एक्स्प्लोर

Kolhapur : विधवांनाही सन्मानाचं जीवन जगता येणार, विधवा प्रथा बंद करण्याचा हेरवाड ग्रामसभेचा ठराव

विधवा झाल्यानंतर त्या महिलेचं कुंकू पुसलं जातं, बांगड्या फोडल्या जातात, तिला कोणत्याही धार्मिक कार्यात सहभागी होता येत नाही. कोल्हापुरातील हेरवाडमध्ये हे आता बंद होणार आहे. 

कोल्हापूर: कोल्हापूर ही सामाजिक परिवर्तनाची भूमी आहे, अन् याची पुन्हा एकदा प्रचिती जिल्ह्यातील हेरवाड या गावाने दिली आहे. गावातील विधवांना सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी विधवा प्रथा बंद करण्याचा महत्वपूर्ण ठराव या गावच्या ग्रामसभेनं पारित केला आहे. पतीच्या निधनानंतर स्त्रीचं कुंकू पुसलं जातं, तिच्या हातातील बांगड्या फोडल्या जातात, मंगळसूत्र तोडलं जातं, जोडवी काढली जातात. आता ही प्रथा हेडवाडमध्ये बंद करण्यात आली आहे. 

हेरवाड (ता. शिरोळ) या गावच्या ग्रामसभेने विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतला आहे. गावचे सरपंच सुरगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा ठराव पारित करण्यात आला. सौ. मुक्ताबाई संजय पुजारी या ठरावाच्या सूचक असून सौ. सुजाता केशव गुरव यांनी त्याला अनुमोदन दिलं आहे. हा ठराव मांडताना गावातल्या सर्वच नागरिकांनी एकजुटीने त्याला पाठिंबा दिला असल्याचं सरपंच सुरगोंडा पाटील यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितलं. 

आपल्या समाजात पतीच्या निधनावेळी, अंत्यविधीवेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे असे प्रकार केले जातात. तसेच महिलेला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. या प्रथेमुळे महिलांच्या अधिकारावर गदा येते, म्हणजेच कायद्याचा भंग होतो. त्यामुळे विधवांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी हेरवाड गावामध्ये विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे. तशा प्रकारचा ठराव मंजूर करुन परिपत्रकही काढण्यात आलं आहे. 


Kolhapur : विधवांनाही सन्मानाचं जीवन जगता येणार, विधवा प्रथा बंद करण्याचा हेरवाड ग्रामसभेचा ठराव

विधवा प्रथा बंद करण्याची संकल्पना सर्वप्रथम करमाळ्याच्या प्रमोद झिंगाडे यांनी संरपंच परिषदेच्या माध्यमातून मांडल्याचं सुरगोंडा पाटील यांनी सांगितलं. गावागावात अशा प्रकारचे ठराव मांडायचे आणि यावर राज्य सरकारला कायदा करण्यास भाग पाडायचे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून हेरवाडने हा ठराव पारित केल्याचं सरपंच सुरगोंडा पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. 

