एक्स्प्लोर

'मोदी सरकारनं उद्योगपतींचं 2378760000000 रुपयाचं कर्ज माफ केलं', राहुल गांधींचा दावा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे नेहमीच मोदी सरकारवर टीका करत असतात. आज त्यांनी पुन्हा ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली आहे.राहुल गांधींनी दावा केला आहे की, यावर्षी मोदी सरकारनं काही उद्योगपतींचं 23 खर्वहून अधिक रुपयांचं कर्ज माफ केलं आहे.

नवी दिल्ली: काँग्रेसकडून सतत मोदी सरकारवर टीका केली जात आहे. सध्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील नेहमीच पंतप्रधान मोदी आणि सरकारवर टीका करत असतात. आता त्यांनी पुन्हा ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधींनी दावा केला आहे की, यावर्षी मोदी सरकारनं काही उद्योगपतींचं 23 खर्वहून अधिक रुपयांचं कर्ज माफ केलं आहे.

काँग्रेस खासदार आणि माजी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, '2378760000000 रुपयांचं कर्ज या वर्षी मोदी सरकारने काही उद्योगपतींना माफ केलं आहे. या रकमेतून कोविडसारख्या संकटाच्या काळात 11 कोटी परिवारांना प्रत्येकी 20-20 हजार रुपये देऊ शकलो असतो. मोदीजींच्या विकासाचं हे खरं रुप आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

याआधीही राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. अनियोजित लॉकडाउनमुळे कोट्यवधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला होता. एक ट्वीट करत त्यांनी म्हटलं होतं की, "कोरोना संक्रमणाचे रुग्ण आता एक कोटीच्या वर गेलेत. त्यात जवळपास 1.5 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. अनियोजित लॉकडाउनच्या माध्यमातून कोरोना विरोधातली ही लढाई 21 दिवसात जिंकता येते असं पंतप्रधानांनी देशाला सांगितलं होतं. परंतु यामुळं देशातील कोट्यवधी लोकांच जीवन उद्ध्वस्त झालं."

त्यानंतर त्यांनी नोटबंदीवरुन टीका करताना म्हटलं होतं की, पीएम मोदी नोटबंदीच्या वेळी सांगितलं होतं की, मला 50 दिवसाचा वेळ द्या, सर्व ठीक होईल. कोरोनाच्या वेळीही त्यांनी 21 दिवसांचा वेळ मागितला होता. मात्र असं काही झालं नाही. राहुल गांधींनी म्हटलं होतं की, पंतप्रधान मोदी यांच्या खोटं बोलण्याचा इतिहास मोठा आहे. त्यामुळं शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीयेत, असं राहुल गांधींनी म्हटलं होतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

National Highways Act : सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
Beed Crime: बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 17 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 AM 17 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
National Highways Act : सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
Beed Crime: बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
Aurangzeb Tomb Row: शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढ्यांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच्या लोकांना कबर का हटवायचेय? खुलताबादच्या फुलविक्रेत्याचा प्रश्न
शिवरायांच्या वंशजांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच कबर का हटवायचेय? फुलविक्रेत्याचा प्रश्न
Ajit Pawar : त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
Embed widget