एक्स्प्लोर

ऐन सणासुदीत राज्यातील 49 हजार रेशन दुकानं बंद

वितरण यंत्रणेच्या वादामुळे अनेक कुटुंबांमध्ये या महिन्याचं रेशन पोहोचू शकलेलं नाही.

रत्नागिरी: सणासुदीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या 22 जिल्ह्यातील 49 हजार रेशन दुकानं गेल्या 14 दिवसांपासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून बंद आहेत. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातच 900 हून अधिक रेशन दुकानं बंद आहेत. वितरण यंत्रणेच्या वादामुळे अनेक कुटुंबांमध्ये रेशन पोहोचूच शकलेलं नाही. मात्र धान्य दुकानांपर्यंत पोहोचवलं जात असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतोय, तर दुसरीकडे धान्य दुकानदारांनाच गोदामातून आणावं लागत असल्याची तक्रार दुकानदारांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात वितरण यंत्रणा उभारण्यात सरकारला अपयश येत असल्याचा आरोपही दुकानदारांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात अकरा लाखांहून अधिक घरं रेशनपासून वंचित राहिली आहेत. वितरण यंत्रणेच्या वादावरून मात्र ग्राहकांचे नाहक हाल होत आहेत. रत्नागिरीत 972 दुकानं बंद राज्याच्या विविध 22 जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून रास्त धान्य दुकानातील वितरण व्यवस्थाच पूर्णतः ठप्प आहे.  एकटया रत्नागिरी जिल्ह्यात रास्त दरातील धान्य वितरित करणारी 972 दुकाने 14 दिवसापासून पूर्णतः बंद ठेवण्यात आल्याने, साडे अकरा लाखाहून अधिक सर्वसामन्य लोकांच्या घरात या महिन्याचे रेशन पोहोचले नाही. फेब्रुवारी 2014 पासून अन्न सुरक्षा कायदा लागू करण्यात आला. या कायद्यानुसार सरकारने सर्वसामान्य लोकांना वितरित करायचे धान्य दुकानदारांना त्यांच्या दुकानापर्यंत नेवून वितरित करायचे होते. मात्र या वितरणासाठी आवश्यक अशी वाहतूक यंत्रणाच उभारायला रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यात सरकारला अपयश आलं. यामुळे रेशन दुकान चालकांनीच, ही वितरण व्यवस्था ठप्प होऊ नये याकरिता सरकारी गोदामातून धान्याची स्वखर्चाने उचल केली. आणि या वाहतूक खर्चातच दुकानदारांचे गणित चुकलं. सरकार आज कागदोपत्री आपण दुकानदारांपर्यंत धान्य वितरित करत असल्याचा दावा करीत असलं, तरी रत्नागिरीसह राज्याच्या अनेक जिल्ह्यात ही वाहतूक दुकानदारांकडूनच केली जात आहे. यातच सरकारने शनिवारी राज्यातील वितरकांना प्रति क्विंटल 150 रुपये मार्जिन देण्याची घोषणा केली आहे. मात्र हे मार्जिन सरकारने दुकानदारांना वितरित केलेल्या पॉस मशीनच्या माध्यमातून, ऑनलाईन धान्याचे वितरण केले असल्यासच मिळणार आहे, अशी मेख सरकारने मारून ठेवली आहे. कोकणातील अनेक गावांमध्ये मोबाईल रेंजच उपलब्ध नसल्याने, रेशन दुकानातून ही ऑनलाईन यंत्रणा रावबावयाची कशी ही समस्या दुकानदारांसमोर आहेत. आणि ऑनलाईन व्यवहार न झाल्यास प्रति क्विंटल चे 150 रुपये मार्जिन दिले जाणार नाही. राज्य भरातील याच वितरण व्यवस्थेतील घोळाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी वितरण व्यवस्था ठप्प करण्यात आली आहे, पण त्याचा फटका ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला बसत आहे. राज्यातील रेशन कार्डची स्थिती राज्यभरात जवळपास अडीच कोटी रेशन कार्डधारक आहेत यामध्ये -
  1. पिवळे रेशन कार्डधारक - जवळपास 75 लाख
  2. केशरी रेशन कार्डधारक - जवळपास दीड कोटी
  3. पांढरे रेशन कार्डधारक - जवळपास 20 लाख
राज्यभरात रेशनिंगची एकूण जवळपास 52 हजार दुकानं आहेत. गेल्या 14 दिवसांपासून राज्यातल्या 22 जिल्ह्यांत 49 हजार दुकानं बंद होती.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही

व्हिडीओ

Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक
Samadhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Prashant Jagtap: मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
Sahar Shaikh MIM TMC Election 2026: आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू
कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू
Embed widget