांचे दर दोन रूपयांपर्यंत घसरले आहेत. बटाटे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरचीला मोठा भाव नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यांचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतातील खत, बियाणे, मजुरी याचा प्रचंड खर्च असूनही बाजारात भाजीपाला अवघ्या 3 ते 12 रुपये किलो दरानं शेतकऱ्याला विकावा लागत आहे. दर घसरल्याने ग्राहकांची चांदी झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
























