एक्स्प्लोर

राज ठाकरे भाजपसोबत आले तरी त्याचा फार फायदा होणार नाही : रामदास आठवले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपसोबत यायचं असेल तर त्यांना आपल्या पक्षाची भूमिका बदलावी लागेल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपसोबत येणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. राज ठाकरेंबाबत सुरु असलेल्या चर्चांवर बोलताना केंद्रीय मंत्री रामदास यांनी म्हटलं की, राज ठाकरे आमच्या सोबत येत असतील तर त्याचं स्वागतच आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी दिल्ली हिंसाचार, सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती, मुंबई महापालिका निवडणूक अशा विविध विषयांवर भाष्य केलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपसोबत यायचं असेल तर त्यांना आपल्या पक्षाची भूमिका बदलावी लागेल. त्यांनी प्रांतवादाची भूमिका सोडली तर त्यांचे स्वागत आहे. परप्रांतियांचा त्यांच्या पक्षाकडून होत असलेल्या विरोध त्यांना थांबवावा लागेल. मात्र तरीही राज ठाकरे भाजप सोबत आल्याने भाजपला त्याचा फार फायदा होईल असं वाटत नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं. एकीकडे राज ठाकरे आणि भाजपने औरंगाबादच्या नामांतरचा मुद्दा हाती घेतलाय तर रामदास आठवलेंनी त्याला विरोध केला आहे. औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलण्यास रिपाइंचा विरोध असून कोणत्याच भागाचे जुने नाव बदलले जाऊ नये, असं पक्षाला वाटतं. मात्र राज्य शासनाने जर ठरवलं तर नावात बदल केला जाऊ शकतो.

राज्यात घडलं ते दुर्देवी, सर्वात मोठा पक्ष विरोधी पक्षात बसलाय : राज ठाकरे

माझा मूळ डीएनए नव्या झेंड्याच्या रंगाचाच : राज ठाकरे

दिल्लीतील दंगलीला काँग्रेस-आप जबाबदार

सीएए-एनआरसीवरुन दिल्लीत जो हिंसाचार उसळला आहेत, यामध्ये 40 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. दिल्लीतील या हिंसाचाराला काँग्रेस आणि आप जबाबदार आहेत, असा आरोप रामदास आठवले यांनी केला. सीएए-एनआरसीबाबत गैरसमज पसरवण्याचं काम काँग्रेसने केलं. काँग्रेस आणि आपने ठरवलं असतं तर दिल्लीतील दंगल थांबवू शकत होते. मात्र त्यांनी तसं केलं नाही म्हणून दिल्लीत हिंसाचार घडला, असा आरोप रामदास आठवले यांनी केला.

संजय राऊतांवर अन्याय झाला

सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांनी नियुक्ती करण्यात आली यावर बोलताना रामदास आठवले यांनी म्हटलं की, संजय राऊत यांना डावललं गेलं असं मला वाटत नाही. रश्मी ठाकरे यांची संपादकपदी नियुक्ती झाली ही देखील चांगली बाब आहे. मात्र राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात संजय राऊत यांचं योगदान मोठं आहे. शिवसेनेची भूमिका त्यांनी योग्यरितीने मांडली. त्यामुळे संजय राऊत यांना सामनाचे संपादकपद तरी द्यायला हवं होतं. संजय राऊत यांच्यावर पक्षाने अन्याय केला आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर परिस्थिती वेगळी असती, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.

'सामना'च्या संपादकपदी रश्मी ठाकरेंची नियुक्ती, संजय राऊत नाराज असल्याची चर्चा

मुंबईत 2022 नंतर महापौर भाजपचाच असेल, असा विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत रिपाइंला 5-6 जागा हव्या आहेत. नवी मुंबईतही महायुतीचाच महापौर असेल. तर औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूकही सन्मानाने लढणार असून तेथेही महायुतीची सत्ता येईल, असा दावा रामदास आठवलेंनी केला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
जसं मराठी बोलता येतं तसंच हिंदी पण आलं पाहिजे, भाजप आमदार कालिदास कोळंबकरांना हिंदीचा गोडवा
जसं मराठी बोलता येतं तसंच हिंदी पण आलं पाहिजे, भाजप आमदार कालिदास कोळंबकरांना हिंदीचा गोडवा

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
Embed widget