![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Rains Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा
राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरु आहे.
LIVE
![Maharashtra Rains Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा Maharashtra Rains Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/07/5bf3774b34eda1b24ee93d73717c81821659835986_original.jpeg)
Background
Maharashtra Rains Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरु आहे. तसेच मुंबई शहरासह उपनगरात देखील पावसाचा जोर वाढला आहे. काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा (Maharashtra Rain Update ) अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रांकडून परिस्थिती आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी माहिती दिली. दरम्यान, सध्या राज्यातील विवध भागात चांगला पाऊस कोसळत आहे. विशेषत: मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, नांदेड यासह कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी याठिकाणी पाऊस पडत आहे. मुंबईतही पावसानं चांगली हजेरी लावली आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पारवा आणि साखरा या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.
मुंबईत आजपासून पावसाचा जोर वाढणार
मुंबईत 7 आणि 8 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 9 आणि 10 ऑगस्ट रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत
हिंगोली जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरु आहे. या जोरदार पावसाने शेतीचे नुकसान होणार आहे. दुपारीच जोरदार पाऊस सुरू झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. हळद, कापूस, तूर, मूग, सोयाबीन पिकाला या पावसाचा फटका बसणार आहे. अनेक ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर अचानक जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
गुहागर तालुक्यामध्ये कोतळूक कासारी नदी प्रथमच पात्राबाहेर
रत्नागिरी जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे गुहागर तालुक्यामध्ये कोतळूक कासारी नदी प्रथमच पात्राबाहेर आली आहे. नदी लगतची भात शेती पाण्याखाली गेली आहे. आरे येथेही पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळं वाहतूक बंद झाली आहे.
7 ते 11 ऑगस्टदरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा
7 ते 11 ऑगस्ट दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचे वादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. 8 ते 10 ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गुहागरमध्ये मुसळधार पाऊस, पालशेत बाजारपेठेत शिरलं पुराचं पाणी
गुहागरमधील साकरी पुल पाण्याखाली
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)