कोल्हापुरातील हेरवाड या गावाने अशा प्रकारचा ठराव मांडून खऱ्या अर्थाने राज्यघटनेमध्ये अभिप्रेत असलेल्या समानतेकडे पुढचं पाऊल टाकलं आहे. हेरवाडची ही कृती पुरोगामी महाराष्ट्रासाठी दिशादर्शक असून अशा प्रकारचे ठराव राज्यातील प्रत्येक ग्रामसभेने मांडण्याची गरज आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar on Delhi Election : तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
Milkipur ByPoll Results : अखेर अयोध्येत कमळ फुलणार, मुख्यमंत्री योगींचा सपाला मोठा झटका, लोकसभेतील पराभवाचा वचपा काढला
अखेर अयोध्येत कमळ फुलणार, मुख्यमंत्री योगींचा सपाला मोठा झटका, लोकसभेतील पराभवाचा वचपा काढला
Delhi Assembly Election Results 2025: दिल्लीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही, पण तरीही फायद्यात; केजरीवालांची AAP पराभूत झाल्याने नेमकं काय घडलं?
दिल्लीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही, पण तरीही फायद्यात; केजरीवालांची AAP पराभूत झाल्याने नेमकं काय घडलं?
NDA Government In 19 States : तब्बल 27 वर्षांनी दिल्ली काबीज, 19 राज्यांमध्ये एनडीए सरकार, मध्य भारत पूर्ण व्यापला; मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये आठपैकी सहा राज्यात विजयश्री
तब्बल 27 वर्षांनी दिल्ली काबीज, 19 राज्यांमध्ये एनडीए सरकार, मध्य भारत पूर्ण व्यापला; मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये आठपैकी सहा राज्यात विजयश्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Arvind Kejriwal on Aap Defeat in Delhi Election : दिल्लीतील पराभवावर अरविंद केजरीवालांची प्रतिक्रियाDelhi BJP CM Face : 27 वर्षांआधी पाच वर्षांत 3 मुख्यमंत्री; दिल्लीत भाजपकडून मुख्यमंत्री कोण?Ekanth Shinde on Delhi Result 2025 : भाजपने दिल्ली जिंकली,आता मुंबईही  जिंकणार;एकनाथ शिंदे EXCLUSIVEABP Majha Headlines : 02 PM : 08 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Delhi Election : तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
Milkipur ByPoll Results : अखेर अयोध्येत कमळ फुलणार, मुख्यमंत्री योगींचा सपाला मोठा झटका, लोकसभेतील पराभवाचा वचपा काढला
अखेर अयोध्येत कमळ फुलणार, मुख्यमंत्री योगींचा सपाला मोठा झटका, लोकसभेतील पराभवाचा वचपा काढला
Delhi Assembly Election Results 2025: दिल्लीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही, पण तरीही फायद्यात; केजरीवालांची AAP पराभूत झाल्याने नेमकं काय घडलं?
दिल्लीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही, पण तरीही फायद्यात; केजरीवालांची AAP पराभूत झाल्याने नेमकं काय घडलं?
NDA Government In 19 States : तब्बल 27 वर्षांनी दिल्ली काबीज, 19 राज्यांमध्ये एनडीए सरकार, मध्य भारत पूर्ण व्यापला; मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये आठपैकी सहा राज्यात विजयश्री
तब्बल 27 वर्षांनी दिल्ली काबीज, 19 राज्यांमध्ये एनडीए सरकार, मध्य भारत पूर्ण व्यापला; मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये आठपैकी सहा राज्यात विजयश्री
Delhi Election : कोट्यवधी लोकांनी नोकऱ्या सोडून शत्रुत्व स्वीकारले, या सर्वांची हत्या एका स्वार्थी, चारित्र्यहीन माणसाने वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी केली; केजरीवालांवर माजी सहकाऱ्याची विखारी टीका
कोट्यवधी लोकांनी नोकऱ्या सोडून शत्रुत्व स्वीकारले, या सर्वांची हत्या एका स्वार्थी, चारित्र्यहीन माणसाने वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी केली; केजरीवालांवर माजी सहकाऱ्याची विखारी टीका
Delhi Election : माजी सीएम अरविंद केजरीवालांच्या झाडूच्या काड्या पार इस्कटल्या, पण सीएम आतिशींनी पक्षाची लाज राखली
माजी सीएम अरविंद केजरीवालांह आपच्या झाडूच्या काड्या पार इस्कटल्या, पण सीएम आतिशींनी पक्षाची लाज राखली
Parvesh Verma Delhi Election Result 2025: अरविंद केजरीवालांना हरवलं, राजधानीतील जायंट किलर, कोण आहे परवेश वर्मा?
अरविंद केजरीवालांना हरवलं, राजधानीतील जायंट किलर, कोण आहे परवेश वर्मा?
दिल्लीच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, एक है तो सेफ है चे दुसरे उदाहरण दिल्ली
दिल्लीच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, एक है तो सेफ है चे दुसरे उदाहरण दिल्ली
Embed widget