एक्स्प्लोर

Latur Rain Update : लातूर जिल्ह्यात पावसाचा 20 दिवसांचा खंड, सोयाबीन धोक्यात; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Latur Rain Update : सोयाबीनचे बहुतांश क्षेत्र हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणार आहे.

Latur Rain Update : मागील पंधरा ते वीस दिवसांपासून लातूर (Latur) जिल्ह्यात पावसाने (Rain) पाठ फिरवली आहे. लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड होत असते. पावसाने उघड दिल्याने पेरणी केलेल्या कोवळी सोयाबीनची पिके माना टाकत आहेत. ही स्थिती लातूर जिल्ह्यात सर्वत्र पहावयास मिळत आहे. लातूर ग्रामीण, जळकोट, रेनापूर, अहमदपूर, उदगीर, औसा, देवणी, चाकूर, शिरूर आनंतपाळ, कासार शिरशी, आणि निलंगातील सर्व भागात पावसाने मागील पंधरा दिवसापासून ओढ दिली आहे. काही ठिकाणी शेतीला स्प्रिंकलरने पाणी देण्यात आहे. मात्र, हे प्रमाण अत्यल्प आहे. सोयाबीनचे बहुतांश क्षेत्र हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणार आहे.

सोयाबीनसाठी एकरी दहा हजाराच्या आसपास खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता पावसाने ओढ दिल्याने संकट उभा राहलंय. येत्या काही दिवसात पाऊस झाला नाही, तर सोयाबीनचे पीक हातचे निघून जाण्याची शक्यता आहे. पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीत असलेला ओलावा निघून गेला आहे. जमिनीला आता भेगा पडायला सुरुवात झाली आहे. हे चित्र पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. 

लातूर शहरापासून 90 किलोमीटर लांब असलेल्या जळकोट तालुक्यातील पाटोदा खुर्द येथील शेतकरी गुणवंत अंधोरे यांनी सोयाबीन लावलं. औषधाची फवारणी केली, खत दिलं. अंतर मशागतही केली. मात्र, पावसाने साथ दिली नसेल तर फाशी घेऊन मारण्याची वेळ आली आमच्यावर अशी व्यथा त्यांनी मांडली आहे. जळकोट तालुक्यात सर्वत्र अशीच काही परिस्थिती असून, शेतकरी हतबल झाले आहेत. 

सर्व संकट शेतकऱ्यांवरच...

आस्मानी संकट आणि त्याच प्रकारचे सुलतानी संकटही आमच्यावर आहे. गेल्या वर्षी अडीच हजार रुपयांचा पीक विमा भरला होता. मात्र, हातात रुपया परत आला नाही. यावर्षी एक रुपयाचा पीक विमा भरलाय, पण येण्याची अपेक्षाच नाही. दरवर्षी निसर्ग साथ देत नसेल आणि सरकार मदत करत नसेल तर कुणीकडे जायचं असा प्रश्न जळकोट तालुक्यातील शेतकरी विचारतोय. 

निसर्गाच्या लहरीपणावरच शेती करावी लागतेय 

लातूर पासून पन्नास किलोमीटर लांब असलेल्या निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथील शेतकऱ्यांची अवस्था जिल्ह्याभरातील शेतकऱ्यासारखीच झाली आहे. सोयाबीन पेरलं खत टाकलं औषध फवारलेत पावसाची वाट पाहिली पण पाऊस काही पडतच नाही. शेतीकडे नुकतेच वळलेले तरुण शेतकऱ्यांनाही मागील दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणावरच शेती करावी लागत आहे. दोन वर्षात शेती करताना आलेल्या अनुभवामुळे हे तरुण शेतकरी शेती नकोय अशा मनस्थितीत आलेत. विशेष म्हणजे लातूर प्रमाणे मराठवाड्यातील अनेक भागात अशीच परिस्थिती आहे. 

संबंधित बातमी: 

Jayakwadi Water Storage Update : जायकवाडी धरणात केवळ 34 टक्के पाणीसाठा; मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
‘माझ्या आणि सचिनच्या अफेअच्या चर्चा…’ 43 वर्षानंतर अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा, स्पष्टच म्हणाल्या, 'तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा..'
‘माझ्या आणि सचिनच्या अफेअच्या चर्चा…’ 43 वर्षानंतर अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा, स्पष्टच म्हणाल्या, 'तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा..'
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
Embed widget