एक्स्प्लोर

रत्नागिरीवासियांसाठी रविवारची रात्र ठरली अपघाताची काळरात्र, तिघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

Ratnagiri Accident : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा आणि राजापूर येथे रविवारी रात्री झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हावासियांसाठी रविवारची (5 जून) रात्र अपघाताची काळ रात्र होती. कारण रविवारी रात्री लांजा आणि राजापूर येथे झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. लांजा तालुक्यातील अंजणारी पुलावर मालवाहू ट्रक आणि कारच्या अपघातात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले. 

रत्नागिरीहून लांजाकडे मालवाहू ट्रक निघाला होता. पण अंजणारीच्या घाटात ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि त्याची धडक मालवणवरुन चिपळूणकडे जाणाऱ्या कारला बसली. यामध्ये कारमधील दोघांचा आणि मालवाहू ट्रकचालकाचा मृत्यू झाला. कारमधील दोघे गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर दोन्ही वाहने पुलावरुन खाली कोसळली. या भीषण अपघातात ट्रक चालक विजय सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. तर, कार चालक समीर प्रदीप शिंदे आणि त्यांची आई सुहासिनी प्रदीप शिंदे यांनी देखील जागीच प्राण गमावले. कार चालक समीर शिंदे यांच्या पत्नी समृद्धी शिंदे आणि वडील प्रदीप हिम्मतराव शिंदे हे दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर, दुसरीकडे मुंबई-गोवा हायवेवर राजापूर तालुक्यातील कोदवली गावाजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. रात्री 10.45 वाजता हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही.

कसा झाला असावा अपघात? 
अंजणारी बस स्टॉप ते अंजणारी पुल या दरम्यान तीव्र उतार आहे. मोठ्या प्रमाणात गाड्यांची ये-जा या ठिकाणी सुरु असते. रत्नागिरीहून लांजाकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये माल भरलेला होता. पण, अंजणारी येथे आल्यानंतर अचानक ट्रकचा ब्रेक फेल झाला. यावेळी मोठ्या अपघाताची शक्यता अधिक जास्त. कारण, रात्रीच्या वेळी मुंबई-गोवा हायवेवर मुंबईकडे जाणाऱ्या बसेस मोठ्या प्रमाणात धावत असतात. शिवाय, इतर प्रवासी वाहतूक देखील सुरु असते. अशास्थितीत ट्रक चालक असलेले सावंत काही मीटरपर्यंत गाडीचा अपघात टाळण्यास यशस्वी देखील झाले. पण, नियतीच्या मनात सारं काही सुरळीत व्हावं असं नव्हतं. याचवेळी मालवणहून चिपळूणच्या दिशेने शिंदे कुटुंबिय आपल्या कारमधून जात होते. ब्रेक फेल झालेला आणि मालाने भरलेल्या या ट्रकची धडक त्यांच्या कारला बसली. यावेळी कारमध्ये एकाच कुटुंबातील चार जण होते. अपघातानंतर ट्रक चालक सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. शिवाय, कारमधील गंभीर जखमी दोघांना देखील आपले प्राण गमवावा लागले. सध्या अपघातातून बचावलेल्या आणि गंभीर जखमी असलेल्या दोघांवर उपचार सुरु आहेत. 

मुंबई-गोवा हायवेचं राजापूर येथे देखील अद्याप काम सुरु आहे. काही ठिकाणी एक बाजू सुरु करण्यात आली आहे. यावेळी कार चालकांचा अंदाज चुकतो. अशीच काहीशी गोष्ट राजापूर येथे ट्रकच्या अपघातामध्ये झालेली असावी. रात्रीच्या वेळी अंदाज चुकल्याने दोन ट्रकची समोरासमोर टक्कर झाली.

