एक्स्प्लोर

मागील 27 वर्षात मुंबईच्या तापमानात 2 अंश सेल्सिअसची वाढ, मुंबई, नवी मुंबईसह ठाण्याला महापुराचा धोका

मागील 3 दशकात जमीन वापराच्या पद्धतीत झालेले बदल आणि अर्बन हिट आयलॅण्ड इफेक्टमुळे मुंबईतील तापमानात मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील तापमानात मागील 27 वर्षात सरासरी 2 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

मुंबई : गेल्या तीन दशकात मुंबईतील बांधकाम क्षेत्रात 66 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मागील 3 दशकात जमीन वापराच्या पद्धतीत झालेले बदल आणि अर्बन हिट आयलॅण्ड इफेक्टमुळे मुंबईतील तापमानातसुद्धा मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील तापमानात मागील 27 वर्षात सरासरी 2 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. 1991 ते 2018 या काळात मुंबईतील 81 टक्के मोकळ्या जागा, 40 टक्के हिरवळ क्षेत्र आणि 30 टक्के जलक्षेत्र गमावल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. तसेच मुंबई, नवी मुंबईसह ठाण्याला महापुराचा धोका असल्याचेही या अभ्यासात सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात मागील 5 वर्षात एकाच वेळी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि तीव्र दुष्काळाच्या नोंदी झाल्या आहेत. राज्यात मागच्या 5 वर्षात सर्वच जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी झाली आहे. महाराष्ट्रातील 50 टक्के जिल्ह्यांमध्ये 5 ते 7 घटनांची नोंद झाली आहे. 31 जिल्ह्यांमध्ये एकूण 175 घटानांची अतिवृष्टीमध्ये नोंद झाली असून, 36 जिल्ह्यांमध्ये 189 घटनांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. मागील दशकभरात 79  तीव्र दुष्काळाच्या महाराष्ट्रात नोंदी झाल्या आहेत. 2000 ते 2009 या काळात 23 तीव्र दुष्काळाच्या घटना आहेत. तर 1990 ते1999 या काळात 17 घटनांची नोंद आहे.

मुंबई, नवी मुंबईसह ठाण्याला महापुराचा धोका
किनारपट्टी भागातील शहरांबद्दल सुद्धा काही महत्त्वपूर्ण नोंदी करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याला 2050 पर्यंत महापुराचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. 1991 ते 2018 सालामध्ये मुबईतील तापमान 2 अंश सेल्सिअसने वाढले आहे. कांक्रिटीकरण, पाणथळ जागा नष्ट होणे, खारफुटी क्षेत्राचा ऱ्हास होणे आणि मुंबईतले हिरवळ क्षेत्र कमी होत असल्याने तापमानात वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.  दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडून आयपीसीसी अहवाल आणि महाराष्ट्रातल्या नोंदींसंदर्भात महत्त्वपूर्ण सादरीकरण करण्यात आले होते. 

अर्बन हिट आयलॅण्ड म्हणजे?
‘हिट आयलॅण्ड’ म्हणजे शहरीकरण झालेला असा भाग, ज्यामध्ये त्यापासून अलग असलेल्या भागापेक्षा खूप अधिक तापमान अनुभवायला मिळते. इमारती, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा अशा रचनांमध्ये जंगल आणि जलक्षेत्रे यासारख्या नैसर्गिक ठिकाणांपेक्षा अधिक प्रमाणात सूर्याची उष्णता शोषली आणि पुन्हा उत्सर्जित केली जाते. शहरी भागातील संरचना ही खूप अधिक प्रमाणात केंद्रीकृत झालेली असते आणि हरितकरणाचे प्रमाण मर्यादित असते, अशावेळी या केंद्रापासून अलग असलेल्या भागाच्या तुलनेत शहरात उच्च तापमानाचे ‘बेट’ तयार होते. शहरी भागातील तापमान हे अलग असलेल्या भागापेक्षा दिवसा 1 ते 7 अंश सेल्सिअसने आणि रात्री २ ते ५ अंश सेल्सिअसने अधिक असते.

महत्त्वाच्या बातम्या:

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार
डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Embed widget