एक्स्प्लोर

Bal Gandharva : टिळकांकडून 'बालगंधर्व' पदवी बहाल; कर्जाची पर्वा न करता रंगभूमीची सेवा करणाऱ्या 'नारायण श्रीपाद राजहंस' यांच्याबद्दल जाणून घ्या...

नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व (Bal Gandharva) यांचा आज स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त जाणून घेऊयात त्यांचा जीवनप्रवास...

Bal Gandharva : 'बालगंधर्व' हे नाव रंगभूमीप्रेमी तसेच नाट्य रसिकाच्या मनातलं सोनेरी पानं. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात प्रवेश करतानाच तुम्हाला दोन फोटो दिसतील. एका फोटोमध्ये रुबाबदार फेटा, कुर्ता आणि पायजमा घातलेला तरुण तर दुसऱ्या फोटोमध्ये नऊवारी साडी नेसलेली आणि दागिने घातलेली एक सुंदर स्त्री. बालगंधर्व यांचं काम पाहण्याचं भाग्य न लाभलेल्यांना  व्यक्ती आणि आजच्या तरुण पिढीला बालगंधर्व यांचे दोन फोटो बरंच काही सांगून जातात. या फोटोंमधील भाव पाहून आजही नाट्यरसिक थक्क होतात. ज्या काळात स्त्रियांना रंगमंचावर अभिनय सादर करण्यास समाज मान्यता नव्हती त्याच काळात स्त्री भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व यांचा आज स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त जाणून घेऊयात त्यांचा जीवनप्रवास...

नारायण श्रीपाद राजहंस यांचा जन्म 26 जून 1888 रोजी झाला. 1905 साली किर्लोस्कर नाटक मंडलीच्या शाकुंतल नाटकातून त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. त्यांनी या नाटकामध्ये शकुंतलेची भूमिका साकारली. या भूमिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. तेव्हापासूनच त्यांना नाटकामध्ये स्त्र आणि पुरूष अशा दोन्ही भूमिका साकारण्यास सुरुवात केली. 1911 साली कृष्णाजी खाडिलकरांच्या मानापमान या नाटकामध्ये बालगंधर्व यांनी साकारलेल्या भामिनी या भूमिकेनं नाट्यरसिकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं. आपल्या सुमधुर आवाजानं आणि अभिनयाची मनं जिंकत होते. वद जाऊ कुणाला शरण, मला मदन भासे, नाथ हा माझा या बालगंधर्व यांनी गायलेली पदे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होती.  

लोकमान्य टिळकांनी बहाल केली 'बालगंधर्व' पदवी 
बालगंधर्व हे भास्करबुवा बखले यांचे शिष्य होते. त्यांचे नाट्यसंगीत ऐकून आणि अभिनय पाहून अनेक दिग्गज यांच्या पाठिवर शाब्बासकीची थाप देत होते. आचार्य अत्रे एकदा म्हणाले होते, 'पुरुषाच्या देहातून स्त्रीचे सौंदर्य इतक्या मोहकतेने कधीच प्रकट झाले नसेल.' नारायण श्रीपाद राजहंस यांचा अभिनय पाहिल्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना 'बालगंधर्व' पदवी बहाल केली. त्यानंतर त्यांना यांच नावानं संबोधलं जाऊ लागलं. 

कर्ज,आर्थिक चढ उताराची परवा न करता केली रंगभूमीची सेवा 
1913 मध्ये बालगंधर्व यांनी गणेश गोविंद बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्यासह किर्लोस्कर नाटक संस्था सोडली. त्यानंतर त्यांनी गंधर्व संगीत मंडळीची स्थापना केली. 1921 मध्ये कर्जात अडकलेल्या या नव्या कंपनीचे  बालगंधर्व हे एकमेव मालक होते. त्यानंतर त्यांच्या नाटकांनी मिळवलेल्या लोकप्रियतेच्या जोरावर त्यापुढच्या सात वर्षांत कंपनीने सर्व देणी फेडली.  बालगंधर्व यांनी त्यांच्या जीवनात आर्थिक चढ-उतारा आणि डोक्यावर असणारे कर्ज या सर्व गोष्टींचा समना केला पण रंगभूमीची सेवा करत होते. नाटकामध्ये वापरण्यात येणारी  प्रॉपर्टी तसेच नाटकातील भूमिकेचे दागिने या सर्व गोष्टींचा अस्सलपणा राखण्याचा बालगंधर्वांचा आग्रह होता. 

पुरस्कारांचा वर्षाव
बालगंधर्व यांचा 1955 साली संगीत नाटक अकादमीने राष्ट्रपती पदक देऊन सन्मान केला. भारत सरकारने बालगंधर्वाना इ.स. 1964 साली पद्मभूषण ह्या पुरस्काराने गौरविले.  विष्णूदास भावे पुरस्कार देखील बालगंधर्व यांना हा पुरस्कार मिळाला होता. 15 जुलै 1967 रोजी बालगंधर्व यांचे निधन झाले. आजही नाट्यप्रेमींच्या मनातील स्थान हे अढळ आहे. 

हेही वाचा: 

Tejaswini Pandit : आईला मिळाला ‘बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार'; तेजस्विनी पंडितने भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती

प्रियांका कुलकर्णी या एबीपी माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Arbaz Shaikh On Nagraj Manjule: 'तुला गाडीची काय गरज?'; 'सैराट' फेम सल्यानं बुक केलेली नवीकोरी गाडी नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केलेली, काय घडलेलं?
'सैराट' फेम सल्यानं बुक केलेली नवीकोरी गाडी नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केलेली, काय घडलेलं?
Clarence Carter Passes Away: दिग्गज गायकानं वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अजरामर गाण्यांच्या जोरावर दोनदा मिळवलेलं ग्रॅमीसाठी नॉमिनेशन
दिग्गज गायकानं वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अजरामर गाण्यांच्या जोरावर दोनदा मिळवलेलं ग्रॅमीसाठी नॉमिनेशन
Ranbir Kapoor Bought Property In Ayodhya: 'मी केवळ त्या हाकेला साद दिलीय...', रणबीर कपूरचा रामनगरी अयोध्येत कोट्यवधींचा व्यवहार
'मी केवळ त्या हाकेला साद दिलीय...', रणबीर कपूरचा रामनगरी अयोध्येत कोट्यवधींचा व्यवहार
Marathi Actress Shilpa Thakre: 'महाराष्ट्राची फेव्हरेट एक्सप्रेशन क्वीन' नव्या रुपात; नायिका साकरल्यानंतर आता 'ही' सुप्रसिद्ध अभिनेत्री खलनायिका साकारणार
'महाराष्ट्राची फेव्हरेट एक्सप्रेशन क्वीन' नव्या रुपात; नायिका साकरल्यानंतर आता 'ही' सुप्रसिद्ध अभिनेत्री खलनायिका साकारणार

व्हिडीओ

Raju Shetty Protest :राजू शेट्टींना फरफटत नेलं, काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Land Scam : बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 310 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात कारवाई 
बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 310 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात कारवाई 
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
Congress Leader: काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
Devendra Fadnavis: कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
Raju Shetti on Devendra Fadnavis: 'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
Embed widget