एक्स्प्लोर

मागील 27 वर्षात मुंबईच्या तापमानात 2 अंश सेल्सिअसची वाढ, मुंबई, नवी मुंबईसह ठाण्याला महापुराचा धोका

मागील 3 दशकात जमीन वापराच्या पद्धतीत झालेले बदल आणि अर्बन हिट आयलॅण्ड इफेक्टमुळे मुंबईतील तापमानात मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील तापमानात मागील 27 वर्षात सरासरी 2 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

मुंबई : गेल्या तीन दशकात मुंबईतील बांधकाम क्षेत्रात 66 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मागील 3 दशकात जमीन वापराच्या पद्धतीत झालेले बदल आणि अर्बन हिट आयलॅण्ड इफेक्टमुळे मुंबईतील तापमानातसुद्धा मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील तापमानात मागील 27 वर्षात सरासरी 2 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. 1991 ते 2018 या काळात मुंबईतील 81 टक्के मोकळ्या जागा, 40 टक्के हिरवळ क्षेत्र आणि 30 टक्के जलक्षेत्र गमावल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. तसेच मुंबई, नवी मुंबईसह ठाण्याला महापुराचा धोका असल्याचेही या अभ्यासात सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात मागील 5 वर्षात एकाच वेळी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि तीव्र दुष्काळाच्या नोंदी झाल्या आहेत. राज्यात मागच्या 5 वर्षात सर्वच जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी झाली आहे. महाराष्ट्रातील 50 टक्के जिल्ह्यांमध्ये 5 ते 7 घटनांची नोंद झाली आहे. 31 जिल्ह्यांमध्ये एकूण 175 घटानांची अतिवृष्टीमध्ये नोंद झाली असून, 36 जिल्ह्यांमध्ये 189 घटनांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. मागील दशकभरात 79  तीव्र दुष्काळाच्या महाराष्ट्रात नोंदी झाल्या आहेत. 2000 ते 2009 या काळात 23 तीव्र दुष्काळाच्या घटना आहेत. तर 1990 ते1999 या काळात 17 घटनांची नोंद आहे.

मुंबई, नवी मुंबईसह ठाण्याला महापुराचा धोका
किनारपट्टी भागातील शहरांबद्दल सुद्धा काही महत्त्वपूर्ण नोंदी करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याला 2050 पर्यंत महापुराचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. 1991 ते 2018 सालामध्ये मुबईतील तापमान 2 अंश सेल्सिअसने वाढले आहे. कांक्रिटीकरण, पाणथळ जागा नष्ट होणे, खारफुटी क्षेत्राचा ऱ्हास होणे आणि मुंबईतले हिरवळ क्षेत्र कमी होत असल्याने तापमानात वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.  दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडून आयपीसीसी अहवाल आणि महाराष्ट्रातल्या नोंदींसंदर्भात महत्त्वपूर्ण सादरीकरण करण्यात आले होते. 

अर्बन हिट आयलॅण्ड म्हणजे?
‘हिट आयलॅण्ड’ म्हणजे शहरीकरण झालेला असा भाग, ज्यामध्ये त्यापासून अलग असलेल्या भागापेक्षा खूप अधिक तापमान अनुभवायला मिळते. इमारती, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा अशा रचनांमध्ये जंगल आणि जलक्षेत्रे यासारख्या नैसर्गिक ठिकाणांपेक्षा अधिक प्रमाणात सूर्याची उष्णता शोषली आणि पुन्हा उत्सर्जित केली जाते. शहरी भागातील संरचना ही खूप अधिक प्रमाणात केंद्रीकृत झालेली असते आणि हरितकरणाचे प्रमाण मर्यादित असते, अशावेळी या केंद्रापासून अलग असलेल्या भागाच्या तुलनेत शहरात उच्च तापमानाचे ‘बेट’ तयार होते. शहरी भागातील तापमान हे अलग असलेल्या भागापेक्षा दिवसा 1 ते 7 अंश सेल्सिअसने आणि रात्री २ ते ५ अंश सेल्सिअसने अधिक असते.

महत्त्वाच्या बातम्या:

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde On Vidhan Parishad Election 2026: शिवसेनेतूनच नावाला विरोध, तरीही विधान परिषदेसाठी नीलम गोऱ्हेंना उमेदवारी; एकनाथ शिंदे म्हणाले, मालकांचा...
शिवसेनेतूनच नावाला विरोध, तरीही विधान परिषदेसाठी नीलम गोऱ्हेंना उमेदवारी; एकनाथ शिंदे म्हणाले, मालकांचा...
Eknath Shinde : बच्चू कडू दिव्यांग, शेतकरी, गोर-गरीबांचा नेता, उमेदवारीसाठी नव्हे तर सर्व घटकांना न्याय देण्यासाठी हाती भगवा; पक्ष प्रवेशानंतर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेकडू नीलम गोऱ्हे, बच्चू कडूंच्या नावावर शिक्कामोर्तब! एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंच स्वागत, पक्ष प्रवेशानंतर म्हणाले, उमेदवारीसाठी नव्हे तर...
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 All Candidate List: 10 जागा, 10 उमेदवार...भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत..., विधान परिषदेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी!
10 जागा, 10 उमेदवार, भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत...,विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी
Mumbai Crime News: रात्री 11-12 वाजता अंधारात शॅडोला पकडलं अन्...; मालाडमध्ये पाळीव कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; माणुसकीला काळिमा फासणारी घटना
रात्री 11-12 वाजता अंधारात शॅडोला पकडलं अन्...; मालाडमध्ये पाळीव कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; माणुसकीला काळिमा फासणारी घटना

व्हिडीओ

Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: हेलिकॉप्टरमधून प्रथमच नौदल जहाजविरोधी मिसाईल यशस्वी प्रक्षेपित; काही सेकंदांत दोन मिसाईली डागल्या, गरज पडल्यास दिशा सुद्धा बदलणार
Video: हेलिकॉप्टरमधून प्रथमच नौदल जहाजविरोधी मिसाईल यशस्वी प्रक्षेपित; काही सेकंदांत दोन मिसाईली डागल्या, गरज पडल्यास दिशा सुद्धा बदलणार
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
Donald Trump: 'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Embed widget