एक्स्प्लोर

धक्कादायक... तीन वर्षांत महाराष्ट्रातून तब्बल 84 हजार महिला बेपत्ता, एनसीआरबीच्या आकडेवारीतलं भयावह सत्य

लातूरसह राज्यातल्या 14 जिल्ह्यात सुरु असलेली महिला आणि मुलींची तस्करी एबीपी माझानं उघड केल्यावर खळबळ उडाली. पोलिसांनी माझानं मांडलेली आकडेवारी कशी खोटी आहे असं सांगून आपले हात झटकले होते.

मुंबई : गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रातून 84 हजार 369 महिला आणि मुली बेपत्ता आहेत. धक्कादायक म्हणजे या महिलांचं काय झालं? त्या कुठे आहेत? या महिलांपैकी कितींचा पोलिसांनी शोध घेतला हे कुणालाही माहिती नाही. सर्वात आधी एबीपी माझानं महाराष्ट्रातून सर्वाधिक महिला आणि मुलं गायब झाल्याचं तपशीलवार दाखवून दिलं होतं. आता सर्वोच्च न्यायालयानं या आकडेवारीच्या घटनांची तपशीलवार विवेचन करण्याचे आदेश दिले आहेत. नेमक्या कोणत्या भागांमधून महिला आणि मुले गायब होत आहेत महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण आहे, याबाबतची माहिती विश्लेषण करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात 2016 साली 24 हजार 937, 2017 साली 28 हजार 133 तर 2018 साली 31 हजार 299 मराठी महिला आणि मुली गायब झाल्या आहेत. त्या कुठे आहेत ? काय स्थितीत आहेत? त्यातल्या किती पोलिसांनी शोधल्या याबाबत काहीही माहिती नाही. याबाबत सर्वात आधी एबीपी माझानं महाराष्ट्रात देशात सर्वाधिक महिला आणि मुलं गायब होण्याचे प्रमाण आहे हे तपशीलवार दाखवून दिलं होतं. लातूरसह राज्यातल्या 14 जिल्ह्यात सुरु असलेली महिला आणि मुलींची तस्करी एबीपी माझानं उघड केल्यावर खळबळ उडाली. पोलिसांनी माझानं मांडलेली आकडेवारी कशी खोटी आहे असं सांगून आपले हात झटकले होते. खरंतर लातूरमधून होत असलेल्या मुली महिलांच्या तस्करीचा नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थीं यांनी अंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेख केला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी हजारो मुली महिलांची तस्करी सुरू आहे. या मुलींची 80 हजारापासून 3 लाखापर्यंत विक्री सुरू असल्याची देखील माहिती आहे. माझाच्या टीमनं लातुरातल्या 10 जणांच्या टोळीनं 11 वर्षाच्या मुलीच्या केलेल्या विक्रीच्या प्रकरणाचा खोलवर तपास केला. लातूरतून तीनशेहून अधिक महिला मुली गायब असल्याचं दाखवून दिलं. हरवलेल्यांचा शोध घेण्याऐवजी लातूरच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी फक्त दोन वर्षांची आकडेवारी सादर केली. विधीमंडळाला संपूर्ण माहिती न देता अर्धवट माहिती दिली. आघाडी सरकारच्या काळात हर्षवर्धन पाटील महिला आणि बालविकास मंत्री असताना महिला आणि मुलींची तस्करी होत असलेल्या 14 जिल्ह्याची यादी बनवण्यात आली होती. देशात 27 लाख महिला तस्करी रॅकेटमध्ये अडकल्या आहेत. दरवर्षी 30 हजार महिला यात ढकलल्या जात आहेत. महिला तस्करीत कोलकाता पहिल्या क्रमांकाचं, मुंबई दुसऱ्या क्रमांकाचं शहर आणि महाराष्ट्र मुली महिलांमुळे गायब होण्यात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget