एक्स्प्लोर

Scholarship Controversy: शिष्यवृत्तीबाबत केंद्राचा एक निर्णय अन् वादच वाद; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?

Scholarship : मागील दोन वर्षात शिष्यवृत्तीधारक विध्यार्थी विरुद्ध महाविद्यालय असा वाद आणखीच पेटला असून, आता प्रकरण थेट न्यायालयात पोहचले आहे. 

परभणी : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत (Scholarship) केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयाने महाविद्यालय आणि विध्यार्थी आमने सामने आणले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना यापूर्वी महाविद्यालयालाच्या माध्यमातून मिळणारी शिष्यवृत्ती आता थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होत आहे. परंतु, स्वतःच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा झाल्यावर विध्यार्थी महाविद्यालयात शुल्क भरत नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे महाविद्यालयाने देखील शुल्क मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची अडवणूक करत त्यांचे कागदपत्रे देण्यास नकार देत आहे. मागील दोन वर्षात शिष्यवृत्तीधारक विध्यार्थी विरुद्ध महाविद्यालय असा वाद आणखीच पेटला असून, आता प्रकरण थेट न्यायालयात पोहचले आहे. 

शिक्षणासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती दिली जाते. स्वाधार योजनेंतर्गत राहणे, खाणे, कपडे, इतर मूलभूत गरजांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. सोबतच  महाविद्यालयातील तासिका आणि इतर शुल्कासाठी वेगळी शिष्यवृत्ती दिली जाते. यापूर्वी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या नावे थेट महाविद्यालयांना दिली जात होती. परंतु, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने या निर्णयात बदल केला. त्यामुळे ही शिष्यवृत्ती आता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. पण, या निर्णयाचे उलट परिणाम दिसू लागले. महाविद्यालयातील तासिका आणि इतर शुल्कासाठी मिळणारी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाल्यावर देखील विध्यार्थी ती महाविद्यालयात जमा करत नसल्याचे पाहायला मिळाले. त्यात आता मागील दोन वर्षांपासून ही शिष्यवृत्ती मिळणेच बंद झाली आहे. त्यामुळे, महाविद्यालय अडचणीत आले आहे. तर, शुल्क मिळत नसल्याने महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे कागदपत्रे देणं बंद केले आहे. ज्यामुळे विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. 

शिष्यवृत्ती शुल्क महाविद्यालयाच्या खात्यात जमा करण्याची मागणी...

या शुल्काच्या वादातूनच काही ठिकाणी महाविद्यालयांच्या प्राचार्यावर ऍट्रॉसिटी सारखे गुन्हे ही दाखल केले गेले आहेत. त्यामुळे ही शिष्यवृत्ती पूर्वीप्रमाणेच महाविद्यालयाच्या खात्यात जमा करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थी आणि महाविद्यालयातील वाद होणार नाहीत अशी मागणी महाविद्यालयाचे प्राचार्य करत आहेत. 

कागदपत्रे अडवू नयेत, केंद्राचे निर्देश...

दरम्यान, शुल्कावरून जेंव्हा-जेंव्हा महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांत संघर्ष होतो. त्यावेळी त्या-त्या समाज कल्याण अधिकाऱ्यांकडे हा वाद जाऊन पोहचतो. अनेकदा तिथेही हा वाद होतांना पाहायला मिळतो. त्यामुळे केंद्र सरकारने समाज कल्याण विभागाला एक परिपत्रकच काढून याबाबतीत सूचना दिल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृती शुल्क महाविद्यालयात जमा झाले नाही, त्यांचे कागदपत्रे अडवू नयेत. तसेच, जर विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या संख्येमध्ये मोठी घट, बार्टीकडून 861 ऐवजी 200 तर सारथीच्या 600 ऐवजी 50 मुलांनाच शिष्यवृत्ती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News LIVE Updates: मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भडका, तर आजपासून 10 टक्के पाणीकपात लागू; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE: मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भडका, तर आजपासून 10 टक्के पाणीकपात लागू; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Weather Alert: राज्यात उन्हामुळे काहिली! विदर्भातल्या अमरावती वर्धा अन् अकोल्यात उष्णतेची लाट, तर नागपूरसह पाच जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा येलो अलर्ट
राज्यात उन्हामुळे काहिली! विदर्भातल्या अमरावती वर्धा अन् अकोल्यात उष्णतेची लाट, तर नागपूरसह पाच जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा येलो अलर्ट
Maharashtra Reservation Policy: स्पर्धा परीक्षेत राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या जागांवर बंदी, राज्य सरकारच्या निर्णयावर हरिभाऊ राठोड संतापले; म्हणाले, 'मागासवर्गीयांचे मंत्री...'
स्पर्धा परीक्षेत राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या जागांवर बंदी, राज्य सरकारच्या निर्णयावर हरिभाऊ राठोड संतापले; म्हणाले, 'मागासवर्गीयांचे मंत्री...'
Monsoon Update : मान्सून अंदमानात दाखल होण्यास पोषक स्थिती, ईशान्य भारत, दक्षिणेतील राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता
मान्सून अंदमानात दाखल होण्यास पोषक स्थिती, ईशान्य भारत, दक्षिणेतील राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता

व्हिडीओ

Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report
Politics Over Rahul Gandhi foreign trip : राहुल गांधींचा परदेश दौरा, भाजपचे आरोप | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Petrol and Diesel price hike: महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Sharad Pawar On Sunil Tatkare And Praful Patel: शरद पवारांकडून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांचं कौतुक; सुनेत्रा पवारांनाही सुचवलं?, म्हणाले, दोन्ही नेते...
शरद पवारांकडून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांचं कौतुक; सुनेत्रा पवारांनाही सुचवलं?, म्हणाले, दोन्ही नेते...
Mouni Roy, Suraj Nambiar Confirm Divorce: 40 वर्षांच्या बॉलवूड अभिनेत्रीचा चार वर्षांचा सुखी संसार मोडला; स्वतःच पोस्ट करुन सांगितली घटस्फोटाची न्यूज
40 वर्षांच्या बॉलवूड अभिनेत्रीचा चार वर्षांचा सुखी संसार मोडला; स्वतःच पोस्ट करुन सांगितली घटस्फोटाची न्यूज
Mumbai Indians : जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
HSRP : एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
Embed widget