एक्स्प्लोर

Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 

Team India : नव्या वर्षात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 जानेवारीपासून पाचवी कसोटी सुरु होणार आहे. नववर्षाची सुरुवात विजयानं करण्याची संधी भारताकडे आहे. 

Test Matches For Team India In 2025 नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटसाठी 2024 हे वर्ष संमिश्र राहिलं. भारतानं तब्बल  17 वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टी 20 वर्ल्ड कप जिंकला. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतानं विश्वविजेतेपद मिळवलं.टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर गौतम गंभीर भारताचा प्रशिक्षक बनला, त्यानं राहुल द्रविडची जागा घेतली. त्यानंतर भारतीय संघाची एकदिवसीय आणि कसोटी सामन्यातील कामगिरी खराब होत आहे. श्रीलंकेत भारताला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. यानंतर भारतात झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी देखील पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडनं 3-0 नं भारताला पराभूत केलं. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्राफीत भारताला दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. आता या मालिकेतील एक कसोटी 2025 मध्ये होणार आहे. त्या कसोटीसह भारत 2025 मध्ये 10 कसोटी सामने खेळणार आहे.  

गौतम गंभीर भारताचा प्रशिक्षक झाल्यानंतर झालेल्या मालिकेत भारताला पराभव स्वीकारावा लागला. भारतानं तब्बल 12 वर्षानंतर मायदेशात मालिका गमावली. न्यूझीलंडनं भारताला 3-0 असं पराभूत केलं. आस्ट्रेलियानं भारतावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत 2-1 अशी आघाडी घेतलीय. या मालिकेतील पाचवा सामना जानेवारी 2025 मध्ये होणार आहे. 

भारतीय संघ 2025 मध्ये नेमके किती कसोटी सामने खेळणार?

भारत 2025 मध्ये पहिली मॅच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 जानेवारीला कसोटी सुरु  होईल. जर भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला तर तो एक कसोटी सामना खेळता येऊ शकतो. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. तिथं भारत आणि इंग्लंड यांच्यात  5 सामन्यांची कसोटी मालिका पार पडेल.  

इंग्लंड दौऱ्यावरुन आल्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडेल. दोन्ही संघांमधील ही मालिका भारतात होईल. यानंतर आणखी एक मालिका भारतात होईल. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात  2 कसोटी सामन्यांची मालिका होईल. म्हणजेच भारत 2025 मध्ये एकूण 10 कसोटी सामने खेळेल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पोहोचल्यास ती संख्या 11 होईल. 

दरम्यान, भारताला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आपल्याकडेच ठेवायची असल्यास सिडनी कसोटी जिंकणं आवश्यक आहे. सिडनी कसोटीत विजय मिळवल्यास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या शक्यता वाढू शकतात. 

इतर बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Points Table Update : RR, RCB ते MI, CSK सर्व 10 संघांनी पहिला सामना खेळला, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्याच 5 दिवसात मोठा ट्विस्ट, कोण टॉपवर, कोण तळाशी?
RR, RCB ते MI, CSK सर्व 10 संघांनी पहिला सामना खेळला, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्याच 5 दिवसात मोठा ट्विस्ट, कोण टॉपवर, कोण तळाशी?
LSG vs DC IPL 2026 : लखनऊच्या नवाबांची घरच्याच मैदानात शिकार! दिल्ली कॅपिटल्सची विजयी सलामी, Points Table मध्ये उघडले खाते
लखनऊच्या नवाबांची घरच्याच मैदानात शिकार! दिल्ली कॅपिटल्सची विजयी सलामी, Points Table मध्ये उघडले खाते
LSG vs DC IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सचा शानदार विजय; लखनऊ सुपर जायंट्सवर 6 गडी राखून मात
LSG vs DC Update : दिल्ली कॅपिटल्सचा शानदार विजय; लखनऊ सुपर जायंट्सवर 6 गडी राखून मात
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या कौतुकाला 'सीमा' उरली नाही, पाकिस्तानातूनही शाबासकी, पाकचा माजी खेळाडू म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या कौतुकाला 'सीमा' उरली नाही, पाकिस्तानातूनही शाबासकी, पाकचा माजी खेळाडू म्हणाला...

व्हिडीओ

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Embed widget