Maharashtra Political Crisis LIVE: राज्यातील शिंदे सरकार बचावलं; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूनं
Maharashtra Political Crisis Live Updates: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात फैसला अवघ्या काही तासांत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा फैसला होणार, निकाल एकमतानं येण्याची शक्यता
LIVE

Background
Maharashtra Politics : अजूनही 16 आमदारांच्या निर्णयावर सरकारचे भवितव्य, निकालानंतर नरहरी झिरवाळ असं का म्हणाले?
Maharashtra Politics : सद्यस्थितीत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे 16 आमदारांचा निर्णय अद्याप येणे बाकी आहे, त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारचे भवितव्य त्यावर अवलंबून असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) म्हणाले आहे.
Uddhav Thackeray: शिंदे गटाच्या आम्हीच शिवसेना दाव्यावर 'सर्वोच्च' ताशेरे;पक्ष आणि चिन्हावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Uddhav Thackeray: गेल्या 11 महिन्यांपासून अंधांतरी असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेवेळी केलेल्या प्रत्येक कृतीवर ताशेरे ओढले आहेत. फुटलेला गट बचावासाठी मूळ पक्ष असल्याचा दावा करु शकत नाही, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या आम्हीच शिवसेना यावरून सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दात शिंदे गटाला फटकारले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे.
CM Eknath Shinde : घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने कालबाह्य केलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Maharashtra Political Crisis : आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा लोकशाहीमध्ये अपेक्षित असलेला निकाल होता, अखेर सत्याचा विजय झाला अशी पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आमचं सरकार घटनाबाह्य आहे असं म्हणणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने आज कालबाह्य केलं आहे असंही ते म्हणाले.
Maharashtra Political Crisis: 'राजीनामा नसता दिला तर...'; सर्वोच्च न्यायालयाच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले...
Uddhav Thackeray On Supreme Court Verdict: आज सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) निर्णय दिला. यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं एका मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाची टिप्पणी केली आणि राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. सर्वोच्च न्यायालयानं शिंदेंसह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर ताशेरे ओढले, पण तरीही शिंदे सरकार स्थिर राहिलं त्यासाठी कारण ठरलं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा राजीनामा. उद्धव ठाकरेंनी स्वखुशीनं राजीनामा दिला, त्यांनी राजीनामा दिली नसता, तर सरकार पुन्हा आणलं असतं, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाच्या याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मी राजीनामा दिला नसता तर मी परत मुख्यमंत्री झालो असतो, पण ही लढाई माझ्यासाठी नाहीये, जनतेसाठी आहे, लोकशाहीसाठी आहे, असं म्हटलं आहे.
आता काही शंका नाही ना कोणाला? काहीजण पराभवाचे फटाके फोडतायत; शिंदेंचा ठाकरे गटाला टोला
#MaharashtraPoliticalCrisis आता काही शंका नाही ना कोणाला? काहीजण पराभवाचे फटाके फोडतायत; शिंदेंचा ठाकरे गटाला टोला #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray https://t.co/wo06V7OAFq pic.twitter.com/7UL8Ka3ANh
— ABP माझा (@abpmajhatv) May 11, 2023
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
