एक्स्प्लोर

BLOG : किरण ठाकूर; शांत आणि तरीही स्पष्ट

Kiran Thakur, BLOG : ठाकूर सर कमी बोलायचे. ऐकण्यावर त्यांचा भर असायचा . पत्रकारांसाठी तसा हा दुर्मिळ गुण . रानडे इन्स्टिट्यूट च्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे विभागप्रमुख म्हणून त्यांचा दरारा किंवा जरब वाटायची नाही. वाटायचा तो आपलेपणा . वर्गात आले की समोरच्या विद्यार्थ्यांवर एक मिश्किल नजर फिरवायचे . पत्रकारितेचं शिक्षण घेण्यासाठी दाखल झालेले अनेकजण सुरुवातील टिळक - आगकरांचा अभिनिवेश बाळगून असतात . व्यावसायिक पत्रकारितेच्या पाण्यात अजून उतरलेले नसल्यानं त्यांचं भावनिक रेघोट्या मारणं सुरु असतं . शिकवायला आलेल्या शिक्षकाला उलट सुलट प्रश्न विचारणं म्हणजे अनेकांना पराक्रम वाटतो . ठाकूर सर अशांना काही बोलून नाउमेद करायचे नाहीत , पण त्याचवेळी पत्रकारिता क्षेत्रातील वास्तवाची जाणीव करून देण्याचं काम ते सुरु करायचे . त्यासाठी ते स्वतः ला पत्रकारितेत सध्या जे सुरु आहे त्याबद्दल अपडेटेड  ठेवायचे . अध्यापनाच्या क्षेत्रात उतरल्यावर देखील सतत बदलत जाणाऱ्या फिल्ड सोबतचा कानेकट त्यांनी जाणीवपूर्वक जपला होता . पत्रकारितेचा कोर्स चालवणाऱ्या इतर अनेक संस्थांमधील शिक्षकांपेक्षा ठाकूर सरांचं हे वेगळेपण उठून दिसणारं .  

पत्रकारितेच्या परंपरागत शिक्षणाबरोबर नवं तंत्रज्ञान आत्मसात करायला हवं हे पटवून द्यायचा त्यांचा प्रयत्न असायचा . याचाच भाग म्हणून रानडे इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी टेक्निकल रायटिंग कोर्सची सुरुवात केली . अनेकांना त्यावेळी त्याच महत्व पटलं नाही . पण ज्यांनी ठाकूर सरांचं ऐकलं आणि तो कोर्स केला ते पुढे गेले . 
व्यवसायिक पत्रकारिता आणि त्याचवेळी समाज आणि लोकांबद्दलची बांधिलकी जपणं हे तसं कौशल्याचं काम . ठाकूर सरांनी तीस वर्षांच्या पत्रकारितेत ते कौशल्य कमावलं होतं . अध्यापनाच्या क्षेत्रात उतरल्यावर देखील तो पीळ त्यांनी कायम राखला .  
 
रानडे इन्स्टिट्यूट मध्ये देशातील अनेक नावाजलेल्या पत्रकारांना आमंत्रित केलं जायचं . मुंबई आणि कधी दिल्लीहून ते पत्रकार लेक्चर घेण्यासाठी यायचे . फक्त पत्रकारिता क्षेत्रातीलच नाही तर सामाजिक चळवळी आणि राजकीय  क्षेत्रांमध्ये काम करणारे अनेकजण त्यावेळी लेक्चरर म्हणून बोलावले जायचे . विद्यार्थ्यांना त्या लेक्चरर म्हणून येणाऱ्या व्यक्तीला  हवा तो प्रश्न विचारता यायचा आणि लेक्चर देण्यासाठी आलेल्या त्या व्यक्तीलाही तिची मतं कितीही टोकाची असली तरी मोकळेपणाने मांडता यायची . आज याच अप्रूप वाटणं साहजिक आहे . रानडे इन्स्टिट्यूटचा  गाडा हाकणं तसं सोपं नव्हतं . अनेक वल्ली इथं होत्या . गेस्ट लेक्चरर म्हणून येणाऱ्या अनेकांच्या अनेक तऱ्हा होत्या. राजकारणही होतं . पण  ठाकूर सरांचा शांतपणा आणि संयम त्यावेळी वरचढ ठरला . रानडे इन्स्टिट्यूटची प्रत्येकावर्षीची ब्याच म्हणजे विविधतेचा गुच्छ असायचा. राज्यातील वेगवगेळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी निवडले जायचे. त्यामध्ये इतर राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची भर पडायची . एक दोन परदेशी विद्यार्थीही असायचे . साहजिकच ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी सुरुवातीला कोमेजायचे . आजुबाजाचं वातावरण बघून भांबावून जायचे .  अशांना ठाकूर सरांची नजर अचूक हेरायची.  यु एन आय  , द  ऑब्झर्व्हर , इंडियन पोस्ट अशा माध्यमांमध्ये त्यांनी काम केलं होतं आणि वर्गातही ते इंग्रजीतूनच शिकवायचे . पण मराठी भाषेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नजरेत दुय्य्मपणाचा भाव कधीही जाणवला नाही . अगदी सहजपणे अशांशी ठाकूर सर बोलायचे .  त्यातून त्या विद्यार्थ्याला त्याच्याही नकळतपणे आत्मविश्वास मिळायचा . ठाकूर सरांच्या या हातोटीने अनेकांची गाडी पुढे सरकली.
  
