एक्स्प्लोर

नागरिकांना एका OTPवर मिळणार लोकसेवांची माहिती,अहमदनगर पोलिसांकडून राज्यातील पहिलाच उपक्रम

Ahmednagar police अहमदनगर पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील नागरिकांसाठी 'ई -टपाल' प्रणाली सुरू करण्यात आली आहे. राज्यात प्रथमच पोलीस विभागात अशी प्रणाली अहमदनगर जिल्ह्यात अमलात आणली गेली आहे.

अहमदनगर : अहमदनगर पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील नागरिकांसाठी 'ई -टपाल' प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या  'ई -टपाल' प्रणालीद्वारे जिल्ह्यातील नागरिकांना आपला अर्जाची नेमकी स्थिती कळणार आहे. आपला अर्ज नेमका कोणत्या टेबलवर आहे, कोणत्या अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज आहे याची माहिती आपल्या मोबाईलवर मिळणार आहे. या प्रणालीद्वारे आपला अर्ज किती दिवसांपासून प्रलंबित आहे हेही यातून समजणार आहे. त्यामुळे दप्तर दिरंगाईलाही आळा बसणार आहे. सोबतच नागरिकांना वारंवार पोलीस कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे होणारा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड नागरिकांना सोसावा लागणार नाही. राज्यात प्रथमच पोलीस विभागात अशी प्रणाली अहमदनगर जिल्ह्यात अंमलात आणली गेली आहे.

यासाठी अहमदनगर जिल्हा पोलीस विभागाच्या www.ahmednagardistpolice.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर नागरिकांना आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे , त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल तो टाकल्यानंतर आपल्या अर्जाची नेमकी काय स्थिती आहे ती नागरिकांना दिसणार आहे. नागरिकांसोबतच पोलीस दलाला देखील याचा फायदा होणार आहे. नागरिकांकडून येणारे अर्ज नेमक्या कोणत्या अधिकाऱ्याकडे प्रलंबित आहे , किती दिवसांपासून प्रलंबित आहे हे समजणार आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर देखील जबाबदारी निश्चिती होणार आहे. 

या अर्जाची मिळणार माहिती
1) सशुल्क बंदोबस्त
2) चारित्र्य पडताळणी 
3) पेट्रोल पंप 
4) सुरक्षा रक्षक एजन्सी
5) शस्त्र परवाना
6)स्फोटक परवाना
7)वाईन/ परमिट रूम

यासह इतर परवान्यांबाबत पोलीस विभागाकडे अर्ज केल्यानंतर अर्जाची सद्यस्थिती नागरिकांना मिळणार आहे.

अहमदनगर पोलीस विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. या 'ई- टपाल' प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ आणि पैसे वाचणार आहे तसाच फायदा पोलीस दलाचा देखील होणार आहे.अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असल्याने एखाद्या ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यातील एक टपाल जिल्हा कार्यालयात पाठवायचे असेल तर एक कर्मचारी जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवण्यासाठी त्यांचा त्या दिवसाचा पगार, जाण्या-येण्याचा खर्च , जेवण भत्ता याची बचत होणार आहे. महिनाभरात या प्रणालीमुळे शासनाचे 10 लाख रुपये वाचू शकतात असं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ABP माझाशी बोलताना सांगितले.

सोबतच मनोज पाटील यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने टपाल येतात त्याचा हिशोब ठेवणं खूपच गुंतागुंतीचे होते.मात्र, तंत्रज्ञानाचा वापर करून आता या अर्ज आणि टपालांचा हिशोब ठेवणं फार सोपं झालं आहे. सोबतच लोकसेवा हक्क अधिनियमाचं यामुळे पालन केलं जाऊ शकतं. आतापर्यंत या ई - टपाल प्रणालीचा वापर करून 33 हजार 275 अर्ज अहमदनगर पोलीस दलाकडे प्राप्त झाले होते त्यापैकी केवळ 1 प्रकरण प्रलंबित असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

ही प्रणाली सुरू करण्यासाठी कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी अर्थसहाय्य केल्याचं मनोज पाटील यांनी सांगितले. हा राज्यासाठी पथदर्शी उपक्रम असून याचा वापर सर्वच सरकारी कार्यालयांनी केला तर निश्चितच नागरिकांसह शासकीय कर्मचाऱ्यांना फायदा होऊ शकतो असं मतं पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget