एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

'या' वस्तूंच्या निर्यातीवरील बंदी कायम राहणार, मंत्री पियूष गोयलांची माहिती 

देशात खाद्यपदार्थांच्या किमती वाढू नयेत, यासाठी सरकारनं अनेक वस्तूंच्या निर्यातीवर निर्बंध (Export Ban) लादलेत. अशातच आता वाणिज्य मंत्री पियुष गोयल  (Piyush Goyal) यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

Export Ban: देशात खाद्यपदार्थांच्या किमती वाढू नयेत, यासाठी सरकारनं अनेक वस्तूंच्या निर्यातीवर निर्बंध (Export Ban) लादले आहेत. अशातच आता वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी या वस्तूंच्या निर्यातीवरील बंदी कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवरील बंदी उठवली जाणार नाही, अशी माहिती मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. अर्थसंकल्पापूर्वीच सरकारनं ही मोठी घोषणा केली आहे.

गहू, तांदूळ आणि साखरेवरील निर्यातबंदीबाबत सरकारने पुन्हा एकदा परिस्थिती स्पष्ट केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्टपणे सांगितले की, या खाद्यपदार्थांच्या निर्यातीवरील बंदी सध्या उठवली जाणार नाही. केंद्र सरकार अशा कोणत्याही प्रस्तावावर विचार करत नाही. देशात गहू आणि साखरेची पुरेशी उपलब्धता असल्याचेही ते म्हणाले. त्याच्या आयातीची गरज भासणार नाही असंही त्यांनी सांगितले.

निर्यातबंदी हटवण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव नाही

केंद्र सरकारकडे निर्यातबंदी हटवण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव नाही. देशांतर्गत मागणीमुळं गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याचे पियुष गोयल यांनी सांगितले. आमच्याकडे त्यांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात आहे. आमच्या देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला त्यांची आयात करण्याचीही गरज नसल्याचे गोयल म्हणाले.

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलण्यात आली

भारताने मे 2022 मध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यानंतर जुलै 2023 मध्ये गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. याशिवाय ऑक्टोबर 2023 मध्ये साखर निर्यातीवरही बंदी घालण्यात आली होती. देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ही पावले उचलली होती. याशिवाय भारत आटा आणि भारत दालही स्वस्त दरात बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तांदूळ इंडोनेशिया, सेनेगल आणि गॅम्बियाला पाठवले

निर्यातीवर बंदी असतानाही भारताने आपले मित्र देश इंडोनेशिया, सेनेगल आणि गांबिया यांना तांदूळ पुरवला आहे. निर्यातीवरील बंदी उठताच त्यांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे गोयल यांनी सांगितले. सरकार 19 ते 23 रुपये प्रतिकिलो दराने शेतकऱ्यांकडून मुबलक प्रमाणात कांदा खरेदी करत आहे. कांद्याचे भाव वाढल्यानंतर त्याच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. किरकोळ चलनवाढीचा दर डिसेंबर 2023 मध्ये 5.69 टक्क्यांवर गेला आहे. हा जर चार महिन्यांतील उच्चांकीवर पोहोचला आहे. 

कमी पावसाचा गहू, तांदूळ आणि ऊस उत्पादनावर परिणाम

कमी पावसामुळं गहू, तांदूळ आणि ऊसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळं मैदा, तांदूळ, साखर महाग होऊ लागली आहे. यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळं देशांतर्गत बाजारपेठेत या वस्तूंची उपलब्धता वाढावी, यासाठी सरकारने या वस्तूंची निर्यात तातडीने बंद केली होती. मात्र, सरकारच्या या निर्णयाचा निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे तब्बल हजार कोटीचे नुकसान, विवाह सोहळ्यांनाही बसला फटका

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

DA Hike News: बँक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्ता वाढीची घोषणा, पगार किती रुपयांनी वाढणार?
DA Hike News: बँक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्ता वाढीची घोषणा, पगार किती रुपयांनी वाढणार?
Gold Silver Rates: गुड न्यूज! सोन्या - चांदीच्या दरात मोठी पडझड; दोन दिवसांत चांदी 8 हजारांनी घसरली, 10 ग्रॅम सोनं कितीवर?
गुड न्यूज! सोन्या - चांदीच्या दरात मोठी पडझड; दोन दिवसांत चांदी 8 हजारांनी घसरली, 10 ग्रॅम सोनं कितीवर?
Government Bank : कोणत्या सरकारी बँका देतात सर्वात स्वस्त कर्ज? संपूर्ण यादी एका क्लिकवर
Government Bank : कोणत्या सरकारी बँका देतात सर्वात स्वस्त कर्ज? संपूर्ण यादी एका क्लिकवर
जगभरात पगारवाढीत भारत आघाडीवर, यावर्षी किती वाढणार तुमचा पगार? जाणून घ्या सविस्तर माहिती
जगभरात पगारवाढीत भारत आघाडीवर, यावर्षी किती वाढणार तुमचा पगार? जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी
Nasrapur Case Accused Wife : फाशी किरकोळ, जिवंत जाळा नसरापूरच्या आरोपीची पत्नी रडली
Ramdas Athwale on Bengal Election : ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं, रामदास आठवलेंची खोचक टीका
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur : पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा
लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा
DA Hike News: बँक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्ता वाढीची घोषणा, पगार किती रुपयांनी वाढणार?
DA Hike News: बँक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्ता वाढीची घोषणा, पगार किती रुपयांनी वाढणार?
Pune Crime Nasrapur Case: नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस
नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसचा अपघात, स्कॉर्पिओची धडक; भीषण अपघातात 4 ठार 4 जखमी
अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसचा अपघात, स्कॉर्पिओची धडक; भीषण अपघातात 4 ठार 4 जखमी
8 लग्न पचवले, नवव्या लग्नात तरुणीचे बिंग फुटले; बीडमध्ये नवऱ्या मुलाकडून लाखो लुटणाऱ्या नवरीसह एजंटाला बेड्या
8 लग्न पचवले, नवव्या लग्नात तरुणीचे बिंग फुटले; बीडमध्ये नवऱ्या मुलाकडून लाखो लुटणाऱ्या नवरीसह एजंटाला बेड्या
Bird flu in Maharashtra: महाराष्ट्रात बर्ड फ्लूची भीती, 'या' जिल्ह्यात 8 दिवसांत 2 लाख कोंबड्या मारल्या, पशुखाद्य जमिनीत गाडलं
महाराष्ट्रात बर्ड फ्लूची भीती, 'या' जिल्ह्यात 8 दिवसांत 2 लाख कोंबड्या मारल्या, पशुखाद्य जमिनीत गाडलं
Embed widget