एक्स्प्लोर

BLOG | खरंतर त्याला कोरोनाची भीती नाहीये...

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्ण जग ठप्प पडले आहे. सर्वसामान्यांपासून उच्चपदस्थ व्यक्तींपर्यंत सर्वांनाच याची बाधा होत आहे. परिणामी सर्वजण जीवंत राहण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. मात्र, यात एका व्यक्तीला कोरोनाची अजिबात भीती वाटत नाहीय.

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे 24 तास धावणारा देश क्षणात थांबलाय. दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. सरकारपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण घरात बसा असं सांगतायेत. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना आता पोलिसांचा मार खावा लागतोय. एवढं करुनही नागरिक घराबाहेर पडत असेल तर आर्मी आणण्याचाही इशारा देण्यात येतोय. परिणामी संपूर्ण देशात एक प्रकारे भीतीचे वातावरण पसरलंय. मात्र, यात एका माणसाला कोरोनाची भीती सतावत नाहीये. तो म्हणजे सर्वसामान्य. तो घाबरलाय हे खरंय, पण त्याच्या मनात निर्माण झालेली भीती ही कोरनामुळे तयार झालेली नाहीय.

आजही सरकारी कचेऱ्या, खासगी कंपन्या, विविध महामंडळे, उद्योगधंदे अशा क्षेत्रांमध्ये जे संघटित आहेत. ते आपल्या हक्कांसाठी लढून काही लाभ पदरात पाडून घेतात. या संघटित कामगारांचे, भारतीय कामगारांच्या संख्येत प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. आजच्या घडीला 90 टक्केहून अधिक कामगार असंघटीत आहे. त्यांची संख्या 70 कोटींपेक्षा अधिक आहे. यात रस्त्यावर दुकान लावणारे, घरातून व्यवसाय करणारे, प्लंबर, चालक, गिरणी कामगार, शेतमजूर, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, कचरावेचक, बिडी कामगार, चर्मकार, धोबी, भूमिहीन मजूर, ताडी गोळा करणारे, विटभट्टी आणि खाणीत काम करणारे, रेल्वे स्थानकावरील विक्रेत, घरोघरी जाऊन साफसफाई, धुणीभांडी करणारे, वेठबिगार, अशांसह कित्येकांचा समावेश होतो.

या असंघटीत कामगारांपैकी कित्येक असे आहेत, ज्यांना आज काम नाही केलं तर त्यांच पोट भरणार नाही. आता संपूर्ण देशच लॉकडाऊन केल्यामुळे या लोकांचे जास्त हाल झालेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी 1.70 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. प्रत्येकाच्या जनधन खात्यात थेट पैसे पाठवले जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, यातील किती जणांचे जनधन खातं असेल? आज शहरातील गल्लीबोळात मोफत जेवण सुरू केलंय. पण, हा उत्साह संपूर्ण लॉक डाऊनपर्यंत असेल का? परदेशात अडकलेले चारदोन विद्यार्थी किंवा नागरिकांना आणायला राजकीय नेत्यांच्या हालचाली किती पटकन होताना दिसतात. अगदी सरकारी खर्चाने त्यांना मायदेशात आणलं जातं. त्यांना मदत करू नये असं माझं म्हणणं नाही. तेही आपल्या देशाचेच नागरिकच आहे. मात्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने दोनतीनशे किलोमीटर पायी निघाल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक कंटेनर आणि दुधाच्या टँकरमधून धोकादायक प्रवास करताना दिसत आहेत.

खरंतर सर्वसामान्य माणसांना कोरोनाची भीती नाहीय. कारण, कोरोनापेक्षाही भयंकार जगण्यासाठी त्यांचा दरोरोज संघर्ष सुरुय. आज देशातील सर्वात जास्त लोक टीबी, न्युमोनिया, कुपोषण, भूकबळीने मरतायेत. का? तर उपचारासाठी यांच्याकडे पैसे नसतात. दर, 14 व्या मिनिटाला त्यांच्या मुलीवर, आईवर, बहिणीवर, बायकोवर बलात्कार होतात. न्यायासाठी आयुष्य जाते पण मिळत काहीचं नाही. दोनशे रुपये पासाला नसतात म्हणून ज्याची मुलगी आत्महत्या करते. बैकेचं हप्ते थकल्याने जो गळफास लावून घेतो. जो गटाराज्या मेनहोलमध्ये विषारी वायूचा शिकार होतो. माझा प्रामाणिक प्रश्न आहे. हे देशाचे नागरिक नाहीत का? यांच्यासाठी तुमच्या ट्विटर वर 280 शब्द लिहू नाही शकत? सर्वसामान्य लोकांच्या मतदानावर तुम्ही निवडून येता ना? कारण, ज्या चारदोन लोकांसाठी तुम्ही सरकारी यंत्रणा हलवता ना ती तुम्हाला किती मतदान करते?

पोलिसांना तर मोकळी सूट मिळल्यासारखच करत आहेत. काहीही विचारपूस न करता दिसेल त्याला मारत सुटलेत. अगदी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची बातमी आहे. दुसरं असं की शेतकरी आता शेतीमाल शहरात घेऊन येत नाही. कारण, कोणताचं वाहनचालक तयार होत नाही. ते म्हणाले की पोलीस विचारत नाही आधी दोन काठ्या टाकतात. अशाने शहरी माणूस किती दिवस टिकेल? सर्वच असे करतात असं मला म्हणायचं नाहीये. विनाकारण, बाहेर पडणाऱ्याला तुम्ही नक्कीच शिक्षा करा. पण, चोर सोडून सन्याशाला फाशी देऊ नका. जे नागरिक विदेशातून भारतात आले. त्यातीलच काहीजण सहकार्य करताना दिसत नाहीये. मग प्रश्न पडतो राजकीय नेत्यांच्या बोलण्यात असलेला सर्वसामान्य माणूस कुठंय? 10×10 च्या खोलीत तो महिनाभर कसं राहणार? रोज काम केल्याशिवाय पोट न भरणारा तो कसा जगणार? खरंतर त्याला कोरोनाची भीती नाहीये. त्याचा रोजच जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach Janta Party: 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
Prasad Lad Meet Manoj Jarange : प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
Parbhani Crime News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janta Party: 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
Prasad Lad Meet Manoj Jarange : प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
Parbhani Crime News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
Rajya Sabha Election: 10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार
10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार
'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
Prasad Lad Meets Manoj Jarange Patil: स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यात 'नीट' पेपर विक्रीचा धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यात 'नीट' पेपर विक्रीचा धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
Embed widget