एक्स्प्लोर

भारत-पाकिस्तान सामन्याला उरले अवघे काही तास!

बर्मिंगहम: अब आयेगा क्रिकेट का असली मजा... कारण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं रणांगण सज्ज झालं आहे भारत आणि पाकिस्तान संघांमधल्या महामुकाबल्यासाठी. एकमेकांचे सख्खे शेजारी, पण कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन देशांसाठी विजेतेपदाच्या ट्रॉफीइतकाच एकमेकांविरुद्धचा विजयही तितकाच प्रतिष्ठेचा असतो. त्यामुळं भारत-पाकिस्तान संघांमधला क्रिकेटचा सामना हा उभय देशांमधल्या नागरिकांसाठी राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा बनतो. चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या या भारत-पाकिस्तान लढाईच्या निमित्तानं विश्वचषकाचा इतिहास पाहायचा झाला, तर भारताचं पाकिस्तानवर 10-0 असं निर्विवाद वर्चस्व आहे. वन डेच्या विश्वचषकात भारतानं सहापैकी सहा सामन्यांत पाकिस्तानला लोळवलं आहे, तर ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतानं चारपैकी चार सामन्यांत पाकिस्तानवर कुरघोडी केली आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफीत मात्र पाकिस्तानच्या भारतावरच्या विजयाचं समीकरण हे 2-1 असं सरस आहे भारत-पाकिस्तान संघांमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे उभय संघ तब्बल 15 महिन्यांनी आमनेसामने येत आहेत. भारत-पाकिस्तानमधला अखेरचा सामना हा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात दिनांक 19 मार्च 2016 रोजी खेळवण्यात आला होता. कोलकात्याच्या त्या सामन्याआधी दोन्ही संघ वन डे विश्वचषकात ऑस्ट्रेलियातल्या अॅडलेड ओव्हलवर एकमेकांना भिडले होते. तारीख होती 15 फेब्रुवारी 2015. या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्याला आधीच्या इतिहासावर कसं जोखायचं? त्यामुळंच विराट कोहलीची टीम इंडिया आणि सरफराज अहमदची पाकिस्तानी फौज यांच्यात होणाऱ्या बर्मिंगहॅमच्या लढाईकडे भारत-पाकिस्तान क्रिकेटिंग रायव्हलरीचा फ्रेश स्टार्ट म्हणून पाहिलं जात आहे. क्रिकेटिंग रायव्हलरीच्या नव्या जमान्यात पहिला बदल हा भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्त्वात झाला आहे. महेंद्रसिंग धोनीनं तिन्ही फॉरमॅटमध्ये नेतृत्त्वाची बॅटन विराट कोहलीच्या हाती सोपवली आहे. पाकिस्तानच्या नेतृत्त्वातही बदल होत होत ती जबाबदारी आता यष्टिरक्षक सरफराज अहमदच्या खांद्यावर आहे. विराट कोहलीचं बलस्थान म्हणजे त्याच्या पाठीशी धोनीचा अनुभव आहेच, पण शिखर धवन, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा ही मंडळीही आता परिपक्व झाली आहेत. पण मिसबाह अल हक, शाहिद आफ्रिदी, युनूस खानच्या निवृत्तीनं सरफराजच्या पाठीशी अनुभवी वीर उरलेला नाही. अनुभवाच्या आघाडीवर त्याची भिस्त प्रामुख्यानं शोएब मलिकवरच राहिल. त्याव्यतिरिक्त पाकिस्तानी फलंदाज म्हणजे टीम इंडियासाठी कोरा करकरीत अनुभव आहे. मोहम्मद आमिर, वहाब रियाझ, जुनैद खान, हसन अली आणि फहिम अश्रफ यांच्यासारख्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या वेगवान आक्रमणाची धार अजूनही कायम ठेवली आहे. पण भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या यांच्यामुळं भारताचा तोफखानाही आता तेजीत धडधडायला लागला आहे. पाकिस्तानच्या मोहम्मद हफिज, शादाब खान आणि इमाद वासिम यांच्या फिरकीला भारताकडे अश्विन आणि जाडेजाचं उत्तर आहे. भारत आणि पाकिस्तान संघांची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर झालेली तुलना पाहता, टीम इंडियाचं पारडं जड भासतं. पाकिस्तानचा संघ हा बेभरवशाचा असला तरी तो कधीही धोकादायक ठरू शकतो. भारत आणि पाकिस्तान सामना म्हणजे एक अग्निदिव्य असतं. आणि या अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघणारे वीर आपल्या देशाला विजयाचा नजराणा भेट करत असतात. बर्मिंगहॅमच्या लढाईत ते वीर विराटच्या टीम इंडियाचे असावेत, हीच सदिच्छा.

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Ind vs SL Test Series Schedule : टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
India vs Pakistan : ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget