एक्स्प्लोर

Bhagatsingh Koshyari : 'गेट वेल सून, कोश्यारी तात्या', नाशिकमधून राष्ट्रवादीचे सहा हजार पत्र 

Bhagatsingh Koshyari : राज्यपालांनी (Governor) महाराष्ट्राचा अवमान केल्याचा निषेधार्थ नाशिकमध्ये (Nashik) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (Nashik NCP) वतीने सहा हजार पत्र पाठविण्यास सुरुवात झाली आहे. 

Bhagatsingh Koshyari : 'मुंबईतून (Mumbai) गुजराती आणि राजस्थानी लोकं निघून गेले तर ईथे पैसाच उरणार नाही'.. महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राज्यपालांनी महाराष्ट्राचा अवमान केल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहे. नाशिकमध्ये (Nashik) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (Nashik NCP) वतीने अनोखे आंदोलन हाती घेण्यात आले आहे. शहरातून राज्यपालांना सहा हजार पत्र पाठविण्यास सुरुवात झाली आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात महाराष्ट्राची राजधानी मुंबईत संदर्भात वक्तव्य केले.  यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांनी देखील या विधानाचा निषेध व्यक्त केला आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नेत्यांनी यावर प्रखर शब्दात टीका केली आहे. तर अनेक ठिकाणी राज्यपालांच्या या वक्त्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आता याच मुद्यावरून नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सहा हजार पत्र पाठविण्याची मोहीम सुरू केली आहे.

राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पत्र पाठविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. यासंदर्भात राज्यपालांना हटवण्यासाठी राष्ट्रपतींना सहा हजार पत्र पाठवणार असल्याचे युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या संदर्भात राज्यपालांनी चुकीचे विधान केले आहे. राज्यपालांना हि चूक लक्षात आणून देण्यासाठी पत्र पाठवणार आहोत, अशी प्रतिक्रिया अंबादास खैरे यांनी दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यांवरून ठिक ठिकाणी आंदोलने करण्यात असून 'महाराष्ट्र द्वेष करण्याच्या आजारातून बरे व्हाल हिच अपेक्षा आम्ही व्यक्त करतो.. गेट वेल सून कोषारी तात्या' असा आशय त्यावर नमूद करण्यात आलाय. आज नाशिकच्या मुख्य टपाल कार्यालयापासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे..   

पत्रात काय म्हंटलय - 
राज्यपाल महोदय आपण सातत्याने महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करीत आहात. महाराष्ट्राचा एक युवक म्हणून आम्हाला प्रश्न पडला आहे की आपण राज्याच्या कल्याणासाठी राज्यपाल आहात की महाराष्ट्र द्वेष करण्यासाठी.. तरी आम्ही सर्वजण अशी प्रार्थना करतो की, आपण महाराष्ट्र द्वेष करण्याच्या आजारातून लवकर बरे व्हाल. राज्यपाल या घटनात्मक पदाची शपथ घेतांना आपण जी घटनात्मक शपथ घेतली होती तिचे प्रामाणिकपणे पालन कराल. तरी आपण महाराष्ट्र द्वेष करण्याच्या आजारातून बरे व्हाल हिच माफक अपेक्षा.. आपला राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहर

नेमकं प्रकरण काय?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी (29 जुलै) मुंबईतील चौकाच्या नामकरण सोहळ्याला हजेरी लावली. या चौकाचं नामकरण दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी चौक असं करण्यात आलं. यावेळी त्यांनी मुंबई-ठाण्यातील गुजराती आणि राजस्थानी लोकांबद्दल बोल्ट असताना त्यांनी मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. भाषणात राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही," असंही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget