एक्स्प्लोर

Champions Trophy: मोठी बातमी, भारत पाकिस्तानला जाणार नाही, पाकिस्तान भारतात येणार नाही, चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत नेमकं काय ठरलं? 

ICC Champions Trophy 2025: भारत आणि पाकिस्तान 2027 पर्यंत एकमेकांच्या देशात आमने सामने येणार नाहीत. याची अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते.

ICC Champions Trophy Update नवी दिल्ली: भारत 2027 पर्यंत पाकिस्तानचा दौरा करणार नाही. पाकिस्तान देखील कोणत्याही मालिकेसाठी भारतात 2027 पर्यंत येणार नाही. यासंदर्भातील अधिकृत घोषणा 7 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. आयसीसीनं आज होणारी बैठक 7 डिसेंबरला घेण्यचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेल लागू करण्यात आल्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. 

चॅम्पियन्स ट्रॉफी, महिला वर्ल्ड कप, आशिया कप असो किंवा भारत आणि श्रीलंकेत  2026 मध्ये आयोजित केला जाणारा टी 20 वर्ल्ड कप असो दोन्ही संघ एकमेकांच्या देशांचा दौरा करणार नाहीत. सध्याच्या माध्यमांच्या प्रसारण हक्कांचा कालावधी 2027 ला संपणार असल्यानं तो निर्णय घेण्यात आला आहे. भारत या काळात पाकिस्तानचा दौरा करणार नाही, याशिवाय पाकिस्तान देखील भारतात येणार नाही. 

जय शाह यांनी आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर दुबईमधील मुख्यालयात हजेरी लावली. यावेळी त्यांनी आयसीसीचे संचालक, स्टाफ आणि माध्यम हक्क भागिदारांची भेट घेतली. जय शाह यांनी आजचा दिवस संस्मरणीय करण्यासाठी आयसीसीच्या संचालकांचे आभार मानले.  

भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत, अंतिम फेरीत प्रवेश केल्यास मॅचेस दुबईत होण्याची शक्यता आहे. भारत उपांत्य फेरीत पोहोचू न शकल्यास ते सामने लाहोरमध्ये होऊ शकतात.  तर, स्पोर्टस तकच्या वृत्तानुसार आयसीसीनं पीसीबीला अतिरिक्त रक्कम  देण्यास नकार दिल्याची माहिती आहे.    

पाकिस्तान देखील भारतात येणार नाही, पीसीबीची विनंती मान्य?

भारतानं सुरक्षेच्या कारणावरुन पाकिस्तानला न जाण्याचा निर्णय घेतला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन हायब्रीड मॉडेलनं करावं अशी भूमिका भारताची होती. 2023 च्या आशिया कप प्रमाणं चॅम्पियन्स ट्रॉफीत देखील हायब्रीड मॉडेल लागू करावं, असं भारतानं म्हटलं होतं. ती मागणी मान्य करण्यात आली असून त्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल. 2023 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. आता मात्र 2027 पर्यंत पाकिस्तान देखील भारताचा दौरा करणार नाही, अशी शक्यता आहे. याबाबतची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसात होऊ शकते. 

दरम्यान,  पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जाणार आहे. फेब्रुवारी- मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जाणार आहे. भारतानं 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. 

इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04PM 13 March 2025Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha | 13 March 2025Buldhana Farmer Death | पाण्याच्या संघर्षाला कंटाळून शेतकरी कैलास नागरे यांनी संपवलं जीवनABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 13 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
Nashik Crime : दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलिसांनी मृतदेह वरती काढला अन्..
दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलिसांनी मृतदेह वरती काढला अन्..
Weather Update : होळीपूर्वीच गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानमधील अनेक भाग उष्णतेच्या तडाख्यात; 40 अंशांचा टप्पा ओलांडला
होळीपूर्वीच गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानमधील अनेक भाग उष्णतेच्या तडाख्यात; 40 अंशांचा टप्पा ओलांडला
छत्रपती शिवरायांचा जन्मच मुघल आक्रमण संपवण्यासाठी झाला होता, अमोल मिटकरींचा इतिहास कच्चा, भातखळकरांचा हल्लाबोल
छत्रपती शिवरायांचा जन्मच मुघल आक्रमण संपवण्यासाठी झाला होता, अमोल मिटकरींचा इतिहास कच्चा, भातखळकरांचा हल्लाबोल
Embed widget