एक्स्प्लोर

Maharashtra Politics : मतदारांना अधिकार असतात का?

Maharashtra Political Crisis : आजचं राजकारण पाहिलं की सर्वांना एकच प्रश्न पडतो, मतदारांना काही अधिकार आहेत का? कारण मतदान होईपर्यंत जो मतदारराजा असतो त्याची मतदानानंतरची अवस्था 'गरज सरो वैद्य मरो'सारखी झालेली असते. त्यानंतर पाच वर्षे तो काहीही करू शकत नाही. ही परिस्थिती बदलायला हवी, असं आता सर्वांना वाटू लागलंय. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे काही वर्षांत बदललेलं राजकारण आणि नेत्यांच्या बदललेल्या निष्ठा.

कुणी कोणत्या पक्षातून उभं राहायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र जिंकल्यानंतर त्या पक्षाशी त्याची निष्ठा असायलाच हवी, ही किमान अपेक्षा मतदारांनी ठेवायला काय हरकत आहे? कारण विजयात पहिला वाटा संबंधित पक्षाचा असतो. त्यामुळे कायदा, नियम असले तरी दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर संबंधित नगरसेवक, आमदार किंवा खासदाराकडे लोकप्रतिनिधीपदाचा राजीनामा देण्याची नैतिकता असलीच पाहिजे. कारण तसं न करणं ही मतदारांशी पहिली प्रतारणा असते. जो लोकप्रतिनिधी त्याच्या पक्षाशी निष्ठा ठेवू शकत नाही त्याची निष्ठा लाखो मतदारांशी असेल, यावर शेंबडं पोरतरी विश्वास ठेवेलं का?

एक चर्चा आपल्याकडे वारंवार होत असते, ती म्हणजे लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार मतदारांना मिळायला हवा. जे लोकप्रतिनिधी सभागृह आणि जनतेच्या कामात अजिबात सक्रिय नाहीत, त्यांना परत बोलावण्याचा अधिकार मतदारांना मिळण्यात चुकीचं काय? अनेक ठिकाणी निवडून आलेले आमदार आणि खासदार त्यांच्या मतदारसंघाकडे ढुंकूनही पाहात नाही. ते सभागृहात हजर नसतात पण बाहेर बोलबच्चनगिरी करत कॉलर टाईट करून हिंडत असतात. असले लोकप्रतिनिधी काय कामाचे? दुर्दैव म्हणजे अशाच लोकप्रतिनिधींचा आपल्याकडे बोलबाला होताना दिसतो. जनतेच्या प्रश्नांवर सभागृहात मौन आणि बाहेर मोठमोठ्या बाता, शेरोशायरी, डॉयलॉग मारणारे नेते जिंकून येतात. हा त्यांचा विजय असतो की तो मतदारांचा पराभव असतो, यावर मतदारांनाही सखोल चिंतन करण्याची वेळ आलीय. 

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झालीत. पण मतदाराला कुठलेच अधिकार नाहीत. ज्यांच्या मतावर आमदार, खासदार निवडून येतात, कायदे बनवतात, नियम बनवतात ते मतदारांना कुठलेच अधिकार का देत नाहीत, याचा विचार करण्याची वेळ आलीय. निवडून आलेल्या आमदार, खासदारांना भेटण्यासाठी मतदारांना खेटे मारावे लागतात, त्यांच्या पीए, सेक्रेटरींना फोनवर फोन करावे लागतात. त्यानंतरही लोकशाहीचा पाय असलेल्या त्या मतदाराची कुणी दखल घेत नाही. काही आमदार, खासदार, मंत्री वगैरे हुशार असतात. ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दरबार भरवतात. लोकशाहीत दरबार भरवणं हेच मुळी राजेशाहीचं लक्षण आहे, हेच कुणाच्या लक्षात येत नाही. म्हणूनच एक प्रश्न वारंवार सतावतो, हे लोकप्रतिनिधी नक्की कुणाला बांधिल असतात?

याच लेखकाचे इतर लेख : 

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, आयोगानं कारवाई करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Nashik Nagarparishad Election: नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, आयोगानं कारवाई करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Nashik Nagarparishad Election: नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Hardik Pandya :  हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे दर जाणून घ्या
Nagar Parishad and nagar panchayat Election: पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
Embed widget