एक्स्प्लोर

Nashik Asaduddin Owaisi : वंचित बहुजन आघाडीसोबतची युती का तुटली? ओवेसींनी सांगितली मोठी गोष्ट

Nashik Asaduddin Owaisi : वंचित समाजाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न होता. मात्र आता युती कशी तुटली, हे कसं सांगू? असं असदुद्दीन ओवैसी म्हणालेत.

Nashik Asaduddin Owaisi : युतीतून बाहेर पडण्याचा सर्वस्वी निर्णय प्रकाश आंबेडकरांचा (Prakash Ambedkar) असून आम्ही बाळासाहेबांचा आजही, उद्याही आदर करतो. वंचित समाजाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न होता. मात्र आता युती तुटली, यावर काय बोलू शकतो. आमच्यासोबतची युती का तुटली ती मोठी गोष्ट आहे, आता कसं सांगू? या शब्दांत एमआयएम (MIM) आणि वंचितची युती का तुटली या प्रश्नाचे उत्तर असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रश्नांर्थक स्वरूपात दिले आहे. 

नाशिक (Nashik) दौऱ्यावर असदुद्दीन ओवेसी यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला (Vanchit bahujan Aaghadi) तडा का गेला याबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले कि शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होण्याचे निश्चित आहे. शिवसेना ठाकरे युतीचा सर्वस्वी निर्णय प्रकाश आंबेडकरांचा निर्णय असून आम्ही बाळासाहेबांचा आजही, उद्याही आदर करतो. वंचित समाजाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न होता. मात्र आता युती तुटली, यावर काय बोलू शकतो. आमच्यासोबतची युती का तुटली ती मोठी गोष्ट आहे, आता कसं सांगू?  आम्ही आज पण बाळासाहेब आंबेडकरांचा आदरच करतो, त्यांनी कोणासोबत युती करावी हा त्यांचा निर्णय असल्याचे ओवेसी यांनी स्पष्ट केले. 

ते पुढे म्हणाले, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी युती गेल्या अनेक वर्षांपासूनची होती. त्यावेळी तळागळतील घटकांसाठी आम्ही एकत्र आलो. लोकसभा निवडणूक लढवली. उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी एकत्र येऊन महाराष्ट्रातील जनतेला नवा पर्याय दिला. म्हणून वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने (MIM) युती केली. मात्र आता एकत्र नाही आहोत, प्रकाश आंबेडकर आता शिसवेना ठाकरे गटाशी युती करत आहेत, चांगली गोष्ट आहे. त्यावेळी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांचा होता. त्यांच्या या निर्णयाचा कालही आदर करत होतो. आजही करतो अन् पुढेही करत राहील. वंचित समाजाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न होता. पण आंबेडकर या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावर मी काय बोलू शकतो? आमच्यासोबतची युती का तुटली ती मोठी गोष्ट आहे. आता कसं सांगू? योग्य वेळी त्यावर बोलेल, असं असदुद्दीन ओवैसी म्हणालेत.

लव्ह जिहादवर ते म्हणाले.... 
लव्ह जिहाद कायद्याविषयी सरकारवर ताशेरे ओढले. ते यावेळी म्हणाले कि, भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आपला देश संविधानावर चालतो आहे. त्यामुळे संविधानानुसार कोणीही आपल्या आवडीनुसार विवाह करू शकतात, फिरू शकतात. मात्र भाजपची सत्ता ज्या ज्या राज्यात आहे, त्या ठिकाणी लव्ह जिहाद चा काय बनवला जात आहे. मात्र जे कोणी लव्ह जिहाद म्हणत आहेत असे किती लोक भाजपमध्ये आहेत त्यांनी अशी लग्ने केली आहेत. मग तेव्हा कायदा कसा अवलंबनार ? असा सवाल करत हा कायदा बेकायदेशीर असल्याचे ओवेसी म्हणाले. संविधानानुसार विवाह करण्याची परवानगी देखील संविधान देत, मग कोणी प्रेम करतंय तर तुम्हाला त्रास काय? प्रत्येक प्रश्नाला जातीयवादाचे रूप दिले जात आहे. ज्यांना जे आवडतंय ते करूद्या. आपल्याकडे बेरोजगारी, महागाई आणि ईतर खूप मुद्दे आहेत, त्यावर भर देणे आवश्यक असल्याचे ओवेसी म्हणाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik Asaduddin Owaisi : कोणी प्रेम करतंय तर तुम्हाला त्रास काय? प्रत्येक प्रश्नाला जातीयवाद, ओवेसी यांचा सरकारला सवाल 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget