एक्स्प्लोर

Agriculture News : बिहार सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, केळी उत्पादकांना मिळणार 50 टक्के अनुदान 

Agriculture News : बिहार सरकारनं (Bihar Government) राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Agriculture News : शेती क्षेत्रात सातत्यानं नव नवीन प्रयोग केले जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकरी (Farmers) चांगलं उत्पादन घेत आहेत. कमी खर्चात चांगल उत्पादन घेण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी विविध राज्यातील सरकारे शेती क्षेत्राला प्रोत्साहन देत आहेत. आता बिहार सरकारनं (Bihar Government) राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केळी (Banana) उत्पादक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. 

शेतकऱ्यांच्या खिशावरचा भार कमी होणार

शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी बिहार सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकार केळी उत्पादक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या खिशावरचा भार कमी होणार आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी केळीची लागवड करतात. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. आता राज्य सरकार टिश्यू कल्चर पद्धतीनं केळीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणार आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्क्यांपर्यंतचं अनुदान दिलं जाणार आहे. बिहार सरकारच्या फलोत्पादन संचालनालयाने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.

टिशू कल्चर म्हणजे काय?

एका पेशीपासून संपूर्ण वनस्पतीची, झाडाची, रोपाची निर्मिती करणे म्हणजे 'टिशू कल्चर' असे म्हणता येईल. ही निर्मिती कृत्रिमरीत्या तयार केलेल्या वातावरणात वा प्रयोगशाळेत केली जाते. याला टोटी पोटन्सी असा शब्द वापरला जातो. प्राण्यांच्या एकाच पेशीपासून असे बनत नाही म्हणून त्यांना 'प्युरोपोटंट' असे समजले जाते. त्यासाठी क्लोनिंगची पद्धत वापरली जाते. यामध्ये कमी वेळात केळीची झाडे तयार केली जातात. झाडे अधिक निरोगी असतात. 

62500 रुपयांची बचत होईल

एक हेक्टरमध्ये केळीची लागवड करण्यासाठी सुमारे 1.25 लाख रुपयांचा खर्च येतो. या खर्चावर राज्य सरकार 50 टक्के अनुदान देते. अशा प्रकारे शेतकर्‍यांची थेट 62500 रुपयांची बचत होणार आहे. म्हणजेच निम्मी रक्कम शेतकर्‍यांकडून आणि अर्धी रक्कम राज्य सरकारच्या पातळीवरुन दिली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचा केळी उत्पादकांना मोठा फटका, मदत देण्याची मागणी 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : भूषण गगराणींचा पीए असल्याचं भासवून उकळले तब्बल 71 लाख, 'असा' सापडला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात
भूषण गगराणींचा पीए असल्याचं भासवून उकळले तब्बल 71 लाख, 'असा' सापडला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात
Akola News : अकोल्यात 'नीट'च्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
अकोल्यात 'नीट'च्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
Temperature Update: उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 01 March 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्सDonald Trump Argument : युद्धविराम करा, नाहीतर अमेरिकेचा पाठिंबा विसरा, ट्रम्प यांचा इशाराABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 01 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सSpecial Report | Prashant Koratkar | इंद्रजीत सावंतांना धमकी, तीन दिवसांपासून गुंगारा, कोरटकर आहे कुठे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : भूषण गगराणींचा पीए असल्याचं भासवून उकळले तब्बल 71 लाख, 'असा' सापडला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात
भूषण गगराणींचा पीए असल्याचं भासवून उकळले तब्बल 71 लाख, 'असा' सापडला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात
Akola News : अकोल्यात 'नीट'च्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
अकोल्यात 'नीट'च्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
Temperature Update: उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
Chhagan Bhujbal : प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
Indrajit Sawant : सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
Sanjay Raut : तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
Embed widget