एक्स्प्लोर
U19 Asia Cup 2021 Final : अंडर 19 आशिया कप भारताच्या खिशात, आठव्यांदा केली कामगिरी
india
1/8

दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर भारताच्या अंडर-19 संघाने आशिया चषकाचा अंतिम सामना जिंकत चषकावर नाव कोरलं आहे.
2/8

या विजयासह भारतानं आठव्यांदा आशिया चषक खिशात घातलं आहे.
3/8

भारताने श्रीलंका संघाला 9 विकेट्सने मात देत हा सामना जिंकला आहे.
4/8

या सामन्यात नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
5/8

श्रीलंकेच्या संघाला 38 षटकात 106 धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र, डेकवर्थ लुड्सच्या नियमानुसार भारताला 102 धावांचे लक्ष्य मिळालं. हे लक्ष्य भारतीय संघानं एक विकेट्स गमावून 22 व्या षटकातच पूर्ण केलं.
6/8

भारताचा सलामीवीर हरनूर सिंह स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर अंगक्रिश रघुवंशीनं नाबाद 56 धावांची खेळी केली. यात सात चौकारांचा समावेश आहे.
7/8

अंडर-19 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं एकदाही पराभव स्वीकारलेला नाही. भारताच्या विजयाचं संपूर्ण देशभरातून कौतुक केलं जातंय.
8/8

या विजयानंतर अनेक माजी खेळाडूंसह सर्व स्तरातून भारतीय संघाच कौतुक करण्यात येत आहे. (P.C. - BCCI Twitter)
Published at : 31 Dec 2021 08:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion