एक्स्प्लोर

Wheat Price : गव्हाच्या किंमतीत 14 टक्क्यांची तर पिठाच्या किंमतीत 18 टक्क्यांची वाढ, केंद्र सरकारनं उचलंल 'हे' पाऊल

Wheat Price : देशात गव्हाच्या (Wheat) किंमतीबरोबर पिठाच्या (Flour) किंमतीतही मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे.

Wheat Price in India : देशात गव्हाच्या (Wheat) किंमतीबरोबर पिठाच्या (Flour) किंमतीतही मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. पिठाच्या किंमतीत 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर गव्हाच्या किंमतीत 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. गव्हाच्या पिठाची किंमत 34 ते 45 रुपये प्रतिकिलो आहे. तर देशाच्या विविध भागांत गव्हाच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. सध्या बाजारत गहू 3 हजार 200 ते 3 हजार 300 रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं (Government) खुल्या बाजारात 30 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं गव्हाच्या किंमतीत आणि पिठाच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. 

अन्नधान्याच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने पावले उचलत आहे. देशात गव्हाचे दर अनेक दिवसांपासून वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडलं आहे. अशातच सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसू नये यासाठी गव्हाचे दर लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आहे. गव्हाच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आता एक मोठे पाऊल उचलले आहे. 30 लाख मेट्रिक टन गहू खुल्या बाजार विक्रीसाठी आणला जाणार आहे. देशातील गहू आणि पिठाच्या वाढत्या किंमतीवर तोडगा काढण्यासाठी, गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील मंत्री गटाची बैठक झाली होती. या बैठकीत देशातील बफर स्टॉकच्या स्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली होती.

ई-लिलावाद्वारे होणार गव्हाची विक्री 

भारतीय अन्न महामंडळाकडे (FCI) बाजारात गहू उतरवण्याची जबाबदारी आहे. ई-लिलाव म्हणजेच, ई-लिलावाद्वारे खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत गहू बाजारात आणला जाणार आहे. गव्हाचा साठा आटा मिलर्स आणि देशातील मोठ्या घाऊक खरेदीदारांना टेंडरद्वारे विकला जाईल. बाजारात गव्हाचा खप वाढला तर मागणी तेवढी राहणार नाही, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे गहू आणि पिठाच्या दरात घसरण होऊ शकते. गव्हाचे दर 34 रुपयांवरून 29 रुपये किलोपर्यंत येतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गव्हाला 2350 रुपये प्रतिक्विंटल भाव दिला जाईल

देशातील गव्हाच्या किमती कमी करण्यासाठी सहकारी आणि सरकारी कंपन्यांनाही गहू दिला जाणार आहे. केंद्र सरकारकडून केंद्रीय भांडार, एनसीसीएफ आणि नाफेडलाही गहू दिला जाणार आहे. केंद्र सरकार त्यांना 2 हजार 350 रुपये प्रति क्विंटल दराने टेंडरशिवाय गहू विकणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Wheat prices :  सर्वात मोठ्या गहू उत्पादक राज्यात गव्हाचा तुटवडा, किंमतीत 5 टक्क्यांची वाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 26 March 2025Uddhav Thackeray Video | उद्धव ठाकरे हरामखोर कुणाला म्हणाले? राम कदम यांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Embed widget