एक्स्प्लोर

Double Profit less Expense : कमी खर्चात कांदा पिकवून कमवा दुप्पट नफा, सरकारही देणार आर्थिक मदत

Double Profit less Expense : खरीप कांद्याला अनुदान मिळाल्याने शेतकऱ्यांना पेरणीपासून काढणीपर्यंतच्या खर्चात दिलासा मिळणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादनातून चांगला नफा कमविण्याची शेतकऱ्यांना संधी आहे.

Double Profit less Expense : बाजारातील कमी जास्त दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी नेहमीच अडचणीत आलेला  असतो. परंतु, आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आर्थिक मदत देणार आहे. ईशान्येकडील राज्यांना कांदा उत्पादनात स्वावलंबी बनविण्यासाठी सरकार खास योजना आणत आहे. या योजनेत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचा समावेश करण्यात आला असून, त्याअंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि आर्थिक अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. 

खरीप कांद्याला अनुदान मिळाल्याने शेतकऱ्यांना पेरणीपासून काढणीपर्यंतच्या खर्चात दिलासा मिळणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादनातून चांगला नफा कमविण्याची शेतकऱ्यांना संधी आहे. कांद्याचे उत्पादन कमी असल्यामुळे त्याचे भाव गगनाला भिडतात. त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा घेणे परवडत नाही. तर काही वेळा उत्पादन जास्त झाले की कांद्याचे दर पूर्ण पणे पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मात्र खरीप हंगामात कांद्याची लागवड केल्यास ईशान्येकडील राज्यांतील कांद्याची टंचाई वेळेवर भरून निघेल. त्यामुळे केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणार आहे. 

शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी देशातील काही राज्यांच्या सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये खरीप कांद्याच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी योगी सरकार शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 12000 रुपये या दराने आर्थिक अनुदान देत आहे. या योजनेचा लाभ अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे जे उच्च दर्जाच्या कांद्याचे उत्पादन घेतील. यासाठी शेतकरी त्यांच्या जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधून अर्ज करू शकतात. त्यानंतर राज्य सरकार आणि कृषी अधिकारी लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करतील. चांगल्या प्रतीचा कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या बियाणांची खरेदी आणि इतर कृषी कामांच्या खर्चावर दिलासा मिळणार आहे.

कांदा या पिकापासून चांगले उत्पादन घेण्यासाठी लागवडीपासून काढणीपर्यंत प्रत्येक काम अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते. कांद्यासाठी चांगल्या दर्जाची खते, बियाणे आणि सेंद्रिय पद्धतीने करणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, कांदा पिकापासून चांगले व आरोग्यदायी उत्पादन घेण्यासाठी चांगल्या प्रतीचे बियाणे वापरणे आवश्यक आहे. जेणेकरून पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. शिवाय कांदा पिकाला जास्त कष्ट करावे लागत नाही. खरीप हंगामातील कांदा लागवडीसाठी एन-53, एफ-1 संकरित बियाणे कांदा, ब्राऊन स्पॅनिश आणि एन-257-1 तसेच अॅग्रीफाऊंट डार्क रेड, भीमा सुपर, एल. 883 आणि अॅग्रीफाऊंट लाइट रेडचा समावेश सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या वाणांमध्ये करण्यात आला आहे.  

सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी खतांचा कमी वापर करूनही चांगले उत्पादन घेऊ शकतात.
खतांच्या जागी जीवामृतचा वापर करावा असे तज्ञ्ज्ञांचे मत आहे. रासायनिक खतांच्या जागी शेतकरी शेणखत आणि निंबोळी खताचा वापर करू शकतात. शेतातील कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांऐवजी कडुनिंबाच्या सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर सुरक्षित आहे. सिंचनासाठी ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करावी, त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. कांद्याला पाणी देताना नेहमी संध्याकाळी द्यावे असे शेती अभ्यासकांचे मत आहे.   
 

महत्त्वाच्या बातम्या

फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget