एक्स्प्लोर

Success story : वाशिमचे खरबूज काश्मीरला, 82 दिवसात लाखोंचा नफा; वाचा राधेश्याम मंत्र्यांची यशोगाथा

Success story : वाशीम जिल्ह्यातील शेतकरी राधेश्याम मंत्री यांनी लायलपुरी जातीच्या खरबुजाची यशस्वी लागवड केली आहे. यातून त्यांनी लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे.

Success story : अलिकडच्या काळात शेतीमध्ये (Agriculture) उत्पन्न वाढीसाठी रासायनिक खंताचा वापर मोठ्या  प्रमाणात होत चालला आहे. परिणामी जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. रासायनिक खत टाळून अलिकडच्या काळात काही शेतकरी सेंद्रिय शेतीची (Organic farming) कास धरत वेगवेगळे प्रयोग करुन लाखोंचं उत्पन्न घेत आहेत. असाच एक प्रयोग वाशिमच्या एका शेतकऱ्याने केला आहे. राधेश्याम मंत्री (Radheshyam Mantri) असं या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या शेतात तीन एकर क्षेत्रावर  लायलपुरी जातीच्या खरबुजाची (Kharbuj) लागवड केली आहे. 82 दिवसाच्या खरबूज पिकाने मंत्री यांना लखपती केलं आहे.

खरबुजाची स्थानिक बाजारात विकी न करता काश्मीरला पाठवण्याचा निर्णय 

वाशिमच्या राधेश्याम मंत्री यांची तामसी शिवारात शेतजमीन आहे. मंत्री गेल्या अनेक वर्षापासून शेतीत विविध प्रयोग करतात. मात्र, पारंपारिक पिकामध्ये उत्पन्न मिळत नसल्याने मंत्री यांनी आपल्या दोन एकर शेतात अॅप्पल बोर पिकाची लागवड केली. मात्र बोरांना अवधी लागणार असल्याने त्यामध्ये त्यांनी अंतरपीक म्हणून खरिपाचे सोयाबीन पीक केले. त्यानंतर त्यातच खरबूज पिकाचा प्रयोग केला. हा खरबूज लागवडीचा प्रयोग त्यांनी यशस्वी करुन दाखवला आहे. मंत्री यांच्या शेतातील 82 व्या दिवशी खरबूज तोड सुरु झाली. मात्र, मंत्री यांनी हे खरबूज स्थानिक बाजारात न विकता व्यापाऱ्याच्या मदतीने थेट जम्मू काश्मीरला पाठवण्याचा निर्णय घेतला. ज्यातून त्यांना थेट शेतातून 17 रुपये प्रतिकिलो एवढा दर  जागेवरच मिळत आहे.


Success story : वाशिमचे खरबूज काश्मीरला, 82 दिवसात लाखोंचा नफा; वाचा राधेश्याम मंत्र्यांची यशोगाथा

मंत्री यांनी स्थानिक बाजारात विक्री केली असती तर केवळ दहा ते बारा रुपये दर मिळाला असता. मात्र, आपल्या पिकाची विक्री इतर राज्यातील व्यापारी खरेदी करु शकतात याचा अचूक अंदाज घेत त्यांनी कश्मीर  निवडले आणि याचा फायदाही मिळाला. 

सहा ते साडेसहा लाखांचे उत्पन्न मिळणार 

मंत्री यांच्या शेतातून पहिल्या तोडणीत साधारण 20 टनांचे खरबूज निघाले आहे. तर आणखी 17 ते 18 टन उत्पादन पुन्हा मिळणार आहे. ज्यातून त्यांना सहा ते साडेसहा लाखांचे उत्पन्न होणार आहे. 50 हजारांचा खर्च वजा जाता मंत्री यांना एकरी दोन लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे. वाशिमचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवून ट्रक जम्मू काश्मीरला रवाना करण्यात आला आहे.

Success story : वाशिमचे खरबूज काश्मीरला, 82 दिवसात लाखोंचा नफा; वाचा राधेश्याम मंत्र्यांची यशोगाथा

अनेक वर्षांपासून मंत्री करत आहेत संपूर्ण सेंद्रिय शेती

राधेश्याम मंत्री हे गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण सेंद्रिय शेती करत आहेत. त्यासाठी त्यांना 2018 साली महाराष्ट्र सरकारचा सेंद्रिय शेती भूषण पुरस्कारही मिळाला आहे. मंत्री आपल्या शेतात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. सुगंधी औषधी वनस्पती जिरेनियम लागवड, विक्रमी उत्पादन येणारे बेडवरील सोयाबीन, गोपालनातून संपूर्ण शेतीचे सेंद्रियकरण करुन त्यांनी कमी खर्चात चांगले उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या असलेल्या शेतीत विविध फळ पिकाची लागवड करुन ती सेंद्रिय पद्धतीने पिकवली तर नक्की शेतकरी आपलं आर्थिक उत्पन्न वाढवू शकतात असेही मंत्री म्हणाले.

पारंपरिक पिकांना बगल, शेतकऱ्यांनी बाजारात मागणी असलेल्या पिकांची लागवड करावी

मंत्री यांनी रासायनिक खतं किंवा कीटकनाशकांचा वापर केला नाही. त्यांनी संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने खरबूज पीक घेतले आहे. त्यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न घेऊन आपले आर्थिक गणित सुधारले आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना बगल देत बाजारात मागणी असलेल्या पिकांची लागवड करावी. त्याला नियोजनाची जोड देऊन योग्य बाजारपेठेत विक्री केली तर कमी कालावधीत चांगले उत्पन्न घेता येत असल्याचे राधेश्याम मंत्री म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Agriculture News : 25 वर्षाच्या शेतकऱ्याची कमाल, सव्वा एकरात पपईतून 23 लाखांचं उत्पन्न, वाचा कुंडलच्या प्रतिकची यशोगाथा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Supriya Sule: तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akola Rada | अकोल्यातील हरिहर पेठमध्ये दोन गडात राडा, शहरात तणावाचे वातावरणSanjay Raut On Congress | स्वबळाचा काँग्रेसचा विचार असेल तर तसं जाहीर करा- संजय राऊतEknath Shinde On Ladaki Bahin Yojna : आशाताई भोसलेंनी विरोधकांना चांगली चपराक दिलीयMajha Infra Vision Eknath Shinde | महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन काय? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Supriya Sule: तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
दिवाळी आधीच लाडक्या बहिणींची दिवाळी; ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3000 जमा; मुख्यमंत्र्यांनीच सांगितला आकडा
दिवाळी आधीच लाडक्या बहिणींची दिवाळी; ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3000 जमा; मुख्यमंत्र्यांनीच सांगितला आकडा
Rahul Gandhi : राऊत म्हणाले, जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर, तृणमूल म्हणते, अहंकार नडला; राहुल गांधी मोजक्याच शब्दात काय म्हणाले?
राऊत म्हणाले, जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर, तृणमूल म्हणते, अहंकार नडला; राहुल गांधी मोजक्याच शब्दात काय म्हणाले?
Uddhav Thackeray: जालन्यात ठाकरे गटाला मोठा धक्का! सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण बांधणार शिवबंधन, राजेश टोपे यांना देणार मोठं आव्हान
जालन्यात ठाकरे गटाला मोठा धक्का! सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण बांधणार शिवबंधन, राजेश टोपे यांना देणार मोठं आव्हान
हरियाणात जाटमुळे ओबीसी एकटवला, प्रश्नावर जरांगे भडकले; विधानसभेसाठी भाजपला इशारा
हरियाणात जाटमुळे ओबीसी एकटवला, प्रश्नावर जरांगे भडकले; विधानसभेसाठी भाजपला इशारा
Embed widget