एक्स्प्लोर

BLOG | मी, माझं कोकण आणि गणेशोत्सव!

कोकणी माणसाने आजही आपल्या मातीशी असलेली नाळ जोडून ठेवलीय. चाकरमानी भलेही शहरात एसी ऑफीसमध्ये बसून काम करतो. मात्र गावी गेल्यावर शेतात, आपल्या वाडीत तो राबतो.

कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती हिरवाई, निळाशार अथांग समुद्र, नागमोडी वळणाचे रस्ते, कौलारु घरं, नारळी-पोफळीच्या बागा आणि समुद्राचा मेवा म्हणजे हरतऱ्हेचे मासे.. मन तृप्त करणारं आणि काहींसाठी जिभेचे चोचले तर काहींसाठी दोन वेळच्या पोटाची खळगी भरणाऱ्या माश्यांचा मुबलक साठा असणारं असं माझं कोकण. कोकणी माणूस हा अल्पसंतुष्ट, मेहनती आणि फणसासारखा रसाळ.. त्याच्यात बडेजावगिरी नाही. जे आहे त्यात समाधान मानणारा, दुसऱ्याच्या ताटातलं ओरबाडून खाणं त्याला माहित नाही. जी मीठ भाकर तो मिळवतो, त्यात बाप्पाचं नाव घेऊन सुखी समाधानी राहतो.

कोकणी माणसाने आजही आपल्या मातीशी असलेली नाळ जोडून ठेवलीय. चाकरमानी भलेही शहरात एसी ऑफीसमध्ये बसून काम करतो. मात्र गावी गेल्यावर शेतात, आपल्या वाडीत तो राबतो. पिढीजात जमिनीवर तितकंच प्रेम करतो. कोकणी माणसासाठी वर्षातले दोन सण म्हणजे दसरा, दिवाळीच.. ते म्हणजे शिमगा आणि गणेशोत्सव.. या दोन सणांसाठी चाकरमान्यांची पावलं आपसूकच आपल्या गावाकडे वळतात. या दोन सणांना सुट्टी मिळावी म्हणून तो वर्षभर सुट्ट्या जमवतो. आणि हे दोन सण आपल्या गावात, आपल्या मातीशी एकरुप होऊन साजरा करतो.

यंदाचा गणेशोत्सव हा मी आतापर्यंत पाहिलेल्या गणेशोत्सवापेक्षा खूप वेगळा ठरला. आजी, आजोबा, नातवंड, सुना, जावई, लेकरं, बाळांसहीत जाणारा चाकरमानी यंदा आपल्या घरातच थांबून बाप्पापुढे हात जोडतो. आणि भाऊबंधकीतल्या माणसांकडून खंड पडू नये म्हणून बाप्पाला गावच्या घरात आणतो. व्हॉटअॅप व्हिडिओ कॉलवरुन बाप्पाची आरती करतो. आणि बाप्पाला डोळे भरुन पाहतो. डोळ्यात टचकन पाणीही येतं. पण काय करणार? बाप्पाला सर्वकाही माहिती आहे. यावेळी कोरोना आहे ना.. यंदा तुझ्या सेवेत नाही, मात्र पुढच्या वर्षी धूमधडाक्यात याही वर्षाची कसर भरुन काढेन, असं बाप्पाशी हितगूज करतो. गणपती आणि कोकणी माणसाचं नातं शब्दात उतरवणं हे कठीणच..

कोकणी माणसाला आडमूठी भूमीका घेणं माहित नाही. जर तो हट्टी असता तर आपल्या घरातल्या पोरा-ढोरांसह, काहीही झालं तरी चालेल, असं म्हणत आपल्या गावी पोहोचलाच असता. मात्र परिस्थितीचं भान ठेवून वागलेल्या कोकणी माणसाचा मला अभिमान आहे. लॉकडाऊन काळात ईपास , क्वारंटाईन, टेस्टचे नियम सातत्याने बदलले. मात्र नियमांचं उल्लंघन होऊ न देता, जिल्ह्याच्या हद्दीजवळ सर्व नियमांचं पालन केलं गेलं. मुंबईपासून शेकडो किलोमिटरचा प्रवास, वाहनांच्या लांबच लांब रांगा, धो-धो कोसळणारा पाऊस, लहानग्यांना मांडीवर बसवून केलेला प्रवास हे कोकणी माणसाच्या सहनशीलतेचं एक मूर्तीमंत उदाहरण.

यंदा कोकणातल्या प्रत्येक गावाने कोरोनाला आपल्या हद्दीत शिरकाव करु द्यायचा नाहीच, असा चंग बांधून नियम तयार केले. शहरातून, गावाबाहेरुन येणाऱ्यांसाठी गावाच्या वेशीजवळ क्वारंटाईनची सोय, त्यांच्या खाण्या पिण्याची सोय गावकऱ्यांनी केली. लॉकडाऊन काळात गावात अडकलेल्या चाकरमान्यांनी वेळेचा सदुपयोग करत विहीर खोदत गावाचा पाणीप्रश्न मिटवल्याच्याही बातम्या पाहिल्या.

गावाचं नाव जरी काढलं तरी कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसतं. कदाचित हीच त्याची सकारात्मक ऊर्जा आहे. या ऊर्जेमुळेच कोकणी माणसाने लॉकडाऊन आणि सणवाराचे दिवस संयमाने काढले. बाप्पा आणि त्याच्यामध्ये डिस्टन्सिंग असलं तरी त्याच्या भक्तीत डिस्टन्सिंग कधीच येणार नाही. निसर्गाने कोकणाला भरभरुन दिलंय आणि कोकणी माणसाला संयमी आणि सृजनशील बनवलंय. यंदाचं वर्ष गणेशोत्साविना सरलं मात्र हे संकट लवकर टळो आणि पुढच्या वर्षी जल्लोषात बाप्पाचं स्वागत करायला मिळो.. हीच बाप्पा चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया!

वृषाली यादव यांचे अन्य ब्लॉग

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
Embed widget