एक्स्प्लोर

Assam Flood : आसाममध्ये 'जलप्रलय'! सुमारे 30 हजार लोकांना फटका, 175 गावं पाण्याखाली

Assam Flood Update : आसाममध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून सहा जिल्ह्यांना फटका बसला आहे. ज्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

आसाम : भारताच्या ईशान्येकडील आसाम राज्यात जलप्रलय आलं आहे. आसामधील सहा राज्यांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून हजारो नागरिकांना याचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) दिलेल्या माहितीनुसार, सहा जिल्ह्यातील सुमारे 30,000 लोकांना पुराचा फटका बसला आहे.  

आसाममध्ये भीषण पूरस्थिती

धेमाजी जिल्ह्यातील ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी अद्याप धोक्याची पातळीहून जास्त आहे. पुराचा सर्वाधिक फटका धेमाजी आणि दिब्रुगड जिल्ह्यांना बसला आहे. याचा थेट परिणाम धेमाजीमधील 19,163 आणि दिब्रुगड जिल्ह्यामधील सुमारे सहा हजार लोकांना बसला आहे. ASDMA नुसार, धेमाजी, दिब्रुगड, दररंग, जोरहाट, गोलाघाट आणि शिवसागर जिल्ह्यातील 175 गावं पाण्याखाली गेली आहेत.

पुरांमुळे हजारो नागरिकांना फटका, संसार उद्ध्वस्त

जोनई, धेमाजी, गोगामुख आणि सिस्सीबोरगाव महसूल मंडळातील 44 गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. याचा सर्वाधिक परिणाम सिस्सीबोरगाव भागात झाला आहे. येथे 10,300 हून अधिक लोक बाधित झाले आहेत. पुराचे पाणी पुढे सरकत असल्याने लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावं लागत आहे.

महापुरामुळे शेतीचं नुकसान

धेमाजी जिल्ह्यात एकूण 396.27 हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पूरग्रस्त सहा जिल्ह्यांतील 2,047.47 हेक्टर क्षेत्र पुराच्या पाण्यात बुडालं आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अद्यापही नदीचा प्रवाह धोक्याच्या पातळीच्या वरती आहे. याशिवय शिवसागरमधील डिखू नदी आणि गोलाघाट जिल्ह्यातील नुमालीगडमधील धनसिरी नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांच्या स्थलांतराचं कार्य प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

पुरामुळे जनावरांनाही फटका बसला

पुरामुळे फक्त माणसंचं नाही तर जनावरांनाही फटका बसला आहे. पुरामुळे सुमारे 20,000 हजार जनावरांना फटका बसला आहे. गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुशे धेमाजी जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांची दुरावस्था झाली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनामार्फत पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य सुरु आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासोबतच त्यांना अन्न पुरवण्याचं काम प्रशासनानाकडून सुरु आहे.

आसाममधील पूर ही 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' घोषित

आसाममध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेकांचा मृत्यू देखील झाला होता. तसेच शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसह घरांचं देखील मोठं नुकसान झालं. केंद्र सरकारनं आसाम राज्यातील पूर ही 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' म्हणून घोषित केल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली होती. केंद्र सरकारकडून बाधित लोकांचे पुनर्वसन करण्यात येणार असून, सरकार पुनर्वसनाचा 90 टक्के खर्च उचलणार असल्याची माहिती सरमा यांनी दिली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
NEET Exam : मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
विलासराव ते अहमद पटेलांपर्यंत, काँग्रेसचे राष्ट्रीय 'संकटमोचक', 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'मध्ये भाजपची ऑपरेशन लोटसची डाळ शिजू दिली नाही; जेलमध्ये जाऊनही डगमगले नाहीत, कोण आहेत डीके शिवकुमार?
विलासराव ते अहमद पटेलांपर्यंत, काँग्रेसचे राष्ट्रीय 'संकटमोचक', 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'मध्ये भाजपची ऑपरेशन लोटसची डाळ शिजू दिली नाही; जेलमध्ये जाऊनही डगमगले नाहीत, कोण आहेत डीके शिवकुमार?

व्हिडीओ

Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
Riteish Deshmukh on Raja Shivaji: रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
Embed widget