एक्स्प्लोर

बार्शीत दोन वर्षांपासून खोदून ठेवले रस्ते, नागरिक हैराण, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

बार्शी शहरातील रस्ते अतिशय खराब झाले आहेत. बार्शीतील मनीष देशपांडे यांनी याबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल आयोगाने घेतली असून पुढील कार्यवाहीसाठी राज्य मानवाधिकार आयोगाकडे सोपवली आहे.

बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील रस्ते अतिशय खराब झाले आहेत. गेली 2 वर्षे विकास कामांच्या नावाखाली सर्व रस्ते खोदुन गटारी केल्या मात्र नंतर रस्ते केलेच नाहीत. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बार्शीतील एका सामाजिक कार्यकर्त्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची दखल आयोगाने घेतली असून पुढील कार्यवाहीसाठी राज्य मानवाधिकार आयोगाकडे सोपवली आहे. काही दिवसात या तक्रारीवर सुनावणी मानवाधिकार कोर्टामध्ये होणार आहे.

बार्शीत गेली दोन वर्षे चालू असलेल्या अंडरग्राउंड गटारीसाठी रस्त्याचे खोदकाम चालू होते. अंडरग्राउंड गटारीचे काम पूर्ण झाले, परंतु रस्त्यांची अवस्था खूपच बिकट झालेली आहे. भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार प्रत्येक भारतीयाला सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार आहे. या कलमाची व्याप्ती खूप मोठी आहे. माणसाला सुखकर जीवन जगण्यासाठी महत्वाचे सर्व घटक यात अंतर्भूत आहेत. इतर घटकांप्रमाणे चांगले रस्ते हा सुद्धा सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा एक घटक आहे. अनेक उच्च न्यायालयांनी विविध खटल्यात स्पष्ट केलं आहे की चांगले व खड्डे मुक्त रस्ते असणे हा प्रत्येक भारतीयांचा मूलभूत अधिकार आहे.परंतु या अधिकाराची सर्रासपणे पायमल्ली होतांना दिसत आहे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते मनीष देशपांडे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे केली होती.

बार्शीत दोन वर्षांपासून खोदून ठेवले रस्ते, नागरिक हैराण, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

मानवाधिकार आयोगाने केलेल्या तक्रारीतील महत्वाचे मुद्दे

  • मानवाचे अपघात आणि मानवाच्या शरीरावर परिणाम होत आहे.
  • धुळीमुळे मानवाच्या श्वसनावर परिणाम होऊन दम्याचे आजार होत आहे.
  • तसेच धुळीमुळे डोळ्यांवर देखील परिणाम होत आहेत.
  • रस्त्याच्या कडेवरील दुकाने, हॉटेल मधील खाद्यपदार्थांवर धुळे मुळे रोगराई होत आहेत.
  • सतत आरोग्याची तपासणी करून अनेक आर्थिक अडचणी येत आहेत.
  • सर्वात जास्त म्हणजे त्याचा परिणाम लहान मुलांवर होत आहेत.
  • रस्ते खराब असल्यामुळे वाहने खिळखिळा होत आहेत. त्यामुळे मेंटेनन्सचा खर्च वाढून मानसिक ताण येत आहेत.
  • वाहनांची सतत दुरूस्ती करावे लागत असून आर्थिक अडचण येत आहे.

बार्शीत दोन वर्षांपासून खोदून ठेवले रस्ते, नागरिक हैराण, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

बार्शी येथील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यात प्रामुख्याने आरोग्याच्या प्रश्नासोबतच वाहनांची खराबी होऊन लोकांचा आर्थिक त्रास सुद्धा वाढत आहे. गेली दोन वर्षे हा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. परंतु याकडे सर्वप्रकारे दुर्लक्ष करण्यात येत आहे, असं मनीष देशपांडे यांनी म्हटलं आहे. बार्शीमधील प्रशासनाला सुद्धा त्यांनी विनंती केली आहे कि रस्ते लवकरात लवकर पूर्ण करावे व बार्शी मधील नागरिकांचा त्रास कमी करावा.

बार्शीत दोन वर्षांपासून खोदून ठेवले रस्ते, नागरिक हैराण, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग वाढला; पालघरसह 'या' भागात रेड अलर्ट ; पुढील 24 तासांत..; हवामान खात्याचे नेमकं काय सांगितलं?
पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग वाढला; पालघरसह 'या' भागात रेड अलर्ट ; पुढील 24 तासांत..; हवामान खात्याचे नेमकं काय सांगितलं?
Tukaram Munde FDA Action On BMC Canteen Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
Anna Hazare Letter to PM Modi: 'एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने सरकारची सत्ता जाणार नाही'; अण्णा हजारेंचे पीएम मोदींना खरमरीत पत्र, काय-काय म्हणाले?
'एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने सरकारची सत्ता जाणार नाही'; अण्णा हजारेंचे पीएम मोदींना खरमरीत पत्र, काय-काय म्हणाले?
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Tukaram Munde FDA Action On BMC Canteen Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
Nashik Rain: नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
Pune Leopard Attack : गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
Narendra Modi on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
Embed widget