मुंबई-गोवा हायवे वर्दळीचा मार्ग 
मुंबई-गोवा मार्ग हा कायमच वर्दळीचा मार्ग आहे. सध्या सुट्ट्या संपत आल्याने मोठ्या प्रमाणात गाड्यांची वर्दळ वाढली आहे. काही वेळी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने किंवा रस्त्यांचा अंदाज न आल्याने देखील अपघात होत आहेत. महामार्गावर बऱ्याच ठिकाणी डायवर्जन किंवा रस्त्यांच्या खोदकामाचा अंदाज लागत नाही. अशावेळी गाडीचा वेग असल्यास अपघाताची शक्यता जास्त असते. सध्या या मार्गावर काम वेगाने सुरु आहे. पण, डायवर्जनचा अंदाज घेण्यामध्ये अनेक वेळा वाहन चालकांची गफलत होत असल्याचं चित्र आहे. 

इतर बातम्या

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Telangana Tunnel Accident : तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
Old kasara Ghat : मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
Jitendra Awhad : त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
Bacchu Kadu: ...तर कोणाचाही पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण लाचारी आमच्यात नाही; बच्चू कडू स्पष्टच बोलले, काँग्रेस- भाजपवरही 'प्रहार'   
....तर कोणाचाही पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण लाचारी आमच्यात नाही; बच्चू कडू स्पष्टच बोलले, काँग्रेस- भाजपवरही 'प्रहार'   
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare :'डॉ. Neelam Gorhe मातोश्रीवर पडीक असायच्या, सर्वात जास्त कमाई त्यांनीच केली असावी'Ambadas Danve On Neelam Gorhe : ही नीलम गोऱ्हेंची नमकहरामी, आरोपानंतर दानवेंची सडकून टीकाNeelam Gorhe on Uddhav Thackeray : दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्या की एक पद, गोऱ्हेंचा ठाकरेंवर आरोप!Budget Session : 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, 10 मार्चला अजित पवार मांडणार अर्थसंकल्प

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Telangana Tunnel Accident : तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
Old kasara Ghat : मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
Jitendra Awhad : त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
Bacchu Kadu: ...तर कोणाचाही पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण लाचारी आमच्यात नाही; बच्चू कडू स्पष्टच बोलले, काँग्रेस- भाजपवरही 'प्रहार'   
....तर कोणाचाही पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण लाचारी आमच्यात नाही; बच्चू कडू स्पष्टच बोलले, काँग्रेस- भाजपवरही 'प्रहार'   
Nashik Crime : सोनाराच्या दुकानात तिघांकडून दिवसाढवळ्या दरोडा, टोळीचा म्होरक्या हरियाणात लपल्याची टीप, नाशिक पोलिसांचे पथक पोहोचले अन्...
सोनाराच्या दुकानात तिघांकडून दिवसाढवळ्या दरोडा, टोळीचा म्होरक्या हरियाणात लपल्याची टीप, नाशिक पोलिसांचे पथक पोहोचले अन्...
Shashi Tharoor on Congress : जिथं अज्ञानात आनंद मिळतो, तिथं शहाणपणा दाखवणं मूर्खपणाचं लक्षण! काँग्रेस आणि शशी थरुरांमध्ये चाललंय तरी काय?
जिथं अज्ञानात आनंद मिळतो, तिथं शहाणपणा दाखवणं मूर्खपणाचं लक्षण! काँग्रेस आणि शशी थरुरांमध्ये चाललंय तरी काय?
Jitendra Awhad : सुनील केदार, राहुल गांधींना एक न्याय, सत्ताधारी माणिकराव कोकाटेंना वेगळा न्याय का? जितेंद्र आव्हाड आक्रमक
सुनील केदार, राहुल गांधींना एक न्याय, सत्ताधारी माणिकराव कोकाटेंना वेगळा न्याय का? जितेंद्र आव्हाड आक्रमक
National Education Policy : काल कमल हसन म्हणाले, लोकांनी तमिळ भाषेसाठी लोकांनी जीव दिलाय, खेळ करू नका; आता सीएम स्टॅलिन म्हणाले, 'केंद्र सरकारने 10 हजार कोटी दिले तरी...'
काल कमल हसन म्हणाले, लोकांनी तमिळ भाषेसाठी लोकांनी जीव दिलाय, खेळ करू नका; आता सीएम स्टॅलिन म्हणाले, 'केंद्र सरकारने 10 हजार कोटी दिले तरी...'
Embed widget