एक्स्प्लोर

देशात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत वाढ, जाणून घ्या कोणत्या राज्यात काय आहे निर्बंध!

Coronavirus Omicron restriction in India : ओमायक्रॉन बाधितांच्या बाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह इतर राज्यांनी निर्बंध लागू केले आहेत.

Coronavirus Omicron Updates India :  देशात कोरोनाचा व्हेरियंट ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. अनेक राज्यांनी खबरदारीचे उपाय आखण्यास सुरुवात केली आहे. भारतातील 17 राज्यांमध्ये 415 बाधिते आढळली आहेत. तर, 115 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.  महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी विविध निर्बंध जाहीर केले आहेत.

जगातील 108 देशांमध्ये या व्हेरियंटचे आतापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. तर, 26 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत 17 राज्यांमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे 415 प्रकरणे समोर आले आहे. त्यापैकी 115 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 108 ओमायक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. भारतात ओमायक्रॉनमुळे आतापर्यंत एकही जणाचा मृत्यू झाला नाही. 

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना संपूर्ण जग करत असून काळजी घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे. वर्षाच्या शेवटी होणारे उत्सव, कार्यक्रमांमध्ये गर्दी न करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. गर्दीची ठिकाणे आणि अनावश्यक प्रवास न करण्याचे आवाहनही सरकारने केले आहे. 

 

देशात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत वाढ, जाणून घ्या कोणत्या राज्यात काय आहे निर्बंध!

 

जाणून घ्या कोणत्या राज्यात कोणती निर्बंध :

उत्तर प्रदेश: ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता, उत्तर प्रदेशमध्ये आजपासून रात्रीच्या वेळी संचार बंदी (कर्फ्यू) लागू होणार आहे. आजपासून म्हणजेच २५ डिसेंबरपासून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत हा नाईट कर्फ्यू लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवा आणि रुग्णवाहिका यासारख्या अत्यावश्यक वाहनांच्या वाहतुकीला परवानगी असणार आहे. 

गुजरात: गुजरातमधील 8  प्रमुख शहरांमध्ये रात्रीच्या कर्फ्यूच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. या 8 शहरांमध्ये रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल.

हरियाणा: हरियाणामध्येही आज रात्रीचा कर्फ्यू लागू होणार आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल.

महाराष्ट्र: महाराष्ट्रात आज रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू राहणार आहे. राज्यभरात एकाच ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मुंबई महापालिकेने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता दुबईहून मुंबईत येणाऱ्यांना ७ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे.

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातही रात्रीचा कर्फ्यू लागू आहे. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भस्म आरतीसाठी सर्वसामान्य भाविकांच्या प्रवेशावर पुन्हा एकदा बंदी घालण्यात आली आहे. उज्जैनच्या इतिहासात दुसऱ्यांदा भस्म आरतीमध्ये लोकांना प्रवेश बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

छत्तीसगड: छत्तीसगड सरकारने धार्मिक आणि सामाजिक सण आणि नवीन वर्षाच्या कार्यक्रमांमध्ये केवळ 50 टक्के लोकांनाच सहभागी होण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

तिरुमाला तिरुपती: तिरुमला तिरुपती देवस्थानम्स (TTD) ने सांगितले की, तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिरात जाण्यासाठी भाविकांना संपूर्ण लसीकरण प्रमाणपत्र किंवा 48 तासांपूर्वी केलेल्या कोविड-19 चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल आणावा लागणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा आणणार, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद : नरेंद्र मोदी
पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा आणणार, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद : नरेंद्र मोदी
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget