एक्स्प्लोर

Assam Flood : आसाममध्ये 'जलप्रलय'! सुमारे 30 हजार लोकांना फटका, 175 गावं पाण्याखाली

Assam Flood Update : आसाममध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून सहा जिल्ह्यांना फटका बसला आहे. ज्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

आसाम : भारताच्या ईशान्येकडील आसाम राज्यात जलप्रलय आलं आहे. आसामधील सहा राज्यांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून हजारो नागरिकांना याचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) दिलेल्या माहितीनुसार, सहा जिल्ह्यातील सुमारे 30,000 लोकांना पुराचा फटका बसला आहे.  

आसाममध्ये भीषण पूरस्थिती

धेमाजी जिल्ह्यातील ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी अद्याप धोक्याची पातळीहून जास्त आहे. पुराचा सर्वाधिक फटका धेमाजी आणि दिब्रुगड जिल्ह्यांना बसला आहे. याचा थेट परिणाम धेमाजीमधील 19,163 आणि दिब्रुगड जिल्ह्यामधील सुमारे सहा हजार लोकांना बसला आहे. ASDMA नुसार, धेमाजी, दिब्रुगड, दररंग, जोरहाट, गोलाघाट आणि शिवसागर जिल्ह्यातील 175 गावं पाण्याखाली गेली आहेत.

पुरांमुळे हजारो नागरिकांना फटका, संसार उद्ध्वस्त

जोनई, धेमाजी, गोगामुख आणि सिस्सीबोरगाव महसूल मंडळातील 44 गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. याचा सर्वाधिक परिणाम सिस्सीबोरगाव भागात झाला आहे. येथे 10,300 हून अधिक लोक बाधित झाले आहेत. पुराचे पाणी पुढे सरकत असल्याने लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावं लागत आहे.

महापुरामुळे शेतीचं नुकसान

धेमाजी जिल्ह्यात एकूण 396.27 हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पूरग्रस्त सहा जिल्ह्यांतील 2,047.47 हेक्टर क्षेत्र पुराच्या पाण्यात बुडालं आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अद्यापही नदीचा प्रवाह धोक्याच्या पातळीच्या वरती आहे. याशिवय शिवसागरमधील डिखू नदी आणि गोलाघाट जिल्ह्यातील नुमालीगडमधील धनसिरी नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांच्या स्थलांतराचं कार्य प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

पुरामुळे जनावरांनाही फटका बसला

पुरामुळे फक्त माणसंचं नाही तर जनावरांनाही फटका बसला आहे. पुरामुळे सुमारे 20,000 हजार जनावरांना फटका बसला आहे. गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुशे धेमाजी जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांची दुरावस्था झाली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनामार्फत पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य सुरु आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासोबतच त्यांना अन्न पुरवण्याचं काम प्रशासनानाकडून सुरु आहे.

आसाममधील पूर ही 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' घोषित

आसाममध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेकांचा मृत्यू देखील झाला होता. तसेच शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसह घरांचं देखील मोठं नुकसान झालं. केंद्र सरकारनं आसाम राज्यातील पूर ही 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' म्हणून घोषित केल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली होती. केंद्र सरकारकडून बाधित लोकांचे पुनर्वसन करण्यात येणार असून, सरकार पुनर्वसनाचा 90 टक्के खर्च उचलणार असल्याची माहिती सरमा यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Rahul Gandhi PM Modi house: पंतप्रधान मोदींच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी राहुल गांधींनी कसा तयार केला सिक्रेट प्लॅन? वाचा इनसाईड स्टोरी
पंतप्रधान मोदींच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी राहुल गांधींनी कसा तयार केला सिक्रेट प्लॅन? वाचा इनसाईड स्टोरी
Naseeruddin Shah On Violence With Students: 'सरकारला फक्त एकच सांगणं, सगळं लक्षात ठेवलं जाईल...'; जंतर-मंतरवर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, नसीरुद्दीन शाहांचा संताप
'सरकारला फक्त एकच सांगणं, सगळं लक्षात ठेवलं जाईल...'; जंतर-मंतरवर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, नसीरुद्दीन शाहांचा संताप
Uddhav Thackeray Abhijeet Dipke CJP Protest Delhi Jantar Mantar: जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO

व्हिडीओ

Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar and Ajit Pawar : 'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
Uddhav Thackeray Abhijeet Dipke CJP Protest Delhi Jantar Mantar: जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
Ajit Pawar and Sunetra Pawar: रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
Rahul Gandhi: एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
Ajit Pawar Birth Anniversary : दादा... काळीज पिळवटून निघतंय, सगळंच पोरकं झालंय; अजित दादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट, स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन
दादा... काळीज पिळवटून निघतंय, सगळंच पोरकं झालंय; अजित दादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट, स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
Uddhav Thackeray Abhijeet Dipke CJP Protest Delhi Jantar Mantar: मिठी मारली, पाठ थोपटली...; अभिजीत दीपके हात पकडून उद्धव ठाकरेंना मंचावर घेऊन आले, Photo
मिठी मारली, पाठ थोपटली...; अभिजीत दीपके हात पकडून उद्धव ठाकरेंना मंचावर घेऊन आले, Photos
Embed widget