एक्स्प्लोर

नक्षलवादाला लगाम घालत या भागात आम्ही उद्योग आणले; चंद्रपुरात मोदींचं भाषण, काँग्रेस, मविआवर हल्लाबोल

नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला चिमूरच्या क्रांतिकारकांना अभिवादन केलं. बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतीला देखील अभिवादन केलं.

चंद्रपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी प्रचारसभेचा आज दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मोदींनी धुळ्यातून आपल्या निवडणूक प्रचारसभांना सुरुवात केली. त्यावेळी, संविधान आणि जातीय राजकारणावरुन काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. तसेच, एक है तो सेफ है... असा नाराही मोदींनी दिला. त्यानंतर, आज विदर्भातील चिमूर मतदारसंघातून मोदींनी महायुतीसाठी प्रचारसभा घेतली. येथील सभेतून त्यांनी थेट महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. विकासाचा अडथळा निर्माण करणारी ही आघाडी म्हणजे बिघाडी आहे. तर, कलम 370 पुन्हा लागू करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होतअसल्याचे सांगत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले. तसेच, आम्ही नलक्षवादाला (Naxal) लगाम लागवल्याने येथील भागात उद्योग येऊ लागले असे मोदींनी म्हटले. दरम्यान, एकीकडे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेले जात असल्याची टीका महाविकास आघाडीचे नेते करत असताना, मोदींनी नक्षलग्रस्त भागात उद्योग आणल्याचे म्हटले.  

नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला चिमूरच्या क्रांतिकारकांना अभिवादन केलं. बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतीला देखील अभिवादन केलं. सभेत आलेल्या गर्दीचा विशेष उल्लेख करुन मोदींनी महायुतीने जाहीर केलेल्या भाजपच्या संकल् पत्राचे कौतुक केले. हे संकल्प महाराष्ट्राच्या विकासाची गॅरंटी आहे, असेही मोदींनी म्हटले. 

मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना म्हटले की, आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खिलाडी आहेत. जम्मू-कश्मीर अनेक दशकं दहशतवादात होरपळत होता, संविधानाची माळ जपणाऱ्यांनी सात दशकं बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान कश्मीरमध्ये लागू होऊ दिलं नाही. मात्र, मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवून काश्मीरमधील लोकांचं भारताशी नातं जोडलं. देशात 70 वर्षांपासून दोन संविधान होते, जोपर्यंत मोदी आला नाही, तोपर्यंत देशात दोन संविधान होते. एक संपूर्ण देशात आणि दुसरं जम्मू काश्मीरमध्ये होतं. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि येथील उच्च न्यायालयातील न्यायाधीश संविधानाची शपथ घेत नव्हते. कारण, 370 कलम लागू असल्याने ही मोठी अडसर होती. मात्र, आपल्या आशीर्वादाने मोदी सरकार आल्यानंतर आम्ही कलम 370 हटवले. पण, काँग्रेसवाल्यांना हे पचनी पडत नाही, म्हणूनच तेथील सरकार काँग्रेससह पुन्हा एकदा कलम 370 लागू करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करत आहेत, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

नक्षलवादाला चाफ लावत चंद्रपुरात उद्योग आणले

चंद्रपूरने अनेक वर्षे नक्षलवाद सहन केला, अनेक तरुणांचे बळी गेले, त्यामुळे या भागात उद्योग येऊ शकले नाहीत. आम्ही नक्षलवादावर लगाम लागली, त्यामुळे या भागात आता उद्योग येत आहेत. करोडो लोकांना पीएम आवास योजनेचा लाभ मिळाला. देशातील 25 कोटी लोकं दारिद्र्याच्यारेषेबाहेर आले, या भागातील चिंनोर तांदुळाच्या उत्तम क्वालिटीचाही मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केला. तसेच, महाविकास आघाडीने जलयुक्त शिवार योजना थांबवली, असे म्हणत मोदींनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. हम एक है तो सेफ है.... असे म्हणत मोदींनी सर्वांना एकत्र राहण्याचे आवाहन केले. जर तुम्ही एक राहिला नाहीत, तर काँग्रेस तुमचं आरक्षण काढून टाकेन, असेही मोदींनी म्हटले. 

हेही वाचा

'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Rishabh Pant : रिषभ पंतचा निर्णय चुकला, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव असूनही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
रिषभ पंतच्या एका निर्णयाचा फटका, सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा अपयशी, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar On Yuti : कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचं नाही, शरद पवारांच्या सूचना
Maha Politics: 'सत्तेच्या टेबलवर बसणं गरजेचं', ठाकरेंना धक्का देत Deepesh Mhatre यांचा BJP मध्ये प्रवेश
Raj Thackeray Voting List : राज ठाकरेंच्या मनसेचं ठरलं? दुबार मतादारांवर नजर
Ajit Pawar in Satara: 'मला अनेक ठिकाणी टार्गेट केलं जातं'; अजित पवारांचा सूचक इशारा
Mahayuti Rift: 'आघाडीत फायदा असेल तरच युती, अन्यथा स्वबळावर लढा', अजित पवारांचे कार्यकर्त्यांना संकेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Rishabh Pant : रिषभ पंतचा निर्णय चुकला, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव असूनही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
रिषभ पंतच्या एका निर्णयाचा फटका, सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा अपयशी, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Akash Kumar Choudhary :6,6,6,6,6,6,6,6..सलग 8 षटकार ठोकले, रणजी स्पर्धेत मेघालयच्या युवा खेळाडूची वादळी फलंदाजी, BCCI कडून व्हिडिओ शेअर  
एक दोन नव्हे सलग आठ षटकार ठोकले, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक, रणजीमध्ये आकाश चौधरीचं वादळ 
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Share Market : शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात 'या' गुंतवणूकदारांनी 36 हजार कोटी कमावले, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात गुंतवणूकदारांची 36 हजार कोटींची कमाई, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
Embed widget