एक्स्प्लोर

Maharashtra Dam water Update: राज्यात मुसळधार पावसानं कोणती धरणं फुल्ल, कुठे सुरु विसर्ग? विभागनिहाय परिस्थिती अशी....

मागील काही दिवसांच्या पावसाने अनेक नद्यांना पूरसदृश्य स्थिती आली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातील धरणांचा उपयुक्त पाणीसाठा किती झालाय? कोणत्या धरणांमधून विसर्ग सुरु आहे? जाणून घ्या

Maharashtra Dam water Update: राज्यात सध्या घाटमाथ्यासह बहुतांश ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावलीय. मुसळधार पावसानं ओढे, नाले, झरे ओसंडून वाहतायत. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून धरणसाठ्यातही वाढ होताना दिसतेय. राज्यातील अनेक धरणे आता फुल्ल झाली आहेत, तर काही धरणांमध्ये वेगवेगळ्या धरणांच्या विसर्गाने, पावसाने वाढ होतानाचे चित्र आहे. मागील काही दिवसांच्या पावसाने अनेक नद्यांना पूरसदृश्य स्थिती आली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, जलसंपदा विभागानं राज्यातील धरणांचा उपयुक्त पाणीसाठा किती झालाय? कोणत्या धरणांमधून विसर्ग सुरु आहे, याबाबत आजचा अहवाल सादर केलाय.

अधिकृत माहितीनुसार, राज्यातील लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये 75.09 टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 11.85 टक्के अधिक पाणीसाठा झालाय. 

कोणत्या विभागात किती टक्के पाणीसाठा?

  • कोकण विभागातील एकूण 173 धरणांमध्ये 3586 दलघमी पाणीसाठा झाला असून कोकणातील धरणे 92.24 टक्के भरली आहेत.
  • पुणे विभागातील एकूण 720 धरणांमध्ये 88.15 टक्के पाणीसाठा झाला असून 16556 दलघमी पाणीसाठा या विभागात आहे. मागील वर्षी 69.79 टक्के पाणीसाठा झाल्यानं पुणेकरांची तहान भागणार आहे.
  • नाशिक विभागातील 537 धरणांमध्ये 72.82 टक्के पाणीसाठा झालाय. मागील दोन दिवसांत झालेल्या पावसानं नाशिक, नगर जिल्ह्यातील धरणांमध्ये मोठा पाणीसाठा आल्याचे सांगण्यात येतंय.
  • मराठवाडा विभागातील 920 धरणांमध्ये 39.70 टक्के पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षीच्या तुलनेत 31.48 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यात मागील काही दिवसात झालेल्या पावसाने वाढ झाली असून मराठवाड्यातील धरणे भरत असल्याचे चित्र आहे.
  • नागपूरच्या एकूण  383 धरणांमध्ये 80.37 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षाच्या तुलनेत साधारण 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. 
  • अमरावती विभागातील धरणे आता 70.82 टक्के भरली आहेत. एकूण 264 धरणांमध्ये 3453 दलघमी पाणीसाठा झाला आहे. मागील काही दिवसांपासून विदर्भात मोठा पाऊस होत असल्यानं धरणसाठ्यात वाढ झाली आहे.

कोणती धरणे फुल्ल? कुठून सुरु विसर्ग?

  • सध्या कोकणातील बहुतांश धरणे फुल्ल झाली असून बहुतांश धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ठाण्यातील बारावी धरण 100 टक्के भरले असून तानसा 98. 68% मोडक सागर 99.97% भातसा 94.73% भरलं. सध्या भातसा, सूर्या, वैतरणा व तिलारी नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 
  • नाशिक, नगरच्या धरणांमध्ये ही पाणीसाठ्यात मोठी वाढ दिसून आली आहे. नाशिक विभागातील बहुतांश धरणांमधून सध्या मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मराठवाड्यातील धरणांवरही त्याचा परिणाम होत आहे. सध्या दारणा, गोदावरी, प्रवरा, गिरणा, तापी व वाघुर नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत आहे. 
  • पुणे विभागात जोरदार पाऊस झाल्यानंतर आता बहुतांश धरणे भरत आली आहेत. नीरा देवघर, भाटकर, वीर धरणे १००% भरली आहेत. बहुतांश धरणांमधील पाणीसाठा हा 90 टक्क्यांच्या वर गेल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून दिसते. सध्या घोड, मुळा,मुठा, भीमा, निरा, कृष्णा, वारणा, दूधगंगा व भोगावती नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होतोय.

हेही वाचा:

Girna Dam : गिरणा धरण फुल्ल होण्याचा मार्गावर, कुठल्याही क्षणी विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Udayanraje and Shivendraraje Satara :साताऱ्यात दोन्ही राजे एकाच गाडीत, झापूकझुपूक गाणं लागताच हसले..Ajit Pawar in Pune Festival : पुणे फेस्टीव्हलच्या कार्यक्रमात अजित पवार यांची फटकेबाजीEknath Khadse On Devendra Fadnavis : फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती -  खडसेZero Hour : महाराष्ट्र काँग्रेसच्या न्याय पत्रात काय असेल? तीन पातळ्यांवर असणार काँग्रेसचा जाहीरनामा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
Amol Mitkari: 'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
Embed widget