India: भारतातील 'या' अनोख्या गावात दोन देश; गावाचा प्रमुख जेवतो भारतात आणि झोपतो म्यानमारमध्ये
Two Nation Village: भारतात एक असं गाव आहे, ज्यात दोन देश वसले आहेत. या गावातील बहुतेक जण भारतात जेवतात आणि म्यानमारमध्ये झोपतात.
Nagaland: भारताला (India) लागून अनेक देशांच्या सीमा आहेत. भारत-पाकिस्तान बॉर्डर (India-Pakistan border) आणि भारत चीन बॉर्डर (Indo-China border) वगळता भारताच्या उर्वरीत भागाला लागून असलेल्या विविध देशांच्या बॉर्डरवर वेगवेगळं चित्र पाहायला मिळतं.
भारताच्या सीमेवर असं एक गाव आहे जे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या गावात दोन देश येतात. या गावाचा प्रमुख भारतात जेवतो आणि म्यानमारमध्ये झोपतो. या गावातील अनेक लोक असंच करतात, बहुतांश लोक भारतात जेवतात आणि म्यानमरमध्ये झोपतात. हे गाव नागालँड राज्यात येतं, या गावाचं नाव लोंगवा (Longwa Village) असं आहे.
नेमकं कुठे आहे हे गाव?
नागालँड राज्यातील मोन जिल्ह्यात लोंगवा नावाचं गाव आहे. हे गाव देशातील शेवटचं गाव म्हणून देखील ओळखलं जातं. निसर्गसौंदर्याने नलटलेलं हे गाव अतिशय सुंदर आहे. अनेक पर्यटक लोंगवा या गावात फिरण्यासाठी येतात. हे गाव भारत आणि म्यानमारच्या सीमेमुळे दोन भागात विभागलं गेलं आहे, यामुळेच लोंगवा गावातील रहिवाशांना दुहेरी नागरिकत्वाता लाभ मिळतो.
दोन्ही देशांमध्ये फिरू शकतात या गावचे लोक
लोंगवा या गावातील नागरिकांना दोन्ही देशांमध्ये मुक्तपणे फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. या गावातील बहुतेक घरांचा काही भाग हा भारतात आहे, तर काही भाग म्यानमार या देशात आहे. लोंगवा या गावातील काही मुलं भारतातील शाळेत जातात, तर काही मुलं म्यानमारमधील शाळेत शिकतात.
लोक जेवतात भारतात, झोपतात म्यानमारमध्ये
गावातील अनेक घरं दोन भागांत विभागली आहेत. अनेक घरांचा किचन भारतात आहे, तर बेडरुम म्यानमारमध्ये आहे. म्हणूनच येथील लोक जेवतात भारतात आणि झोपतात म्यानमारमध्ये, असं म्हटलं जातं. गावाच्या प्रमुखासोबत देखील हीच स्थिती आहे. तो देखील जेवतो भारतात आणि झोपतो म्यानमारमध्ये.
लोंगवा गावात मुख्य राजाचा राजमहाल
लोंगवा गावच्या नागरिकांना कोण्याक म्हणतात. कोण्याक ही भारतातील सर्वात दुर्मिळ आदिवासी जमात आहे. राजा 'आंग' यांचं प्रतिनीधीत्व करतो. कोण्याक लोक शत्रूच्या डोक्याच्या कवट्या गोळा करतात आणि त्या कवट्यांचा हार बनवून त्यांच्या गळ्यात घालतात. शत्रूला आपली ताकद दाखवण्यासाठी ते अशा प्रकारचा पोशाख परिधान करतात.
जवळपास पाच हजार वस्तीच्या या गावातील 742 घरं ही भारतात आहेत आणि 224 घरं ही म्यानमारमध्ये आहेत. राजा आंग याचा राजमहल 100 वर्षांहून अधिक जुना आहे. गावातील इतरांप्रमाणे आंग देखील भारतात जेवतो आणि म्यानमारमध्ये झोपतो. कारण, त्याच्या राजमहलाचा अर्धा भाग हा भारतात आहे, तर अर्धा भाग म्यानमारमध्ये आहे.
हेही वाचा:
YouTube: कशाबद्दल होता युट्युबच्या पहिला व्हिडीओ? 'या' प्राण्याबद्दल दिली गेली होती माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
and tablets