औरंगजेबाच्या कबरीजवळ मोठा बोर्ड लावा, मराठ्यांनी कुणाला गाडलं हे जगाला कळू द्या, राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे पाच मुद्दे
Raj Thackeray : गुढी पाडव्यानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.
Raj Thackeray : गुढी पाडव्यानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. कुंभमेळा, धर्म, राजकारण, प्रदुषण या मुद्यावरुन राज ठाकरे यांनी राज्यकर्त्यांवर जोदार हल्लाबोल केला. याचबरोबर महाराष्ट्राचील नद्यांची स्थिती देखील किती बिकट आहे याचवर राज ठाकरे यांनी भाष्य केलं. तसेच औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावर देखील त्यांनी भाष्य केलं. जाणून घेऊयात राज ठाकरे यांच्या भाषणातील 5 महत्वाचे मुद्दे.
औरंगजेब आम्ही इथं गाडला, कबरीजवळ मोठा बोर्ड लावा
औरंगजेबाच्या कबरीजवळ केलेली सजावट काढून टाका. तिथे फक्त कबर दिलसली पाहिजे. तिथे एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांनी संपवायला आलेला औरंगजेब आम्ही इथं गाडला गेला. हा आमचा इतिहास असे राज ठाकरे म्हणाले. आम्ही कुणाला गाडलं हे जगाला कळू द्या, असे राज ठाकरे म्हणाले. तिकडे लहान लहान मुलांच्या ट्रीप गेल्या पाहिजे असे राज ठाकरे म्हणाले.
धर्माच्या नावाखाली नद्या बरबाद
नदी प्रदुषणाच्या मुद्यावर राज ठाकरेंनी भाष्य केलं. धर्माच्या नावाखाली आपण नद्या बरबाद करत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. सर्वांना आपापला धर्म प्रिय असतो, पण यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत असे राज ठाकरे म्हणाले. धर्माच्या गोष्टी मला सांगू नये कोणी असेही ठाकरे म्हणाले. मुंबईत पाच नद्या होत्या त्यातील चार नद्या मारल्या गेल्या आहेत. सांडपणी झोपडपट्यांमधून मारल्या गेल्या. आता मिठी नदी उरली आहे असे राज ठाकरे म्हणाले.
विद्युतदाहिन्या झाल्या पाहिजेत, जंगलतो़ड थांबली पाहिजे
सगळीकडे झाडं जगवा झाडे लावा असे बोर्ड लावले जातात. मात्र, दुसरीकडे हिंदुचे अंत्यसंस्कार लाकडावर होतात. जंगलतो़ड झाल्याशिवाय लाकूड येणार नाही. याला पर्याय म्हणून विद्युतदाहिन्या आल्या आहेत. देशभर विद्युतदाहिन्या झाल्या पाहिजेत असेही राज ठाकरे म्हणाले. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जंगलात गेले होते परदेशी माणसांबरोबर. पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे. त्यांना प्राण्यांचीही आवड आहे. जंगले जगवली पाहिजेत असेही राज ठाकरे म्हणाले. संजय गांधी नॅशनल पार्क मुंबईत आहे ते जगात कुठेही नाही. पण सध्या सगळीकडे जंगलतोड सुरु आहे असे राज ठाकरे म्हणाले.
प्रश्न पाण्याच्या स्थितीचा, कुंभमेळ्याचा अपमान नाही
देशातील नद्यांची भीषण अवस्था आहे. ज्याला आपण माता म्हणतो देवी म्हणतो त्या नद्यांकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष आहे असे राज ठाकरे म्हणाले. गंगा साफ करा असे प्रथम राजीव गांधी म्हणाले होते. तेव्हापासून गंगा साफ होत होते. पंतप्रधान मोदींनी 2014 साली तेच सांगितलं आहे. नद्यांची अवस्था बिकट आहे. कुंभमेळ्यात लाखो लोक अंघोळ केल्यानंतर आजारी पडले आहेत. प्रश्न पाण्याच्या स्थितीचा आहे. कुंभमेळ्याचा अपमान नाही असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरेंनी गंगेची स्थिती दाखवणार व्हिडीओ दाखवला. नैसर्गिक गोष्टीवर असा धर्म आडवा येत असेल तर काय करायंच त्या धर्माचं असा सवाल ठाकरेंनी केला.
चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत
चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. विकी कौशल मेल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान समजले काय? असा सवाल करत राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला. सध्या माथी भडकवण्याचे काम सुरु आहे. इतिहासाच्या मुळाला गेला ना तुमच्या अपेक्षांची भांडी फुटतील असे राज ठाकरे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज हा एक चमत्कार आहे. हा एक विचार आहे असे राज ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Raj Thackeray: मुंबईतील 4 नद्या 'वारल्या' नव्हे मारल्या, नद्यांवर बोलल्यावर धर्म आडवा येणार? राज ठाकरेंचा संतप्त सवाल























