एक्स्प्लोर

Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 

Team India : नव्या वर्षात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 जानेवारीपासून पाचवी कसोटी सुरु होणार आहे. नववर्षाची सुरुवात विजयानं करण्याची संधी भारताकडे आहे. 

Test Matches For Team India In 2025 नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटसाठी 2024 हे वर्ष संमिश्र राहिलं. भारतानं तब्बल  17 वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टी 20 वर्ल्ड कप जिंकला. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतानं विश्वविजेतेपद मिळवलं.टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर गौतम गंभीर भारताचा प्रशिक्षक बनला, त्यानं राहुल द्रविडची जागा घेतली. त्यानंतर भारतीय संघाची एकदिवसीय आणि कसोटी सामन्यातील कामगिरी खराब होत आहे. श्रीलंकेत भारताला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. यानंतर भारतात झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी देखील पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडनं 3-0 नं भारताला पराभूत केलं. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्राफीत भारताला दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. आता या मालिकेतील एक कसोटी 2025 मध्ये होणार आहे. त्या कसोटीसह भारत 2025 मध्ये 10 कसोटी सामने खेळणार आहे.  

गौतम गंभीर भारताचा प्रशिक्षक झाल्यानंतर झालेल्या मालिकेत भारताला पराभव स्वीकारावा लागला. भारतानं तब्बल 12 वर्षानंतर मायदेशात मालिका गमावली. न्यूझीलंडनं भारताला 3-0 असं पराभूत केलं. आस्ट्रेलियानं भारतावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत 2-1 अशी आघाडी घेतलीय. या मालिकेतील पाचवा सामना जानेवारी 2025 मध्ये होणार आहे. 

भारतीय संघ 2025 मध्ये नेमके किती कसोटी सामने खेळणार?

भारत 2025 मध्ये पहिली मॅच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 जानेवारीला कसोटी सुरु  होईल. जर भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला तर तो एक कसोटी सामना खेळता येऊ शकतो. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. तिथं भारत आणि इंग्लंड यांच्यात  5 सामन्यांची कसोटी मालिका पार पडेल.  

इंग्लंड दौऱ्यावरुन आल्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडेल. दोन्ही संघांमधील ही मालिका भारतात होईल. यानंतर आणखी एक मालिका भारतात होईल. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात  2 कसोटी सामन्यांची मालिका होईल. म्हणजेच भारत 2025 मध्ये एकूण 10 कसोटी सामने खेळेल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पोहोचल्यास ती संख्या 11 होईल. 

दरम्यान, भारताला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आपल्याकडेच ठेवायची असल्यास सिडनी कसोटी जिंकणं आवश्यक आहे. सिडनी कसोटीत विजय मिळवल्यास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या शक्यता वाढू शकतात. 

इतर बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi : अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं, बेबी बॉसचं झिम्बाब्वे विरुद्ध वादळी अर्धशतक 
अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं,झिम्बाब्वेमध्ये बेबी बॉसची वादळी फलंदाजी
ICC नं WTC फायनलची तारीख आणि स्टेडियम ठरवलं, गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी, भारत कितव्या स्थानी? 
ICC नं WTC फायनलची तारीख आणि स्टेडियम ठरवलं, भारत अंतिम सामन्यात पोहोचणार का? गुणतालिकेत कितव्या स्थानी
Ind vs ZIM 1st T20 Team India Playing XI: प्रिन्स यादव, रवी बिश्नोई IN, रिंकू सिंग OUT...; झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
प्रिन्स यादव, रवी बिश्नोई IN, रिंकू सिंग OUT...; झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shreyas Iyer : अपयशाची भीती बाळगू नका, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम सज्ज  
अपयशाची भीती बाळगू नका, दोन मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
Embed widget