एक्स्प्लोर

तुम्हाला माहितीय? सफरचंद आणि कांदा यांची चव एकसारखी आहे, आम्ही असं का म्हणतोय 'हे' तुम्हीच वाचा...

Apple Onion Taste : हे वाचून जरी तुम्हाला विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे. सफरचंद आणि कांदा यांचा गंध म्हणजे वास वगळला तर, या दोन्हीची चव एकसारखी आहे.

Apple Onion Taste : तुम्हाला ही गोष्ट ऐकायला विचित्र वाटेल, पण हे अगदी खरं आहे. सफरचंद (Apple) आणि कांदा (Onion) यांची चव एकसारखी आहे. हे दोन्ही खाताना त्यांची चव एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहे. मग आम्ही असं का म्हणतोय, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. हा कोणताही विचित्र दावा नसून हे सत्य आहे. इतकंच नाही तर हे संशोधनातही उघड झालं आहे. एकीकडे गोड सफरचंद आणि दुसरीकडे रडवणारा कांदा हे वेगळे असताना त्यांची चव एकसारखी कशी? एका संशोधनानुसार, सफरचंद आणि कांदा यांचा वास वगळला तर त्यांची चव एकसारखीच असते. हे कोणत्या आधारावर आणि यामागचं नेमकं लॉजिक काय आहे जाणून घ्या.

सफरचंद आणि कांदा चवीला एकसमान

कांदा आणि सफरचंद चवीला एकसारखंच असल्याचं एक संशोधनात समोर आलं आहे. या संशोधनाच्या अहवालानुसार, जर कांदा आणि सफरचंद कापताना पाहिलं नाही आणि त्यांचा गंध म्हणजे वास दूर केला तर या दोन्हीची चव एकसारखीच असते. गंध वगळता सफरचंद आणि कांदा यांच्या चवीतील फरक ओळखणं फारच कठीण असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. ते कसं हे जाणून घ्या.

पदार्थाची चव त्याचा गंधावर अबलंबून

कोणत्याही गोष्टीची चव टेस्ट बड्स (Taste Buds) द्वारे ओळखली जाते. या पेशींमुळे मेंदूला पदार्थाची चव आणि सुगंध ओळखण्यास मदत होते. कोणत्याही पदार्थाची चव 80 टक्के त्याचा गंध म्हणजे त्याच्या वासावर अवलंबून असते. कोविडच्या काळात याचा अनुभव अनेकांना आला असेल. कारण जेव्हा वास घेण्याची क्षमता कमी होते, तेव्हा आपल्याला पदार्थाची चव कळत नाही. यामुळे कोविड काळात जेव्हा लोकांची वास येणं कमी झाली तेव्हा त्यांना अन्नाची चव समजत नव्हती. जास्ता थंडीच्या काळातही श्वास घेण्याच्या सवयीवर परिणाम झाल्याने जेवणाची चव कळतं नाही, असं अनेकदा होतं.

यामागचं कारण काय?

सफरचंद आणि कांदा यांची चव एकसारखी असण्यामागचं ही हेच कारण आहे. अनेक संशोधनांमध्ये ही बाब सिद्ध झाली आहे की, कांदा आणि सफरचंद चवीला एकसमान आहेत. काही संशोधनांमध्ये कांदा आणि बटाटा यांची चवही एकसारखी असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामागचं मूळ कारण म्हणजे या पदार्थांना त्यांची स्वतःची चव नसते. त्यांच्या गंधावर ही चव अवलंबून असते, त्यामुळे जर त्या पदार्थाला कोणताही गंध नसेल तर, या पदार्थांची चव एकसारखी असते, असं या अहवालात समोर आलं आहे.

संशोधनात काय समोर आलं?

या संशोधनाच्या अहवालानुसार, वेगळ्या वासामुळे पदार्थांची वेगळी चव निर्माण होते, कारण गंधामुळे आपल्याला चव ओळखण्यात मदत होते. त्यात गंध नसेल तर चवीत फरक पडत नाही. काही लोकांनी याचा प्रयोग देखील करुन पाहिला आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे हे संशोधन बर्‍याच प्रमाणात योग्य असल्याचं आढळलं आहे. तर काहींच्या मते, कांदा आणि सफरचंद यांना वास नसेल तरीही, ते त्यांची चव ओळखू शकतात. त्यांना पदार्थ वेगळे असल्याचं समजलं. दरम्यान, अनेक लोकांनी मान्य केलं की, पदार्थाच्या चवीवर वासाचा परिणाम होतो.

संबंधित इतर बातम्या : 

Apple Tea : वजन कमी करण्यासोबतच ह्रदयासाठीही फायदेशीर, ॲपल टीचे पिण्याचे 7 भन्नाट फायदे

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
Hind Al-Abbasi Viral News: सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
Kamakhya Temple Viral Video: मुलगा अन् मुलगी सोबत एकत्र दिसले, गर्दीतील लोकांचा बाटलीनं हल्ला, गुवाहाटीच्या कामाख्या मंदिर परिसरात नको तो प्रकार, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
मुलगा अन् मुलगी सोबत एकत्र दिसले, गर्दीतील लोकांचा बाटलीनं हल्ला, गुवाहाटीच्या कामाख्या मंदिर परिसरात नको तो प्रकार, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget