एक्स्प्लोर

BLOG : नैसर्गिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन

पृथ्वीवर असणारी सर्व एनर्जी स्थिर आहे . त्यात घट वा वाढ होत नाही. तरीही सर्व सजीव सृष्टीची जी वाढ होते ती कशी होते आहे, तर सूर्योदय ते सूर्यास्त या काळात पृथ्वीवर सूर्यकिरणांच्या रूपाने सूर्यशक्ती येत असते. ही सुर्यशक्ती पकडण्याचे कार्य वनस्पतीची हिरवी पाने करत असतात. वनस्पती हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश यांच्या उपस्थितीत प्रकाश संशलेषण करून जी शक्ती बनवतात, तीच शक्ती वेग वेगळ्या रूपात सर्व सजीव सृष्टीत फिरत असते. हीच शक्ती वनस्पती लिक्वीड कार्बन च्या रूपात जमिनीतील सूक्ष्म जीवांसाठी पुरवतात .त्याच्या बदल्यात ही जमिनीतील सूक्ष्मजीव सृष्टी वनस्पतीला आवश्यक अन्नद्रव्ये पुरवतात. खरे तर ही एवढी सोपी पद्धत असताना जी स्वयंपूर्ण स्वयंपोशी स्वयंविकासी आहे,आपण मानवाने मात्र शेती करण्याच्या नावाखाली ती अत्यंत अवघड करून ठेवली आहे. या सृष्टीचे सृजन करण्यासाठी सूर्यप्रकाशाचा प्रत्येक कण हिरव्या पाना मार्फत पकडणे एवढे एकच काम करणे गरजेचे आहे. करोडो वर्ष निसर्ग हे काम मानवी हस्तक्षेपाशिवाय करत आला आहे आणि करत राहणार आहे. परंतु मानव आणि मानवाचे पाळीव प्राणी यात अनावश्यक लुडबुड करून बाधा आणत आहेत.

आधुनिक शेती शास्त्र मात्र, वनस्पती जमिनीतून मुळ्यांच्या मार्फत विद्रव्य ions च्या अवस्थेत अन्न द्रव्ये घेतात या एकखांबी तंबू सारखे राहिले आहे. परंतु , कातळावर दिमाखात उभे असणारे विशालकाय वृक्ष . भिंतीत उगवून वाढणारी पिंपळाची रोपे , ऐन उन्हाळ्यात चैत्र पालवी ने बहरून जाणारा कोरडवाहू कडुलिंब यासारख्या असंख्य उदाहरणाकडे अपवाद म्हणून शेती शास्त्र डोळेझाक करते.

मूलद्रव्य सारणी मध्ये शंभर पेक्ष्या जास्त मूलद्रव्ये असताना देखील खत म्हणून फक्त 16 अन्न द्रव्ये वापरून फोफसी वाढणारी पिके कीटक नाशक आणि बुरशी नशकाची गरज निर्माण करतात. जमिनीत काही अन्न द्रव्ये अत्यंत कमी तर काही अत्यंत ज्यादा असताना देखील दोन्हीही प्रकारची अन्न द्रव्ये जमिनीत टाका अशी अवघड शिफारस शेती शास्त्र करते. हवेत 78% नायट्रोजन चा महासागर असताना युरिया चा वापर करावा अशी शिफारस केली जाते.

अश्या प्रकारच्या सर्व विरोधाभासी शिफारसी असताना आम्ही मात्र मासानोबु फुकुओका यांच्या Do Nothing (वीना सायास) पद्धतीने शेती करतो.

