एक्स्प्लोर
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
Raj Thackeray : मनसेच्या 19 वा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली आहे.
Raj Thackeray
1/10

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज (दि. 09) 19 वा वर्धापन दिन असून चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात सोहळा पार पडला. या सोहळ्यातून राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली.
2/10

राज ठाकरे म्हणाले की, नुकतीच कोरोना महामारी होऊन गेली आहे. दोन वर्ष तोंडाला कापड लावून आपण फिरलो आणि तिकडे जाऊन कुंभमेळ्यात अंघोळ करत आहोत. कुणालाही कुणाचे देणेघेणे नाही.
3/10

आजवर मी कित्येक स्विमिंग पुलांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम केले. सुरुवातीला ते निळे होते, मात्र कालांतराने ते स्विमिंग पूल हिरवे होत गेले. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
4/10

एक नदी या देशातील स्वच्छ नाही. परदेशात ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस तिथल्या नद्या पाहतो तर त्या एकदम स्वच्छ असतात. आपण आपल्या इथे नद्यांना माता म्हणतो मात्र परदेशात असं होत नाही. तरीही त्या नद्या स्वच्छ आहेत. मात्र आपल्या इथल्या नद्यांमध्ये सर्व प्रदूषित पाणी सोडले जाते, असे राज ठाकरेंनी म्हटले.
5/10

राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहे. त्यानंतर राज कपूर यांनी चित्रपट काढला, लोकांना वाटले गंगा साफ झाली. पण त्यात वेगळी गंगा होती. लोक म्हणाले अशी गंगा साफ असेल तर आम्हीही आंघोळ करायला तयार आहोत. पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा. आपली डोकी नीट हलवा, असा सल्ला राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला.
6/10

राज ठाकरे पुढे म्हणाले की, मुंबईत एक बैठक लावली होती. मुंबईतील शाखा अध्यक्ष, उपाध्यक्ष हजर झाले नाहीत. त्यांची हजेरी घेतली. प्रत्येकाला विचारलं, कारणं एक एक दिली. घरचे आजारी, हे होतं, ते होतं. पाच सहा जणांनी सांगितलं कुंभला गेलो होतो. म्हटलं गधड्यांनो पापं कशाला करता?
7/10

त्यांना हे ही विचारलं आल्यावर अंघोळ केली ना. आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून पाणी घेऊन आले. म्हटलं हड.. मी नाही पिणार, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे जोरदार टोलेबाजी केली.
8/10

राज ठाकरेंच्या या टोलेबाजीनंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
9/10

महिला दिन हा जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला गेला पाहिजे, असंही वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.
10/10

तर मनसेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा लेखाजोखा दर पंधरा दिवसांनी एकदा तपासणार असल्याचं सांगत जर कोणी कामचुकार असल्याचं दिसलं तर त्याची थेट हकालपट्टी करणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय.
Published at : 09 Mar 2025 04:34 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























