एक्स्प्लोर

अधिकाऱ्याची पत्नी टँकरसमोर हंडा घेऊन कधी उभी दिसते का?; न्यायालयाचा महापालिकेला खरमरीत सवाल

Maharashtra Aurangabad News : औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) शहरातील पाणी प्रश्नावरून जनहित याचिका दाखल करण्यात आली असून, बुधवारी यावर सुनावणी झाली.

Aurangabad Water Issue: गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद शहारतील (Aurangabad City) नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सामना करावा लागत आहे. प्रत्येक निवडणुकीत आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही. त्यामुळे याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) शहरातील पाणी प्रश्नावरून जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान यावर बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने पुन्हा एकदा महानगरपालिकेचे कान टोचले. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची पत्नी टँकरसमोर कधी हंडा घेऊन उभी दिसते का? असा खरमरीत सवाल यावेळी न्यायालयाने उपस्थित केला. न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या न्यायालयासमोर ही सुनावणी झाली. 

औरंगाबादच्या पाणी प्रश्नाच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या प्रकल्पाच्या कामाच्या प्रगतीबाबत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अतिशय प्रतिकूल आणि असमाधानकारक कामाचा अहवाल खंडपीठात सादर करण्यात आला. या प्रकल्पाचे काम अतिशय संथगतीने सुरू असून, याबाबत पुरेसे गांभीर्य नसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे

Aurangabad Court : अतिरिक्त आयुक्तांना उपस्थित राहण्याचे आदेश...

औरंगाबादच्या पाणी प्रश्नाच्या याचिकेच्या सुनावणीवेळी नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या प्रगतीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी गुरुवारी आज पुन्हा सुनावणी होणार आहे. तसेच सुनावणीला कंत्राटदार कंपनी जीव्हीप- पीआरच्या प्रकल्प प्रमुखाला आणि महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पाणीपुरवठा) यांना प्रत्यक्ष हजर राहण्याच्या तोंडी सूचना देखील खंडपीठाने दिल्या.  जनतेच्या संयमाची परीक्षा पाहू नका, असेही खंडपीठाने यावेळी बजावले.

Aurangabad Court : न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

औरंगाबाद शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन खंडीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर महानगरपालिकेकडून शहरात काही ठिकाणी कारवाई देखील करण्यात आली. मात्र शहरात अजूनही मुख्य जलवाहिनीवर घेण्यात आलेले अनेक बेकायद रहिवासी तसेच व्यावसाकि, राजकीय प्रभाव असलेल्या क्षेत्रातील नळ कनेक्शन अजूनही तसेच असल्याचे या वेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने निदर्शनास आणण्यात आले. त्यामुळे यावेळी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच औरंगाबाद पाणी प्रश्नावरून, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची पत्नी टँकरसमोर कधी हंडा घेऊन उभी दिसते का? असा खरमरीत सवाल यावेळी न्यायालयाने उपस्थित केला.

Aurangabad : औरंगाबादचा पाणी प्रश्न कधी सुटणार...

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहरातील जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळा सोडा पावसाळ्यात देखील नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. यावरून अनेकदा राजकीय पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतात. तसेच प्रत्येक निवडणुकीत पाण्याचा मुद्दा आघाडीवर असतो, पण त्यानंतरही पाण्याचा प्रश्न कायम असतो. त्यामुळे आता औरंगाबादच्या नागरिकांना वेळेवर पाणी कधी मिळणार असा प्रश्न औरंगाबादकरांना पडला आहे. 

जनहित याचिकांच्या कार्यवाहीचे 'लाइव्ह स्ट्रीमिंग'; उच्च न्यायालय व सरकारला उत्तर देण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्यादPadma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मानAshok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Embed widget