एक्स्प्लोर

IND vs SL : भारताच्या फलंदाजांची हाराकिरी, रोहित शर्मा ते शिवम दुबे सगळेच फेल, श्रीलंकेनं 27 वर्षानंतर मालिका जिंकली

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरी वनडे पार पडली आहे. श्रीलंकेनं भारताला 110 धावांनी पराभूत करत विजय मिळवला आहे.

IND vs SL, कोलंबो:भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका संपली आहे. श्रीलंकेनं (Sri Lanka) पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 विकेटवर 248 धावा केल्या होत्या. भारतापुढं (Team India) विजयासाठी 249 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र, पहिल्या दोन मॅचप्रमाणं तिसऱ्या वनडेमध्ये भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांपुढं संघर्ष करताना पाहायला मिळाले. भारतीय संघ 138 धावांवर बाद झाल्यानं श्रीलंकेनं तब्बल 110  धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेपुढं भारतीय संघानं तब्बल 27 वर्षांनी एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावली आहे.  

भारताचा दारुण पराभव

भारतीय संघ तिसऱ्या वनडेमध्ये पराभूत  झाला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली,रियान पराग आणि वॉशिंग्टनं सुंदर यांनी डावाची चांगली सुरुवात करुन देखील ते मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. शुभमन गिल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, शिवम बे, कुलदीप यादव यांना 10 धावांचा टप्पा देखील ओलांडता आला नाही. अखेर श्रीलंकेनं तिसऱ्या मॅचमध्ये भारताचा 110 धावांनी पराभव केला. 

रोहित शर्मानं आज 35  धावा केल्या. विराट कोहली 20, रियान पराग 15 तर वॉशिंग्टन सुंदरनं 30 धावा केल्या.  भारताचे इतर फलंदाज दोन अंकी धावसंख्या देखील करु शकले नाहीत. त्यामुळं भारताला 110  धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

श्रीलंकेकडून दुनिथ वेल्लालगेनं 5 विकेट घेत भारताच्या टीमचं कंबरडं मोडलं. श्रीलंकेच्या फिरकीपुढं भारताच्या फलंदाजांना अपयश आलं.  भारतानं तब्बल 27 वर्षानंतर श्रीलंकेविरुद्ध मालिका गमावली आहे. 1997 नंतर पहिल्यांदा श्रीलंकेनं भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली मॅच टाय झाली. यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये श्रीलंकेनं भारताला 32  धावांनी पराभूत केलं. तर, तिसऱ्या मॅचमध्ये भारताचा 110  धावांनी पराभव झाला.  

भारताचे फलंदाज तिन्ही सामन्यात श्रीलंकेच्या फिरकीपटूंसमोर संघर्ष करताना पाहायला मिळाले. भारताचा संघ तिन्ही सामन्यात बाद झाला. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी भारताच्या 27 विकेट घेतल्या. वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालगे, चारिथ असलंका आणि जेफरी वेंडरसे यांनी भारताच्या फलंदाजीला सुरुंग लावला.

श्रीलंकेनं सनथ जयसूर्याच्या मार्गदर्शनात ही पहिला मालिका जिंकली आहे. भारतानं यापूर्वी 1997 मध्ये श्रीलंकेविरुद्ध मालिका गमावली होती. त्या मालिकेत सनथ जयसूर्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार देण्यात आला होता. 

संबंधित बातम्या :

Shubman Gill : शुभमन गिलचा पाय बाऊंड्रीला लागल्याचा दावा, श्रीलंका बोर्डानं शेअर केलेल्या फोटोवरुन तर्क वितर्क

IND vs SL : सिराज अन् कुशल मेंडिस भिडले पण कार्यक्रम झाला समरविक्रमाचा, पाहा मैदानावर नेमकं काय घडलं?

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Embed widget