एक्स्प्लोर

शेतकरी व सरकार यांच्यातील आठव्या फेरीतील बैठकही निष्फळ, 15 जानेवारीला पुढची बैठक होणार

शेतकरी आणि सरकार यांच्यात आठव्या फेरीची बैठकही निष्फळ ठरली. शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात पुढील बैठक आता 15 जानेवारीला होणार आहे.

नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन आज सलग 44 व्या दिवशी दिल्लीच्या सीमेवर सुरू आहे. दरम्यान, केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आठव्या फेरीची बैठक आज झाली. ही बैठक देखील निष्फळ ठरली. आता पुढील बैठक 15 जानेवारीला होणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत पुन्हा एकदा सरकारने शेतकरी नेत्यांसमोर कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव ठेवला. सरकारकडून असे म्हटले होते की हा कायदा मागे घेता येणार नाही कारण बरेच शेतकरी त्यास अनुकूल आहेत. तर कायदा रद्द करण्याची मागणी शेतकरी नेते वारंवार करत राहिले.

सरकारच्या या वृत्तीने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बैठकीच्या मध्येच लंगर खाण्यास नकार दिला. सरकारने दुपारच्या जेवणाला ब्रेक देण्याची विनंती केली. तेव्हा शेतकरी नेते म्हणाले की जेवण किंवा चहा घेणार नाहीत.

बैठकीत काही शेतकर्‍यांकडे फलक होते. ज्यावर असे लिहिले होते की, 'आम्ही एकतर मरू किंवा जिंकू'.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, वाणिज्य व अन्नमंत्री पियुष गोयल, वाणिज्य राज्यमंत्री आणि पंजाबचे खासदार सोम प्रकाश यांनी सुमारे 40 शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसह विज्ञान भवन येथे चर्चा केली.

यापूर्वी चार जानेवारी रोजी झालेली चर्चा अनिर्णीत राहिली. कारण शेतकरी संघटनांना तिन्ही कृषी कायदे रद्द करावे या मागणीवर ठाम होते, तर सरकार केवळ अडचण दूर करण्यासाठीच्या “समस्या” तरतुदी किंवा अन्य पर्यायांविषयी बोलत होते.

30 डिसेंबर रोजी शेतकरी संघटना आणि केंद्रामधील सहाव्या फेरीतील चर्चेच्या वेळी, पेंढा जाळणीला गुन्हेगारीच्या श्रेणीतून वगळण्यासाठी आणि वीजेवरील अनुदान सुरू ठेवण्याच्या दोन मागण्यांवर एकमत झाले होते.

सरकार आणि शेतकरी यांच्या भूमिका काय?

गुरुवारी हजारो शेतकऱ्यांनी सरकारशी वाटाघाटी करण्यापूर्वी भव्य ट्रॅक्टर रॅली काढली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात मोठी सुधारणा म्हणून अंमलात आलेले तीन कायदे आणले. सरकारचे म्हणणे आहे की हे कायदे लागू झाल्यास मध्यस्थांची भूमिका संपुष्टात येईल आणि शेतकरी देशातील कोठेही आपले उत्पादन विकू शकतील.

दुसरीकडे, आंदोलन करणारे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की या कायद्यांमुळे एमएसपीचे सुरक्षा कवच संपेल आणि मंडीही संपुष्टात येतील आणि शेती बड्या कॉर्पोरेट गटाच्या ताब्यात जाईल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनाबाबत सुप्रीम कोर्टाकडून चिंता व्यक्त, तबलिकी मरकजसारखी स्थिती निर्माण होऊ नये

विविध विरोधी पक्षांनी आणि वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहे, तर गेल्या काही आठवड्यात काही शेतकरी संघटनांनी कृषिमंत्र्यांची भेट घेतली आणि तिन्ही कायद्यांना पाठिंबा दर्शविला आहे.

अमित शहा यांची बैठक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी तीन कृषी कायद्यांचा निषेध नोंदविणार्‍या शेतकरी संघटनांच्या बैठकीपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे एक तास चालली असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे माहिती नाही. अमित शहा यांनी गुरुवारी पंजाबमधील भाजप नेत्यांचीही भेट घेतली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget