एक्स्प्लोर

भारत-पाकिस्तान सामन्याला उरले अवघे काही तास!

बर्मिंगहम: अब आयेगा क्रिकेट का असली मजा... कारण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं रणांगण सज्ज झालं आहे भारत आणि पाकिस्तान संघांमधल्या महामुकाबल्यासाठी. एकमेकांचे सख्खे शेजारी, पण कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन देशांसाठी विजेतेपदाच्या ट्रॉफीइतकाच एकमेकांविरुद्धचा विजयही तितकाच प्रतिष्ठेचा असतो. त्यामुळं भारत-पाकिस्तान संघांमधला क्रिकेटचा सामना हा उभय देशांमधल्या नागरिकांसाठी राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा बनतो. चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या या भारत-पाकिस्तान लढाईच्या निमित्तानं विश्वचषकाचा इतिहास पाहायचा झाला, तर भारताचं पाकिस्तानवर 10-0 असं निर्विवाद वर्चस्व आहे. वन डेच्या विश्वचषकात भारतानं सहापैकी सहा सामन्यांत पाकिस्तानला लोळवलं आहे, तर ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतानं चारपैकी चार सामन्यांत पाकिस्तानवर कुरघोडी केली आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफीत मात्र पाकिस्तानच्या भारतावरच्या विजयाचं समीकरण हे 2-1 असं सरस आहे भारत-पाकिस्तान संघांमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे उभय संघ तब्बल 15 महिन्यांनी आमनेसामने येत आहेत. भारत-पाकिस्तानमधला अखेरचा सामना हा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात दिनांक 19 मार्च 2016 रोजी खेळवण्यात आला होता. कोलकात्याच्या त्या सामन्याआधी दोन्ही संघ वन डे विश्वचषकात ऑस्ट्रेलियातल्या अॅडलेड ओव्हलवर एकमेकांना भिडले होते. तारीख होती 15 फेब्रुवारी 2015. या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्याला आधीच्या इतिहासावर कसं जोखायचं? त्यामुळंच विराट कोहलीची टीम इंडिया आणि सरफराज अहमदची पाकिस्तानी फौज यांच्यात होणाऱ्या बर्मिंगहॅमच्या लढाईकडे भारत-पाकिस्तान क्रिकेटिंग रायव्हलरीचा फ्रेश स्टार्ट म्हणून पाहिलं जात आहे. क्रिकेटिंग रायव्हलरीच्या नव्या जमान्यात पहिला बदल हा भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्त्वात झाला आहे. महेंद्रसिंग धोनीनं तिन्ही फॉरमॅटमध्ये नेतृत्त्वाची बॅटन विराट कोहलीच्या हाती सोपवली आहे. पाकिस्तानच्या नेतृत्त्वातही बदल होत होत ती जबाबदारी आता यष्टिरक्षक सरफराज अहमदच्या खांद्यावर आहे. विराट कोहलीचं बलस्थान म्हणजे त्याच्या पाठीशी धोनीचा अनुभव आहेच, पण शिखर धवन, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा ही मंडळीही आता परिपक्व झाली आहेत. पण मिसबाह अल हक, शाहिद आफ्रिदी, युनूस खानच्या निवृत्तीनं सरफराजच्या पाठीशी अनुभवी वीर उरलेला नाही. अनुभवाच्या आघाडीवर त्याची भिस्त प्रामुख्यानं शोएब मलिकवरच राहिल. त्याव्यतिरिक्त पाकिस्तानी फलंदाज म्हणजे टीम इंडियासाठी कोरा करकरीत अनुभव आहे. मोहम्मद आमिर, वहाब रियाझ, जुनैद खान, हसन अली आणि फहिम अश्रफ यांच्यासारख्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या वेगवान आक्रमणाची धार अजूनही कायम ठेवली आहे. पण भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या यांच्यामुळं भारताचा तोफखानाही आता तेजीत धडधडायला लागला आहे. पाकिस्तानच्या मोहम्मद हफिज, शादाब खान आणि इमाद वासिम यांच्या फिरकीला भारताकडे अश्विन आणि जाडेजाचं उत्तर आहे. भारत आणि पाकिस्तान संघांची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर झालेली तुलना पाहता, टीम इंडियाचं पारडं जड भासतं. पाकिस्तानचा संघ हा बेभरवशाचा असला तरी तो कधीही धोकादायक ठरू शकतो. भारत आणि पाकिस्तान सामना म्हणजे एक अग्निदिव्य असतं. आणि या अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघणारे वीर आपल्या देशाला विजयाचा नजराणा भेट करत असतात. बर्मिंगहॅमच्या लढाईत ते वीर विराटच्या टीम इंडियाचे असावेत, हीच सदिच्छा.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RR vs DC Live Score IPL 2026 : पराभवांच्या छायेत दिल्ली, स्टार्क बनणार का गेमचेंजर? राजस्थानसमोर आज निर्णायक सामना
RR vs DC Live Update : पराभवांच्या छायेत दिल्ली, स्टार्क बनणार का गेमचेंजर? राजस्थानसमोर आज निर्णायक सामना
Mitchell Santner News : आयपीएलच्या नादात सँटनरचा 'गेम' झाला! एका चुकीची मोठी किंमत मोजावी लागली, न्यूझीलंडच्या गोटात खळबळ, नेमकं काय घडलं?
आयपीएलच्या नादात सँटनरचा 'गेम' झाला! एका चुकीची मोठी किंमत मोजावी लागली, न्यूझीलंडच्या गोटात खळबळ, नेमकं काय घडलं?
MI Playoff Scenario IPL 2026 : खेळ अजून संपलेला नाही! मुंबई इंडियन्ससाठी 'करो या मरो'ची स्थिती; फक्त 'हे' दोन बदल अन् MI थेट प्लेऑफमध्ये?, जाणून घ्या समीकरण
खेळ अजून संपलेला नाही! मुंबई इंडियन्ससाठी 'करो या मरो'ची स्थिती; फक्त 'हे' दोन बदल अन् MI थेट प्लेऑफमध्ये?, जाणून घ्या समीकरण
दोन क्रिकेटपटूंनी महिला डॉक्टरांच्या बाथरुममधील गुपचूप चित्रीकरण केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ; पोलिसांनी बेड्या ठोकल्या
दोन क्रिकेटपटूंनी महिला डॉक्टरांच्या बाथरुममधील गुपचूप चित्रीकरण केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ; पोलिसांनी बेड्या ठोकल्या

व्हिडीओ

Mumbai Pune Express way traffic jam : 1,2,3,4,5..एक्स्प्रेस वेवर धडाधड गाड्या बंद, धडकी भरवणाराVIDEO
Amol Mitkari Akola : उमेदवारी नाकारतांना विश्वासात घेण्याचं सौजन्यही दाखवलं नाही
Bachchu Kadu Raigad : शिवसेना वाढवण्यासाठी कंबर कसली!राजकीय प्रवासावर बच्चू कडूंचा नवा 'प्लॅन'
Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Amol Mitkari Naraj : माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का? अमोल मिटकरींची नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता
Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता
Raj Thackeray Post On Maharashtra Din: हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट, सरकारला घेरलं!
हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट, सरकारला घेरलं!
वसतिगृहातील मुलीला घरी बोलवलं; बायकोची साडी प्रेस करण्यास दिली, सेवानिवृत्त प्राचार्याकडून विनयभंग
वसतिगृहातील मुलीला घरी बोलवलं; बायकोची साडी प्रेस करण्यास दिली, सेवानिवृत्त प्राचार्याकडून विनयभंग
दोन क्रिकेटपटूंनी महिला डॉक्टरांच्या बाथरुममधील गुपचूप चित्रीकरण केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ; पोलिसांनी बेड्या ठोकल्या
दोन क्रिकेटपटूंनी महिला डॉक्टरांच्या बाथरुममधील गुपचूप चित्रीकरण केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ; पोलिसांनी बेड्या ठोकल्या
Video: देवेंद्र फडणवीसांनी मागितली द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची माफी; मिसिंग लिंकचं लोकार्पण, 'नवं' नावही सांगितलं
Video: देवेंद्र फडणवीसांनी मागितली द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची माफी; मिसिंग लिंकचं लोकार्पण, 'नवं' नावही सांगितलं
Parbhani Fire News: लग्नाच्या धामधुमीत आगीचं तांडव, विद्युत डीपीतील स्पार्किंगमुळे घरांना लागली आग, Photo
लग्नाच्या धामधुमीत आगीचं तांडव, विद्युत डीपीतील स्पार्किंगमुळे घरांना लागली आग, Photo
Harbhajan Singh: गद्दारीचा टिळा थेट घरावर झळकताच भलताच संतापला हरभजन सिंग! थेट कोर्टात पोहोचताच नेमकं घडलं तरी काय?
गद्दारीचा टिळा थेट घरावर झळकताच भलताच संतापला हरभजन सिंग! थेट कोर्टात पोहोचताच नेमकं घडलं तरी काय?
मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीत प्रवासी अडकले, संतापले; एकनाथ शिंदे म्हणाले, टोल घेऊ नका, अधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीत प्रवासी अडकले, संतापले; एकनाथ शिंदे म्हणाले, टोल घेऊ नका, अधिकाऱ्यांना निर्देश
Embed widget