विना नांगरणी ,
विना खुरपणी,
विना फवारणी आणि 
विना रसायन 
ही चार तत्वे पळून शेती सुरू करताच स्वयंपूर्ण स्वयंपोषी स्वयंविकासी निसर्ग त्याचे कार्य सुरू करतो 

विना नांगरणी:- 

आपल्या पायाखाली एक जग राहते जे वरच्या जगात असणाऱ्या वनस्पती साठी अन्न तयार करण्याचे कार्य करते . सतत नांगरणी करून या अश्या सूक्ष्म जीवांची घरे दारे मोडून त्यांच्या कार्यात आपण बाधा आणत असतो. विना नांगरणी सुरू करताच जमिनीची कण रचना तयार करणारे सूक्ष्म जिवाणू कार्यरत होतात. नांगरणी मुळे हवेत उडून जाणार कार्बन जमिनीतच रोखला जातो. कण रचना सुधारल्याने पावसाचे पाणी जमिनीत चांगले मुरते. कण रचना सुधारल्याने जमिनीत पोकळ्या तयार झाल्याने जमिनीत ऑक्सिजन चा संचार वाढतो. पिकांची मुळी आणि सर्व सूक्ष्म जिव सृष्टी यांच्यासाठी हा ऑक्सिजन अत्यंत आवश्यक असतो.

 विना खुरपणी:-  

तण हा आपल्या पुढचा प्रश्न नसून त्या त्या वेळी जमिनीत असणाऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे अत्यंत हलक्या जमिनीत फक्त कुसळ उगवते. ही गवते तिथेच कुजल्यानंतर हळु हळू रुंद पानाची गवते उगवतात. त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढल्यानंतर द्विदल तणे उगवतात. द्विदल तणामुळे जमिनीचे आरोग्य सुधारताच, तेथे झुडपे वाढू लागतात. झुडपानी तयार केलेल्या लिक्वीड कार्बन मुळे जमीन आणखी सुपीक होते. त्यानंतर तेथे वृक्ष वर्गीय वनस्पती उगवतात. वृक्ष वर्गीय वनस्पती नी वर्षभर सूर्यप्रकाशाचा वापर करून जो लिक्वीड कार्बन जमिनीत सोडलाजातो त्यामुळे जमीन सर्वोच्च पातळीवरील सुपीकता प्राप्त करते. जमीन जेवढे Bacteria Dominant तेवढी तणे ज्यादा, जसं जशी जमीन सुपीक बनते, तस तसे तणांचे प्रकार बदलतात व हळु हळु कमी होत जातात. जमीन Fungal Dominant होताच तणांचे कार्य संपल्याने तणे उगवणे बंद होतात परंतु वृक्ष वर्गीय वनस्पती उगवत राहतात. अश्या पद्धतीने निसर्ग एकपिक पद्धतीचे घनदाट जंगले तयार करतो.

विना फवारणी:- 

कोणत्याही प्रकारची फवारणी निसर्गातील सजीव सृष्टी साठी हानिकारक असते. सर अल्बर्ट हॉवर्ड म्हणतात तुमच्या पिकावर येणारे कीड आणि रोग हे तुमचे मित्र असून तुमचे कामकाज चुकते आहे, हे सांगण्यास आलेला दुत आहे. प्रत्येक सजीवाच्या जन्माचा उद्देश पुढची पिढी सशक्त तयार करणे हा आहे. सशक्त बीज वाढले पाहिजे आणि या स्पर्धेत अशक्त बीज नष्ट झाले पाहिजे यासाठी कीड आणि रोगाची निर्मिती आहे,त्यामुळे सुपीक जमिनीत सशक्त पिके असतील तर कोणत्याही फवारणी ची गरज राहणार नाही. हळु हळु आम्ही याचा प्रत्यय घेत आहोत .

विना रसायन:-

 जमिनीच्या सुपिकतेच्या पटीत त्यातील पीक उत्पादन देत असते, परंतु रसायने वापरून आपण अधिक चांगले पीक देण्यास जमिनीस भाग पाडतो. पिकाला अन्न द्रव्ये उपलब्ध करून देण्यासाठी जमिनीतील सूक्ष्म जीव सृष्टी जमिनीत साठलेला कार्बन वापरते आणि पिकाला ती अन्न द्रव्ये वीनासायास उपलब्ध होतात. खरे तर पिकाने प्रकाश संशलेशनातून बनवलेला लिक्वीड कार्बन जमिनीतील सूक्ष्म जीवांसाठी सोडणे अपेक्षित आहे. परंतु पिकाला विनासायास जमिनीतून अन्न द्रव्ये उपलब्ध झाल्याने पीक सूक्ष्म जीवांसाठी लिक्वीड कार्बन सोडत नाही, त्यामुळे जमिनीतील सूक्ष्म जीव सृष्टी ची उपासमार होते. आपण वापरलेली सर्व रसायने ,कीड नाशके ,बुरशी नाशके या सूक्ष्मजीवसृष्टी साठी हानिकारक आहेत. त्यामुळे या सूक्ष्मजीवसृष्टीचे कार्य हळु हळु मंदावत जाते. जमिनीत साठलेला सेंद्रिय कर्ब वापरून काही काळ रसायनाच्या मदतीने पिके चांगली येतात. परंतु जसं जसा सेंद्रिय कर्ब कमी होत जाईल तस तसे उत्पादन घाटात जाते आणि एक दिवस शेती परवडत नाही अशी अवस्था निर्माण होते. आम्ही याला घर जाळून कोळशाचा व्यापार म्हणतो . एक दिवस असा येतो राहायला घर नाही आणि विकायला कोळसा नाही. 

जास्तीत जास्त दिवस आणि जास्तीत जास्त वेळ सूर्यप्रकाश पकडणे म्हणजे शेती. मानवी प्रयत्नापेक्ष्या अत्यंत वेगाने निसर्ग स्वतः जमीन सुधारणा करतो आणि अत्यंत सशक्त अशी पिके घेता येतात याचा प्रत्यय आम्ही घेतो आहोत. सहा ते सात वर्षात आमचा एक आंब्याचा प्लॉट Fungal Dominant झालेलं आहे जमीन एवढी सुपीक झालेली आहे की तणे उगवणे जवळपास बंद झालेले आहे. परंतु त्याच वेळेस तिथे वृक्ष वर्गीय वनस्पती मात्र उगवत आहेत अंबा बाग काहीही न करता उत्तम उत्पादन देत आहे.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran War: अमेरिका–इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा परिणाम, जागतिक पातळीवर 'या' 10 गोष्टी बदलणार, भारतावर काय परिणाम होणार?
अमेरिका–इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा परिणाम, जागतिक पातळीवर 'या' 10 गोष्टी बदलणार, भारतावर काय परिणाम होणार?
जगातील पहिली दोन हजार महिलांची सैन्याची फलटण उभारणाऱ्य वीर राणी बेळवडी मल्लम्मा उत्सवाला प्रारंभ
जगातील पहिली दोन हजार महिलांची सैन्याची फलटण उभारणाऱ्य वीर राणी बेळवडी मल्लम्मा उत्सवाला प्रारंभ
Gold Silver Price Today: इराण- इस्त्रायल युद्धाचा भडका, सोन्या-चांदीचा भाव कडाडला! सोन्याच्या दरात 11 हजारांची वाढ, तर चांदी तीन लाखांच्या पार
इराण- इस्त्रायल युद्धाचा भडका, सोन्या-चांदीचा भाव कडाडला! सोन्याच्या दरात 11 हजारांची वाढ, तर चांदी तीन लाखांच्या पार
बाॅलिवुड कलाकार, खेळाडू अन् सेलिब्रेटींचं दुसरं घर झालेल्या दुबईमध्ये भारतीयांचा पुरता थरकाप! बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू म्हणाली,
बाॅलिवुड कलाकार, खेळाडू अन् सेलिब्रेटींचं दुसरं घर झालेल्या दुबईमध्ये भारतीयांचा पुरता थरकाप! बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू म्हणाली, "आम्ही दुबईमध्ये राहत होतो तिथं स्फोट झाला"
ABP Premium

व्हिडीओ

Tejas Express Delay : तेजस एक्सप्रेस ७ तास उशिराने, शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांचे हाल
Iran red flag : खामेनींच्या मृत्यूचा बदला, इराणच्या कोम शहरातील मशिदीवर लाल झेंडा
Ayatollah Ali Khamenei Death : इराण इस्लामिक क्रांतीचे नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा
Gadchiroli Old Lady Death Special Report बँकेच्या ढिसाळ कारभारानं महिलेचा जीव गेला,कुटुंबीयांचा आरोप
Israel US attack Iran Special Report : अमेरिका-इराण संघर्षाचा जगावर काय परिणाम?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran War: अमेरिका–इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा परिणाम, जागतिक पातळीवर 'या' 10 गोष्टी बदलणार, भारतावर काय परिणाम होणार?
अमेरिका–इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा परिणाम, जागतिक पातळीवर 'या' 10 गोष्टी बदलणार, भारतावर काय परिणाम होणार?
जगातील पहिली दोन हजार महिलांची सैन्याची फलटण उभारणाऱ्य वीर राणी बेळवडी मल्लम्मा उत्सवाला प्रारंभ
जगातील पहिली दोन हजार महिलांची सैन्याची फलटण उभारणाऱ्य वीर राणी बेळवडी मल्लम्मा उत्सवाला प्रारंभ
Gold Silver Price Today: इराण- इस्त्रायल युद्धाचा भडका, सोन्या-चांदीचा भाव कडाडला! सोन्याच्या दरात 11 हजारांची वाढ, तर चांदी तीन लाखांच्या पार
इराण- इस्त्रायल युद्धाचा भडका, सोन्या-चांदीचा भाव कडाडला! सोन्याच्या दरात 11 हजारांची वाढ, तर चांदी तीन लाखांच्या पार
बाॅलिवुड कलाकार, खेळाडू अन् सेलिब्रेटींचं दुसरं घर झालेल्या दुबईमध्ये भारतीयांचा पुरता थरकाप! बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू म्हणाली,
बाॅलिवुड कलाकार, खेळाडू अन् सेलिब्रेटींचं दुसरं घर झालेल्या दुबईमध्ये भारतीयांचा पुरता थरकाप! बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू म्हणाली, "आम्ही दुबईमध्ये राहत होतो तिथं स्फोट झाला"
Ayatollah Ali Khamenei: 'आम्ही आमच्या प्रिय नेत्याच्या हौतात्म्यासह चार शक्यता गृहित धरल्या होत्या' खामेंनीचा मृत्यूनंतरही इराणचा कडवा प्रतिकार; तेल अवीव दुबई ते कुवेतपर्यंत तब्बल 27 ठिकाणांवर हल्ला
'आम्ही आमच्या प्रिय नेत्याच्या हौतात्म्यासह चार शक्यता गृहित धरल्या होत्या' खामेंनीचा मृत्यूनंतरही इराणचा कडवा प्रतिकार; तेल अवीव दुबई ते कुवेतपर्यंत तब्बल 27 ठिकाणांवर हल्ला
Mojtaba Khamenei: वारसदार निवडण्यापूर्वीच अयातुल्लाह खामेनींचा लष्करी कारवाईत अंत झाल्याने इराण गंभीर वळणावर; खामेनींच्या निधनाने उत्तराधिकाराचा पेच अन् मुलासह पाच नावे आघाडीवर
वारसदार निवडण्यापूर्वीच अयातुल्लाह खामेनींचा लष्करी कारवाईत अंत झाल्याने इराण गंभीर वळणावर; खामेनींच्या निधनाने उत्तराधिकाराचा पेच अन् मुलासह पाच नावे आघाडीवर
Ayatollah Ali Khamenei: वयाच्या 11व्या वर्षी मौलवी, अमेरिकेचे तब्बल सात राष्ट्राध्यक्ष आणि इस्त्रायलच्या टार्गेटवर; झुंजले, झुंजवलं, पण अखेर सर्वोच्च धर्मुगुरु कुटुंबासह सापडले
अयातुल्ला अली खामेनी : वयाच्या 11व्या वर्षी मौलवी, अमेरिकेचे तब्बल सात राष्ट्राध्यक्ष आणि इस्त्रायलच्या टार्गेटवर; झुंजले, झुंजवलं, पण अखेर सर्वोच्च धर्मुगुरु कुटुंबासह सापडले
Nagpur Blast News: नागपूरच्या काटोलमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; 12 कामगारांचा मृत्यू, 15 जण जखमी
नागपूरच्या काटोलमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; 12 कामगारांचा मृत्यू, 15 जण जखमी
Embed widget