![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Navneet Rana : आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेणार; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर नवनीत राणांची प्रतिक्रिया
खासदार नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करुन निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत खासदार नवनीत राणा यांनी सूचक वक्तव्य करत आपल्या भाजप प्रवेशाबाबत संकेत दिले आहे.
![Navneet Rana : आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेणार; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर नवनीत राणांची प्रतिक्रिया Navneet Rana reaction on Anandrao Adsul and BJP entry talks We will make the right decision at the right time maharashtra marathi news Navneet Rana : आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेणार; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर नवनीत राणांची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/03/70972fb1b4104b79c379883c22e4285c1709444118492892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असली तरी महायुतीमधील घटकपक्षांमध्ये अद्याप मनोमीलन झाल्याचे दिसत नाही. कारण महायुतीमधील घटकपक्षांमधील नेते एकमेकांविरुद्ध जाहीरपणे भूमिका घेताना दिसत आहेत. यामध्ये आता आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यातील वादाची भर पडली आहे. आनंदराव अडसूळ यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणांच्या प्रचाराला जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. त्यासाठी मग आपल्याला राजकारण कायमचे सोडावे लागले तरी चालेल, असे वक्तव्य अडसूळ यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर आता खासदार नवनीत राणा यांनी देखील आपली प्रतिक्रिया देत अडसूळ यांच्यावर टीका केली आहे.
आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेणार
अमरावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळणार? नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करुन कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत खासदार नवनीत राणा यांनी सूचक वक्तव्य करत आपल्या भाजप प्रवेशाबाबत संकेत दिले आहे. यावर बोलताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, माझी आणि रवी राणांची चर्चा नेहमी सुरू असते. आम्ही बोललो तरी चर्चा होते आणि आम्ही नाही बोललो तरी चर्चा होत असते. आम्ही एनडीएसोबत आहेत. त्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं नाही. आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली. कोण काय बोलतो यावर मी काही बोलत नाही. कोण राजकारण सोडेल हा विषय माझा नाही, असे म्हणत त्यांनी आनंदराव अडसुळ यांच्या टीकेला देखील प्रतिउत्तर दिले.
काय म्हणाले होते आनंदराव अडसूळ?
आनंदराव अडसूळ यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणांच्या प्रचाराला जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. त्यासाठी मग आपल्याला राजकारण कायमचे सोडावे लागले तरी चालेल. पण तशी वेळ येणार नाही, असे वक्तव्य अडसूळ यांनी केले. ते शनिवारी अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आनंदराव अडसूळ यांनी कोणताही आडपडदा न ठेवता नवनीत राणा यांच्याविषयची मनातील खदखद स्पष्टपणे बोलून दाखवली. त्यांनी म्हटले की, अमरावती लोकसभेची जागा ही शिवसेनेची आहे. त्यामुळे या जागेवरुन मी लढेन. नवनीत राणा यांना वाटेल ते बोलायची सवय आहे. तशी सवय आम्हाला नाही. आपण कपड्याच्या आतमध्ये नागडे असतो. मात्र, राजकारणात काही लोक कपड्याशिवाय नग्न असतात, असे टीकास्त्र अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्यावर सोडले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)