एक्स्प्लोर

बार्शीत दोन वर्षांपासून खोदून ठेवले रस्ते, नागरिक हैराण, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

बार्शी शहरातील रस्ते अतिशय खराब झाले आहेत. बार्शीतील मनीष देशपांडे यांनी याबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल आयोगाने घेतली असून पुढील कार्यवाहीसाठी राज्य मानवाधिकार आयोगाकडे सोपवली आहे.

बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील रस्ते अतिशय खराब झाले आहेत. गेली 2 वर्षे विकास कामांच्या नावाखाली सर्व रस्ते खोदुन गटारी केल्या मात्र नंतर रस्ते केलेच नाहीत. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बार्शीतील एका सामाजिक कार्यकर्त्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची दखल आयोगाने घेतली असून पुढील कार्यवाहीसाठी राज्य मानवाधिकार आयोगाकडे सोपवली आहे. काही दिवसात या तक्रारीवर सुनावणी मानवाधिकार कोर्टामध्ये होणार आहे.

बार्शीत गेली दोन वर्षे चालू असलेल्या अंडरग्राउंड गटारीसाठी रस्त्याचे खोदकाम चालू होते. अंडरग्राउंड गटारीचे काम पूर्ण झाले, परंतु रस्त्यांची अवस्था खूपच बिकट झालेली आहे. भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार प्रत्येक भारतीयाला सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार आहे. या कलमाची व्याप्ती खूप मोठी आहे. माणसाला सुखकर जीवन जगण्यासाठी महत्वाचे सर्व घटक यात अंतर्भूत आहेत. इतर घटकांप्रमाणे चांगले रस्ते हा सुद्धा सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा एक घटक आहे. अनेक उच्च न्यायालयांनी विविध खटल्यात स्पष्ट केलं आहे की चांगले व खड्डे मुक्त रस्ते असणे हा प्रत्येक भारतीयांचा मूलभूत अधिकार आहे.परंतु या अधिकाराची सर्रासपणे पायमल्ली होतांना दिसत आहे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते मनीष देशपांडे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे केली होती.

बार्शीत दोन वर्षांपासून खोदून ठेवले रस्ते, नागरिक हैराण, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

मानवाधिकार आयोगाने केलेल्या तक्रारीतील महत्वाचे मुद्दे

  • मानवाचे अपघात आणि मानवाच्या शरीरावर परिणाम होत आहे.
  • धुळीमुळे मानवाच्या श्वसनावर परिणाम होऊन दम्याचे आजार होत आहे.
  • तसेच धुळीमुळे डोळ्यांवर देखील परिणाम होत आहेत.
  • रस्त्याच्या कडेवरील दुकाने, हॉटेल मधील खाद्यपदार्थांवर धुळे मुळे रोगराई होत आहेत.
  • सतत आरोग्याची तपासणी करून अनेक आर्थिक अडचणी येत आहेत.
  • सर्वात जास्त म्हणजे त्याचा परिणाम लहान मुलांवर होत आहेत.
  • रस्ते खराब असल्यामुळे वाहने खिळखिळा होत आहेत. त्यामुळे मेंटेनन्सचा खर्च वाढून मानसिक ताण येत आहेत.
  • वाहनांची सतत दुरूस्ती करावे लागत असून आर्थिक अडचण येत आहे.

बार्शीत दोन वर्षांपासून खोदून ठेवले रस्ते, नागरिक हैराण, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

बार्शी येथील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यात प्रामुख्याने आरोग्याच्या प्रश्नासोबतच वाहनांची खराबी होऊन लोकांचा आर्थिक त्रास सुद्धा वाढत आहे. गेली दोन वर्षे हा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. परंतु याकडे सर्वप्रकारे दुर्लक्ष करण्यात येत आहे, असं मनीष देशपांडे यांनी म्हटलं आहे. बार्शीमधील प्रशासनाला सुद्धा त्यांनी विनंती केली आहे कि रस्ते लवकरात लवकर पूर्ण करावे व बार्शी मधील नागरिकांचा त्रास कमी करावा.

