एक्स्प्लोर

Ind vs Pak : भारत-पाकिस्तान मॅचआधी कर्णधार रोहित चिंतेत! स्टार खेळाडू अचानक पडला आजारी; टीम इंडियाची प्लेइंग-11 बदलणार?

Rishabh Pant viral illness : रविवार 23 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये क्रिकेटचा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या गट सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांशी भिडणार आहेत.

India vs Pakistan Champions Trophy : रविवार 23 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये क्रिकेटचा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या गट सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. दोन्ही संघ या सामन्यासाठी जोरदार तयारी करत असतानाच टीम इंडियाला एक वाईट बातमी मिळाली आहे. टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत सामन्याच्या एक दिवस आधी आजारी पडला. पंतच्या आजारामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडियाची चिंता वाढली आहे, कारण आता केएल राहुलच्या रूपात त्यांच्याकडे फक्त एकच यष्टिरक्षक आहे. 

रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणाऱ्या मोठ्या सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिलने पंतबद्दल ही माहिती दिली. शनिवारी 22 फेब्रुवारी रोजी टीम इंडियाच्या सराव सत्रानंतर पत्रकार परिषदेत शुभमन गिलने खुलासा केला की. पंत आजारी पडला आहे, ज्यामुळे तो या सराव सत्रात आला नाही. भारतीय उपकर्णधाराने सांगितले की, पंतला  ताप आला होता, त्यामुळे त्याला या सराव सत्रातून विश्रांती देण्यात आली आहे.

टीम इंडियाची प्लेइंग-11 बदलणार?

आता सर्वांच्या नजरा रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी पंत तंदुरुस्त होऊ शकेल की नाही याकडे आहेत. पण, पंतच्या अनुपस्थितीचा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर परिणाम होणार नाही. कारण तो या सामन्यात खेळणार नाही. या स्पर्धेसाठी टीम इंडियाने केएल राहुलची पहिली विकेटकीपर-फलंदाज म्हणून नियुक्ती केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही केएल राहुलने विकेटकीपर करत होता. अशा परिस्थितीत पंतला दुसऱ्या सामन्यातही स्थान मिळणार नव्हते. 

असे असूनही, पंत आजारी पडणे ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. कारण जर राहुलला सामन्यापूर्वी किंवा सामन्यादरम्यान काही झाले आणि पंतही तंदुरुस्त नसेल तर टीम इंडियाला यष्टीरक्षक निवडण्याची समस्या भेडसावेल. या दोघांव्यतिरिक्त भारतीय संघात तिसरा मुख्य यष्टिरक्षक नाही. अशा परिस्थितीत, भारतीय संघ आशा करेल की, पंत लवकरात लवकर तापातून बरा होईल.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, 2023 च्या वर्ल्ड कपनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय क्रिकेटमधील हा पहिलाच सामना आहे, तर 2018 च्या आशिया कपनंतर ते पहिल्यांदाच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर या फॉरमॅटमध्ये आमनेसामने येणार आहेत. आशिया कपमध्ये दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने खेळले गेले आणि दोन्ही सामने टीम इंडियाने जिंकले. यावेळी, टीम इंडिया हॅटट्रिक पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, तर पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेल.

हे ही वाचा -

Virat Kohli Injured : 'किंग' विना लढणार सेना... विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध सामन्यातून बाहेर? दुबईतून धडकी भरवणार फोटो आला समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Satish Bhosale House : 'खोक्या'च्या घरावर घाई, सुरेश धसांना वाटतेय घाई!Special Report Gold Silver Rate : तोळा होणार लाख मोलाचा, सोनं आणि चांदीच्या दराचा नवा उच्चांकSpecial Report Halal Vs Zatka : हलालविरुद्ध झटका, मल्हार सर्टिफिकेटला हिंदू खाटिकांचाच विरोधSpecial Report Aurangjeb Kabar : पून्हा बाबरीची धमकी, औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
Embed widget