India At 2047: भविष्यातील इस्रोच्या अंतराळ मोहिमा, जाणून घ्या भारत अवकाशात कसे वर्चस्व गाजवेल

India At 2047: भविष्यातील इस्रोच्या अंतराळ मोहिमा, जाणून घ्या भारत अवकाशात कसे वर्चस्व गाजवेल

India At 2047 :  नव्या भारताचं नव्या ढंगातील रूप, जाणून घ्या अमृतमोहत्सवी भारताचा आतापर्यंतचा प्रवास  

India At 2047 :  नव्या भारताचं नव्या ढंगातील रूप, जाणून घ्या अमृतमोहत्सवी भारताचा आतापर्यंतचा प्रवास  

इंडिया@2047 टाईमलाईन

  • स्वातंत्र्यदिन

    भारत-पाकिस्तान फाळणीनंतर देशाला ब्रटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले.

    1947
    1
  • काश्मीरवरून पाहिलं युद्ध

    काश्मीरमधील हिमालयीन प्रदेशावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले.

    1947
    2
  • गोडसेने गांधींची हत्या केली

    राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसेने गोळ्या झाडून हत्या केली होती.

    1948
    3
  • भारत प्रजासत्ताक झाला

    राज्यघटना लागू झाल्यानंतर भारत प्रजासत्ताक बनला.

    1950
    4
  • लोकसभेची पहिली निवडणूक

    स्वातंत्र्यानंतर भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली.

    1951
    5
  • पहिले भारत-चीन युद्ध

    सीमावादावरून भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले.

    1962
    6
  • पंडित नेहरू यांचे निधन

    भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. त्यानंतर 9 जून 1964 रोजी लाल बहादूर शास्त्री भारताचे नवे पंतप्रधान बनले.

    1964
    7
  • भारत पाकिस्तान युद्ध

    काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले. जे संयुक्त राष्ट्रांनी युद्धविरामाच्या आवाहनानंतर थांबले.

    1965
    8
  • लाल बहादूर शास्त्री यांचे निधन

    1965 च्या भारत-पाकिस्तान शांतता युद्धावर स्वाक्षरी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी लाल बहादूर शास्त्री यांचे ताश्कंदमध्ये निधन झाले. यानंतर इंदिरा गांधी यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली.

    1966
    9
  • भारत आणि पाकिस्तानमधील दुसरे युद्ध

    पूर्व पाकिस्तानच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये दुसरे मोठे युद्ध झाले. जे बांगलादेश अस्तित्वात आल्यानंतर संपले.

    1971
    10
  • ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा

    भारताने पहिली यशस्वी अणुबॉम्ब चाचणी केली.

    1974
    11
  • आणीबाणीची घोषणा

    तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली होती. हजारो लोकांना तुरुगांत टाकण्यात आलं. 1977 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला.

    1975
    12
  • इंदिरा गांधींचं कमबॅक

    इंदिरा गांधी यांनी सार्वत्रिक निवडणुका जिंकत पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला.

    1980
    13
  • भारताने विश्वचषक जिंकला

    वेस्ट विंडिजचा पराभव करत भारताने एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरलं.

    1983
    14
  • भारताचे पहिले अंतराळवीर

    भारतीय हवाई दलाचे माजी पायलट आणि विंग कमांडर राकेश शर्मा यांनी अवकाशात झेप घेतली होती. सोयुज टी 11 ला इंटेरकॉस्मोस प्रोग्राम अंतर्गत राकेश शर्मा यांनी अवकाशात झेप घेतली. अंतरीक्षाची यात्रा करणारे राकेश शर्मा हे पहिले भारतीय होते.

    1984
    15
  • ऑपरेशन ब्लू स्टार

    भारतीय सैन्याने पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात घुसून ऑपरेशन ब्लू स्टार फत्ते केलं होतं. ‘दमदमी टकसाल’, जनरल सिंग भिंडरावाले आणि त्यांचे सहकारी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात तळ ठोकून होते. 7 जून 1984 रोजी सैन्याने मंदिरावर ताबा मिळवला. सैन्य मंदिरात घुसल्याने शीख समुदायात प्रचंड रोष निर्माण झाला. 1 जून ते 10 जूनपर्यंत ऑपरेशन ब्लू स्टार सुरू होतं.

    1984
    16
  • इंदिरा गांधी यांची हत्या

    भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्याच दोन शिख अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर राजीव गांधी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर शीखविरोधी दंगली उसळल्या गेल्या.

    1984
    17
  • भोपाळ गॅस दुर्घटना

    मध्य प्रदेशातील भोपाळमधील युनियन कार्बाईड या कीटकनाशक निर्मिती करणाऱ्या कारखान्यामधून मिथाईल आयसोसायनेट (MIC) या विषारी वायूची गळती झाली. या दुर्घटनेनं 6500 लोकांचा मृत्यू झाला.

    1984
    18
  • काश्मीरमध्ये उद्रेक

    काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उसळला. त्यामुळे पाकिस्तानसोबत तणाव वाढला.

    1989
    19
  • राजीव गांधींची हत्या

    आत्मघातकी हल्ल्यात राजीव गांधींची हत्या झाली. निवडणूक प्रचारावेळी गळ्यात हार घालण्याच्या बहाण्याने तामिळ महिला त्यांच्या जवळ गेली होती. त्याचवेळी तिने कमरेला बांधलेल्या स्फोटकांचा स्फोट केला.

    1991
    20
  • काँग्रेस पुन्हा सत्तेत

    काँग्रेसनं सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर सरकारने मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुधारणा करण्यासाठी पावले उचलली. अनेक दशकांपासूनचे समाजवादी नियंत्रण मोडून काढले.

    1991
    21
  • बाबरी मस्जिद पाडली

    हजारो कारसेवकांनी आयोध्यामधील 16 शतकातील बाबरी मस्जिद पाडली. हे प्रभू रामाचे जन्मस्थान असल्याचा दावा त्यांनी केला होता. या घटनेनंतर देशात सामाजिक आणि राजकीय उलथापालथ झाली.

    1992
    22
  • मुंबई साखळी बॉम्बस्फोट

    अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणला. यामध्ये 257 जणांचा मृत्यू झाला.

    1993
    23
  • भाजपची सत्ता

    अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भाजपनं युतीचं सरकार स्थापन केलं.

    1998
    24
  • पोखरण - II अणुचाचणी

    भारताने पोखरण येथे दोन दिवसात एकूण पाच अणुचाचण्या केल्या. त्यानंतर पाकिस्तानेही अणुचाचण्या केल्या.

    1998
    25
  • कारगिल युद्धाला सुरुवात

    पाकिस्तानी घुसखोरांनी भारताच्या हद्दीतील अनेक ठिकाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले. त्यानंतर भारताने या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले.

    1999
    26
  • संसदेवर हल्ला

    संसदेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. नवी दिल्लीमधील संसदेवर पाकिस्तानी दहशतवादी हल्ला केला होता. त्यानंतर वाहतूक आणि राजनैतिक संबंध तोडले गेले.

    2001
    27
  • गोधरा ट्रेन दुर्घटना

    गुजरातच्या पंचमहलच्या गोधरा स्थानकात साबरमती एक्स्प्रेस ट्रेनच्या एका डब्याला जमावाने आग लावली होती. या घटनेत 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता.

    2002
    28
  • गुजरात दंगल

    ट्रेन दुर्घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी गुजरातमध्ये दंगल घडली. यामध्ये 1000 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये मुस्लिम लोकांचा समावेश अधिक होता.

    2002
    29
  • आघाडी सरकार सत्तेत

    काँग्रेसनं पुन्हा एकदा सत्तास्थापन केली. मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

    2004
    30
  • मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट

    मुंबईची लाईफलाईन लोकलमध्ये 11 मिनिटात सात बॉम्बस्फोटानं मुंबई हादरली. यामध्ये 189 जणांचा मृत्यू झाला.

    2006
    31
  • दहशतवादी हल्ला

    समुद्राच्या मार्गे आलेल्या दहा दहशतावाद्यांनी मुंबईत हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यामुळे मुंबईसह देश हादरला होता.

    2008
    32
  • नवीन दहशतवादी कायदा

    दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी ‘बेकायदा कारवाया (प्रतिबंधक) कायद्या’त (यूएपीए अ‍ॅक्ट) दुरुस्त्या करण्यात आल्या. यामुळे संघटना वा समूहांनाच नव्हे, तर व्यक्तीलाही दहशतवादी घोषित करून तिची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार एनआयएला देण्यात आला.

    2009
    33
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी नवे पंतप्रधान

    भाजपनं युतीचं सरकार स्थापन केलं. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

    2014
    34
  • नोटाबंदी

    मोदी सरकारने नोटाबंदी लागू केली. 500 आणि एक हजारांची नोट बंद करण्यात आली. 500 आणि दोन हजारांच्या नव्या नोटा चलनात आल्या.

    2016
    35

भारताचे पंतप्रधान

abp News abp News
  • जवाहरलाल नेहरू

    जवाहरलाल नेहरू

    15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964 (1889-1964)
  • गुलजारीलाल नंदा (काळजीवाहू)

    गुलजारीलाल नंदा (काळजीवाहू)

    27 मे 1964 ते 9 जून 1964 (1898-1998)
  • लाल बहादुर शास्त्री

    लाल बहादुर शास्त्री

    9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966 (1904–1966)
  • गुलजारीलाल नंदा (काळजीवाहू)

    गुलजारीलाल नंदा (काळजीवाहू)

    11 जानेवारी 1966 ते 24 जानेवारी 1966 (1898-1998)
  • इंदिरा गांधी

    इंदिरा गांधी

    24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 (1917–1984)
  • मोरारजी देसाई

    मोरारजी देसाई

    24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979 (1896–1995)
  • चरण सिंह

    चरण सिंह

    28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 (1902–1987)
  • इंदिरा गांधी

    इंदिरा गांधी

    14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984 (1917–1984)
  • राजीव गांधी

    राजीव गांधी

    31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989 (1944–1991)
  • व्ही पी सिंह

    व्ही पी सिंह

    2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990 (1931–2008)
  • चंद्रशेखर

    चंद्रशेखर

    10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991 (1927–2007)
  • पी व्ही नरसिंहराव

    पी व्ही नरसिंहराव

    21 जून 1991 ते 16 मे 1996 (1921–2004)
  • अटलबिहारी वाजपेयी

    अटलबिहारी वाजपेयी

    16 मे1996 ते 1 जून 1996 (1924- 2018)
  • एचडी देवेगौडा

    एचडी देवेगौडा

    1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997 ( जन्मवर्ष - 1933 )
  • इंद्रकुमार गुजराल

    इंद्रकुमार गुजराल

    21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998 (1919–2012)
  • अटलबिहारी वाजपेयी

    अटलबिहारी वाजपेयी

    19 मार्च 1998 ते 22 मे 2004 (1924- 2018)
  • मनमोहन सिंह

    मनमोहन सिंह

    22 मे 2004 ते 26 मे 2014 (जन्मवर्ष 1932)
  • नरेंद्र मोदी

    नरेंद्र मोदी

    26 मे 2014 - आतापर्यंत (जन्मवर्ष - 1950)