एक्स्प्लोर

Weather protection :  2030 पर्यंत भारत हरितगृह वायू उत्सर्जन एक अब्ज टन कमी करणार,  मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची माहिती

भारत 2030 पर्यंत एकूण हरितगृह वायू उत्सर्जन (GHGS) एक अब्ज टन कमी करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे मत केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केले .

Weather protection : भारत 2030 पर्यंत एकूण हरितगृह वायू उत्सर्जन (GHGS) एक अब्ज टन कमी करण्यासाठी वचनबद्ध आहे. जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व 2030 मध्ये एकूण वापराच्या 50 टक्क्यांनी कमी करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह (Dr Jitendra Singh) यांनी दिली. हवामान संरक्षणासाठीचा भारताचा पथदर्शी आराखडा त्यांनी सामायिक केला, त्यावेळी सिंह बोलत होते. 'एकीकृत धोरण निर्मितीसाठी व्यवस्थेचे विश्लेषण' या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, यावेळी जितेंद्र सिंह बोलत होते.

कार्बनची तीव्रता 2005 च्या पातळीपेक्षा जीडीपीच्या प्रमाणात  45 टक्क्यांनी कमी करणे. तसेच   2070 पर्यंत संपूर्ण देश कार्बन तटस्थ करणे यासाठी भारत कटीबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जागतिक स्तरावर या समस्येचे निराकरण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख भूमिका बजावत असल्याचेही ते म्हणाले. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर अप्लाइड सिस्टम्स ॲनालिसिसच्या (आयआयएएसए) सहकार्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागा अंतर्गत (डीएसटी) स्वायत्त संस्था, टेक्नॉलॉजी इन्फॉरमेशन, फोरकास्टिंग अँड असेसमेंट कौसिंलने (तंत्रज्ञान माहिती, अंदाज आणि मूल्यांकन परिषदेने, टीआयएफएसी) या परिषदेचे आयोजन केले आहे. यात सुमारे 1000 शिक्षणतज्ञ, संशोधक, अभ्यासक, सरकारी अधिकारी, आयआयएएसए प्रतिनिधी, विविध विषयांतील धोरणकर्ते सहभागी झाले आहेत. हवामान बदल, प्रदूषण, स्वच्छ ऊर्जा, उपजीविका आणि डिजिटलायझेशन यासह आशियातील देशांनी व्यापकपणे सामायिक केलेल्या समस्यांवर ते मंथन करत आहेत.

पूर, दुष्काळ, चक्रीवादळाला  हवामान बदल कारणीभूत

मलेशिया, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, चीन, इराण, फिलीपिन्स, जपान आणि जॉर्डनमधील तज्ज्ञांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. विविध भागधारकांमधील व्यापक परस्परसंवाद केंद्रित  प्रणाली विश्लेषण साधनांचा बहुपक्षीय अनुप्रयोग करत उपाय शोधत आहेत. भारत आपल्या विशेष भौगोलिक-हवामानाच्या परिस्थितीमुळे नेहमी नैसर्गिक आपत्तींचा बळी ठरतो असे मत यावेळी जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केले. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप आणि भूस्खलन या वारंवार घडणाऱ्या घटना आहेत. परंतू, अलीकडच्या काळात घटनांच्या वारंवारता आणि तीव्रतेची अनिश्चितता वाढली आहे. हवामान बदल याला कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आपत्ती व्यवस्थापनात अग्रेसर असल्याने हवामान बदलासारख्या जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जग आपल्याकडे अपेक्षेने पाहत असल्याचेही जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

यावर्षी भारतच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्त या अत्यंत महत्त्वाच्या परिषदेचे आयोजन करणे हा भारतासाठी खरोखरच अभिमानाचा क्षण आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख डॉ. जितेंद्र सिंह यांनी केला. 

महत्त्वाच्या बातम्या:

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
Temperature Update: उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
Chhagan Bhujbal : प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 pm 28 February 2025Job Majha : भारतीय डाक विभागात नोकरीची संधी, एकूण किती जागा? शैक्षणिक पात्रता काय? 28 Feb 2025Datta Gade Police Custody | नराधम दत्ता गाडेला १२ दिवसांची पोलीस कोठडी, सहमतीने शारीरिक संबंध झाल्याचा आरोपीच्या वकिलांचा दावाDatta Gade News | नराधम दत्ता गाडेला कोर्टासमोर केलं हजर, काल मध्यरात्री आरोपीला बेड्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
Temperature Update: उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
Chhagan Bhujbal : प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
Indrajit Sawant : सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
Sanjay Raut : तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
Uttarakhand Badrinath Massive Avalanche : उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
Nagpur Crime News: नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून दखल, गुन्हा दाखल 
नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून दखल, गुन्हा दाखल
Embed widget