एक्स्प्लोर

'या' वस्तूंच्या निर्यातीवरील बंदी कायम राहणार, मंत्री पियूष गोयलांची माहिती 

देशात खाद्यपदार्थांच्या किमती वाढू नयेत, यासाठी सरकारनं अनेक वस्तूंच्या निर्यातीवर निर्बंध (Export Ban) लादलेत. अशातच आता वाणिज्य मंत्री पियुष गोयल  (Piyush Goyal) यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

Export Ban: देशात खाद्यपदार्थांच्या किमती वाढू नयेत, यासाठी सरकारनं अनेक वस्तूंच्या निर्यातीवर निर्बंध (Export Ban) लादले आहेत. अशातच आता वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी या वस्तूंच्या निर्यातीवरील बंदी कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवरील बंदी उठवली जाणार नाही, अशी माहिती मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. अर्थसंकल्पापूर्वीच सरकारनं ही मोठी घोषणा केली आहे.

गहू, तांदूळ आणि साखरेवरील निर्यातबंदीबाबत सरकारने पुन्हा एकदा परिस्थिती स्पष्ट केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्टपणे सांगितले की, या खाद्यपदार्थांच्या निर्यातीवरील बंदी सध्या उठवली जाणार नाही. केंद्र सरकार अशा कोणत्याही प्रस्तावावर विचार करत नाही. देशात गहू आणि साखरेची पुरेशी उपलब्धता असल्याचेही ते म्हणाले. त्याच्या आयातीची गरज भासणार नाही असंही त्यांनी सांगितले.

निर्यातबंदी हटवण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव नाही

केंद्र सरकारकडे निर्यातबंदी हटवण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव नाही. देशांतर्गत मागणीमुळं गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याचे पियुष गोयल यांनी सांगितले. आमच्याकडे त्यांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात आहे. आमच्या देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला त्यांची आयात करण्याचीही गरज नसल्याचे गोयल म्हणाले.

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलण्यात आली

भारताने मे 2022 मध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यानंतर जुलै 2023 मध्ये गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. याशिवाय ऑक्टोबर 2023 मध्ये साखर निर्यातीवरही बंदी घालण्यात आली होती. देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ही पावले उचलली होती. याशिवाय भारत आटा आणि भारत दालही स्वस्त दरात बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तांदूळ इंडोनेशिया, सेनेगल आणि गॅम्बियाला पाठवले

निर्यातीवर बंदी असतानाही भारताने आपले मित्र देश इंडोनेशिया, सेनेगल आणि गांबिया यांना तांदूळ पुरवला आहे. निर्यातीवरील बंदी उठताच त्यांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे गोयल यांनी सांगितले. सरकार 19 ते 23 रुपये प्रतिकिलो दराने शेतकऱ्यांकडून मुबलक प्रमाणात कांदा खरेदी करत आहे. कांद्याचे भाव वाढल्यानंतर त्याच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. किरकोळ चलनवाढीचा दर डिसेंबर 2023 मध्ये 5.69 टक्क्यांवर गेला आहे. हा जर चार महिन्यांतील उच्चांकीवर पोहोचला आहे. 

कमी पावसाचा गहू, तांदूळ आणि ऊस उत्पादनावर परिणाम

कमी पावसामुळं गहू, तांदूळ आणि ऊसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळं मैदा, तांदूळ, साखर महाग होऊ लागली आहे. यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळं देशांतर्गत बाजारपेठेत या वस्तूंची उपलब्धता वाढावी, यासाठी सरकारने या वस्तूंची निर्यात तातडीने बंद केली होती. मात्र, सरकारच्या या निर्णयाचा निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे तब्बल हजार कोटीचे नुकसान, विवाह सोहळ्यांनाही बसला फटका

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SIP : शेअर बाजारात दोन दिवसात 11 लाख कोटी स्वाहा, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरुच, SIP बंद करावी की सुरु ठेवावी? 
शेअर बाजारात दोन दिवसात 11 लाख कोटी स्वाहा, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरुच, SIP बंद करावी की सुरु ठेवावी? 
EPFO : ईपीएफओ स्वत:हून 1.33 लाख खातेदारांच्या बँक खात्यात पैसे पाठवणार, पायलट प्रोजेक्टला मंजुरी, 1000 रुपयांपर्यंतची रक्कम खात्यात येणार
ईपीएफओ स्वत:हून 1.33 लाख खातेदारांच्या बँक खात्यात पैसे पाठवणार, पायलट प्रोजेक्टला मंजुरी, खात्यात 1000 रुपयांपर्यंत रक्कम येणार
Iran- Israel War : इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद, LPG च्या पुरवठ्यावर संकट, युरोपियन गॅसचे दर 50 टक्के वाढले, गॅसचे दर वाढण्याची शक्यता? 
इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद, कतारनं LNG चं उत्पादन थांबवलं, युरोपियन गॅसचे दर 50 टक्के वाढले
Share Market Crash : शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 6.5 लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्स 1048 अंकांनी कोसळला
इराण आणि अमेरिकेचा संघर्ष पेटला, इकडे शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 6.5 लाख कोटी स्वाहा 

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
Iran : अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
Embed widget