ठाकूर सरांच्या बोलण्यात कधीही आमच्या काळात असं होतं आणि आता हे असं झालंय असं यायचं नाही . त्यामुळं त्यांना चिडलेलंही कुणी पाहिलं नाही . शिकवायला येणारे अनेकजण पत्रकारितेत होणारे बदल आवडत नसल्याने चिडचिड करायचे आणि आमच्याचवेळी कसं व्याकरण तपासलं जायचं आणि पत्रकारितेचं पावित्र्य जपलं जायचं हे सांगायचे . ठाकूर सरांनी हे असं भूतकाळात रमणं टाळलं . म्हणूनच अखेरपर्यंत ते सक्रिय पत्रकार राहिले . अनेक संस्थांसाठी काम करताना पत्रकार म्हणून त्यांचं लेखन त्यामुळेच सुरु राहिलं . पत्रकाराच्या एखाद्या बातमीबद्द आज सोशल मीडियावर टोकाच्या प्रतिक्रिया उमटतात . काहीवेळा कौतूक होतं तर काहीवेळा शिव्यांची लाखोली वाहिली जाते . कौतुक करणाऱ्यांमध्ये जसे काही तोंडदेखलेपणा करणारे असतात तसं नावं ठेवणाऱ्यांमध्ये पूर्वग्रह बाळगणारेही असतात . या उलट - सुलट प्रतिक्रियांमुळे अनेकदा तो पत्रकार गोंधळतो . आपण राईट ट्रॅकवर आहोत का , की काहीतरी चुकलंय असं त्याला वाटायला लागतं . अशावेळी ठाकूर सरांचा फोन किंवा मेसेज आल्याचा अनुभव त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी अनेकांना आलाय . त्यांच्या त्या फोन किंवा मेसेजनंतर शंका - कुशंकांचा धुरळा खाली बसायचा . चित्र शांत आणि स्पष्टपणे उंटायचं . ठाकूर सर असेच लक्षात राहतील . शांत आणि तरीही स्पष्ट ... 
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
Pimpri-Pune Liquor Poisoning:  योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
IPL Trade News : हार्दिक पांड्या घ्या, शिवम दुबे अन् आयुष म्हात्रे द्या.... आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 'ट्रेड'ची चर्चा; CSK कर्णधार बदलणार?
हार्दिक पांड्या घ्या, शिवम दुबे अन् आयुष म्हात्रे द्या.... आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 'ट्रेड'ची चर्चा; CSK कर्णधार बदलणार?

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
Pimpri-Pune Liquor Poisoning:  योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
IPL Trade News : हार्दिक पांड्या घ्या, शिवम दुबे अन् आयुष म्हात्रे द्या.... आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 'ट्रेड'ची चर्चा; CSK कर्णधार बदलणार?
हार्दिक पांड्या घ्या, शिवम दुबे अन् आयुष म्हात्रे द्या.... आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 'ट्रेड'ची चर्चा; CSK कर्णधार बदलणार?
Satara Sangli MLC : मविआत सातारा सांगलीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला, उमेदवार कोण असणार? मतदारांची संख्या नेमकी किती? 
सातारा सांगलीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला, उमेदवार कोण असणार? मतदारांची संख्या नेमकी किती? 
Vasai Cyber Fraud : धक्कादायक! थेट न्यायाधीशांच्या पत्नीला सायबर चोरांनी घातला गंडा; 'ऑफिसर कोड' टाकताच बँक खातं रिकामं
धक्कादायक! थेट न्यायाधीशांच्या पत्नीला सायबर चोरांनी घातला गंडा; 'ऑफिसर कोड' टाकताच बँक खातं रिकामं
Shrikant Shinde Beed Visit: बीडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खासदारांना निवेदन देण्यापूर्वीच वृद्ध वडिलांचा मृत्यू; आधी मुलीला वाचवताना मुलगा गेला, आता मदत मागताना बाप हरपला
बीडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खासदारांना निवेदन देण्यापूर्वीच वृद्ध वडिलांचा मृत्यू; आधी मुलीला वाचवताना मुलगा गेला, आता मदत मागताना बाप हरपला
Eknath Khadse: 'महार वतन' जमीन प्रकरणात एकनाथ खडसेंना मोठा दिलासा; न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर; विरोधकांवर हल्लाबोल करत नाथाभाऊ म्हणाले...
'महार वतन' जमीन प्रकरणात एकनाथ खडसेंना मोठा दिलासा; न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर; विरोधकांवर हल्लाबोल करत नाथाभाऊ म्हणाले...
Embed widget