बार्शीत दोन वर्षांपासून खोदून ठेवले रस्ते, नागरिक हैराण, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar on Pune Bhor Crime news: राज्यात दिवसाला 24 अत्याचार, तासाला एक, रोहित पवारांनी मांडली हादरवणारी आकडेवारी; भोर तालुक्यातील घटनेवरून सरकारकडे मोठी मागणी
राज्यात दिवसाला 24 अत्याचार, तासाला एक, रोहित पवारांनी मांडली हादरवणारी आकडेवारी; भोर तालुक्यातील घटनेवरून सरकारकडे मोठी मागणी
Mumbai BJP News :....तर निधी देताना विचार केला जाईल; मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा नगरसेवकांना सज्जड दम, महापालिकेतील अनुपस्थितीवरून सुनावलं!
....तर निधी देताना विचार केला जाईल; मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा नगरसेवकांना सज्जड दम, महापालिकेतील अनुपस्थितीवरून सुनावलं!
Sanjay Jadhav: मोठी बातमी: खासदार संजय जाधव उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? 'त्या' विधानाने भुवया उंचावल्या; म्हणाले, 'सध्याची परिस्थिती...'
खासदार संजय जाधव उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? 'त्या' विधानाने भुवया उंचावल्या; म्हणाले, 'सध्याची परिस्थिती...'
HSC Result 2026 : बारावीचा निकाल इतका का घसरला? बोर्डाने सांगितलं नेमकं कारण
बारावीचा निकाल इतका का घसरला? बोर्डाने सांगितलं नेमकं कारण

व्हिडीओ

Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा
Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan APMC : मुंबईतील मृत्यूचा परिणाम! कल्याण APMC मध्ये 12 ट्रक कलिंगड पडून, ग्राहकांची पाठ; शेतकरी-विक्रेते हवालदिल
मुंबईतील मृत्यूचा परिणाम! कल्याण APMC मध्ये 12 ट्रक कलिंगड पडून, ग्राहकांची पाठ; शेतकरी-विक्रेते हवालदिल
Devendra Fadnavis Pune Mumbai Missing Link: पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
Gokul Election: 'ज्या दिवशी गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी मी गुलाल लावून उत्तर देईन...' हसन मुश्रीफांचे आरोपांच्या फैरी झाडलेल्या आमदार शिवाजी पाटलांना ओपन चॅलेंज
Video: 'ज्या दिवशी गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी मी गुलाल लावून उत्तर देईन...' हसन मुश्रीफांचे आरोपांच्या फैरी झाडलेल्या आमदार शिवाजी पाटलांना ओपन चॅलेंज
भोंगा करत फ्लॅश मेसेज आला, पण मोबाईलमध्ये सेव्ह नाही झाला; 19 भाषातून तब्बल 134 अब्ज पेक्षा अधिक अलर्ट; सचेत प्रणाली अन् 6 प्रश्नोत्तरात समजून घ्या हा प्रकार आहे तरी काय?
भोंगा करत फ्लॅश मेसेज आला, पण मोबाईलमध्ये सेव्ह नाही झाला; 19 भाषातून तब्बल 134 अब्ज पेक्षा अधिक अलर्ट; सचेत प्रणाली अन् 6 प्रश्नोत्तरात समजून घ्या हा प्रकार आहे तरी काय?
Pune Bhor Crime news: आमची सुरक्षा करता येत नसेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊन काय उपयोग; चिमुरडीच्या मृत्यूनंतर भोरमधील महिला संतापल्या
आमची सुरक्षा करता येत नसेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊन काय उपयोग; चिमुरडीच्या मृत्यूनंतर भोरमधील महिला संतापल्या
Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ बैलाचा बळी दिल्याची चर्चा, रक्त धुतानाचा व्हिडीओ कुठून आला? पोलिसांनी वृत्त फेटाळून लावलं, म्हणाले...
मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ बैलाचा बळी दिल्याची चर्चा, रक्त धुतानाचा व्हिडीओ कुठून आला? पोलिसांनी वृत्त फेटाळून लावलं, म्हणाले...
Pune Division HSC 12th Result 2026: बारावी परीक्षेत पुणे विभागाचा 93.34 टक्के निकाल; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी
बारावी परीक्षेत पुणे विभागाचा 93.34 टक्के निकाल; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी
Jabalpur Cruise Accident Viral Photo Fact Check: जबलपुरातील बर्गी धरणात झालेल्या भीषण क्रुझ बोट अपघातामधील तो हृदयद्रावक फोटो खरा की खोटा? फॅक्ट चेकमध्ये अखेर सत्य समोर
जबलपुरातील बर्गी धरणात झालेल्या भीषण क्रुझ बोट अपघातामधील तो हृदयद्रावक फोटो खरा की खोटा? फॅक्ट चेकमध्ये अखेर सत्य समोर
Embed widget